शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

सिडको क्षेत्रात १0 टक्के पाणीकपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 02:42 IST

प्रखर उन्हामुळे धरणातील जलसाठा कमी होत चालला आहे. पावसाळ्याला आणखी दोन महिन्यांचा अवकाश आहे.

नवी मुंबई : प्रखर उन्हामुळे धरणातील जलसाठा कमी होत चालला आहे. पावसाळ्याला आणखी दोन महिन्यांचा अवकाश आहे. अशात पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पुढील वर्षासाठी पाणीसाठा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने सिडकोने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिडको क्षेत्रात पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.नवी मुंबई महापालिकेचे मोरबे, एमआयडीसीचे बारवी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाताळगंगा आणि सिडकोच्या हेटवणे धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीसुध्दा समाधानकारक पावसाचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. परंतु पावसाने दगा दिलाच तर पुढील वर्षासाठी पाण्याचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असते. त्यानुसार सिडकोने नवीन पनवेल, काळुंद्रे, कळंबोली, नावडे, कामोठे, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आणि उलवे या क्षेत्रात १९ मार्चपासून १0 टक्के पाणीकपात लागू केली आहे. उन्हाळ्यात पाण्याचा अधिक वापर होतो. असे असले तरी भविष्याची गरज ओळखून पाण्याचा जपून वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांतील नळाला लागलेली गळती, फुटक्या जलवाहिन्या, इमारतीच्या साठवण टाक्यांतून पाण्याची होणारी गळती थांबवावी. शॉवरऐवजी बादलीत पाणी घेवून आंघोळ करावी, कपडे धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा, अशा सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत.>पाणीकपातीनंतर सध्याची स्थितीसिडको नोड पाण्याची गरज सध्याचा पुरवठाखारघर ७0 एमएलडी ६५ एमएलडीकळंबोली ४३ एमएलडी ३८ एमएलडीकामोठे ३८ एमएलडी ३५ एमएलडीनवीन पनवेल ४२ एमएलडी ३८एमएलडी