शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

सिडको क्षेत्रात १0 टक्के पाणीकपात, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 02:42 IST

प्रखर उन्हामुळे धरणातील जलसाठा कमी होत चालला आहे. पावसाळ्याला आणखी दोन महिन्यांचा अवकाश आहे.

नवी मुंबई : प्रखर उन्हामुळे धरणातील जलसाठा कमी होत चालला आहे. पावसाळ्याला आणखी दोन महिन्यांचा अवकाश आहे. अशात पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. पुढील वर्षासाठी पाणीसाठा अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने सिडकोने उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिडको क्षेत्रात पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.नवी मुंबई महापालिकेचे मोरबे, एमआयडीसीचे बारवी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाताळगंगा आणि सिडकोच्या हेटवणे धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीसुध्दा समाधानकारक पावसाचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. परंतु पावसाने दगा दिलाच तर पुढील वर्षासाठी पाण्याचे आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असते. त्यानुसार सिडकोने नवीन पनवेल, काळुंद्रे, कळंबोली, नावडे, कामोठे, खारघर, तळोजा, द्रोणागिरी आणि उलवे या क्षेत्रात १९ मार्चपासून १0 टक्के पाणीकपात लागू केली आहे. उन्हाळ्यात पाण्याचा अधिक वापर होतो. असे असले तरी भविष्याची गरज ओळखून पाण्याचा जपून वापर करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांतील नळाला लागलेली गळती, फुटक्या जलवाहिन्या, इमारतीच्या साठवण टाक्यांतून पाण्याची होणारी गळती थांबवावी. शॉवरऐवजी बादलीत पाणी घेवून आंघोळ करावी, कपडे धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा, अशा सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत.>पाणीकपातीनंतर सध्याची स्थितीसिडको नोड पाण्याची गरज सध्याचा पुरवठाखारघर ७0 एमएलडी ६५ एमएलडीकळंबोली ४३ एमएलडी ३८ एमएलडीकामोठे ३८ एमएलडी ३५ एमएलडीनवीन पनवेल ४२ एमएलडी ३८एमएलडी