शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

सुनावणीत ६६४ शेतकऱ्यांकडून हरकत

By admin | Updated: June 19, 2017 02:28 IST

रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीच्या पश्चिम पट्ट्यातील जमिनी औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यास श्रमिक मुक्ती दलाने विरोध केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड जिल्ह्यातील धरमतर खाडीच्या पश्चिम पट्ट्यातील जमिनी औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यास श्रमिक मुक्ती दलाने विरोध केला आहे. एमएमआरडीएने काही दिवसांपूर्वी २०१६-३६चा प्रस्तावित आराखडा सादर केला होता. त्या आराखड्याला हरकती घेण्याबाबतची सुनावणी नुकतीच वांद्रे-मुंबई येथे पार पडली. या सुनावणीत अलिबाग तालुक्यातील ६६४ शेतकऱ्यांना हरकती घेतल्या. सुनावणीला ३१२ शेतकरी, सरपंच आणि श्रमिक मुक्ती दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असल्याने सुनावणी अलिबाग येथे घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, एमएमआरडीएने त्यांच्या वांद्रे येथील कार्यालयातच सुनावणी घेतली. एमएमआरडीएला या जागेची गरज नसताना, भांडवलदारांसाठीच औद्योगिक क्षेत्र जाहीर करण्यासाठी हा डाव आहे. शेतकऱ्यांचा त्याला विरोध राहणार असल्याने सरकारचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, असा निरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या वतीने द्या, असे शेतकरी नंदन पाटील यांनी सुनावणीत ठणकावले.शेतकऱ्यांची मागणी नसताना, एमएमआरडीएला झोन बदलण्याची गरज काय, असा प्रश्न राजन भगत यांनी उपस्थित केला. १९९१च्या अगोदरच्या प्रस्तावात धरमतर खाडीच्या पश्चिम भागातील (शहापूर) सहा जेट्ट्या मंजूर केल्या आहेत. त्यांना राखीव क्षेत्रापेक्षा जास्त जागा लागणार आहे. त्यासाठी सर्वच क्षेत्र औद्यागिक करण्याचे ठरले असल्याचे, एमएमआरडीएचे पॅनल सदस्य पाठक यांनी सांगितले. मात्र, विकासक कोण, हे त्यांनी सांगितले नाही. अहवाल प्रसिद्ध करण्यापूर्वी पॅनलचे सदस्य त्या भागात गेले होते का? असा प्रश्न भगत यांनी विचारला असता, कोणताही सदस्य गेला नसल्याचे पॅनलच्या सदस्यांनी सांगितले. हरकती प्राप्त झाल्यावर गेल्याचे त्यांनी कबूल केले.