शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

सुनावणीत ६६४ शेतकऱ्यांकडून हरकत

By admin | Updated: June 19, 2017 02:28 IST

रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीच्या पश्चिम पट्ट्यातील जमिनी औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यास श्रमिक मुक्ती दलाने विरोध केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीच्या पश्चिम पट्ट्यातील जमिनी औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यास श्रमिक मुक्ती दलाने विरोध केला आहे. एमएमआरडीएने काही दिवसांपूर्वी २०१६-३६चा प्रस्तावित आराखडा सादर केला होता. त्या आराखड्याला हरकती घेण्याबाबतची सुनावणी नुकतीच वांद्रे-मुंबई येथे पार पडली. या सुनावणीत अलिबाग तालुक्यातील ६६४ शेतकऱ्यांना हरकती घेतल्या. सुनावणीला ३१२ शेतकरी, सरपंच आणि श्रमिक मुक्ती दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असल्याने सुनावणी अलिबाग येथे घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, एमएमआरडीएने त्यांच्या वांद्रे येथील कार्यालयातच सुनावणी घेतली. एमएमआरडीएला या जागेची गरज नसताना, भांडवलदारांसाठीच औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यासाठी हा डाव आहे. शेतकऱ्यांचा त्याला विरोध राहणार असल्याने सरकारचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, असा निरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या वतीने द्या, असे शेतकरी नंदन पाटील यांनी सुनावणीत ठणकावले.शेतकऱ्यांची मागणी नसताना, एमएमआरडीएला झोन बदलण्याची गरज काय, असा प्रश्न राजन भगत यांनी उपस्थित केला. १९९१च्या अगोदरच्या प्रस्तावात धरमतर खाडीच्या पश्चिम भागातील (शहापूर) सहा जेट्ट्या मंजूर केल्या आहेत. त्यांना राखीव क्षेत्रापेक्षा जास्त जागा लागणार आहे. त्यासाठी सर्वच क्षेत्र औद्यागिक करण्याचे ठरले असल्याचे, एमएमआरडीएचे पॅनल सदस्य पाठक यांनी सांगितले. मात्र, विकासक कोण, हे त्यांनी सांगितले नाही. अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वी पॅनलचे सदस्य त्या भागात गेले होते का? असा प्रश्न भगत यांनी विचारला असता, कोणताही सदस्य गेला नसल्याचे पॅनलच्या सदस्यांनी सांगितले. हरकती प्राप्त झाल्यावर गेल्याचे त्यांनी कबूल केले.