शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीचीही अनधिकृत बांधकामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2016 01:36 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या साहाय्याने प्रचंड अनधिकृत बांधकामे केली आहेत. व्यापाऱ्यांबरोबर बाजार समिती प्रशासनानेही पालिकेची परवानगी

- नामदेव मोरे,  नवी मुंबई

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या साहाय्याने प्रचंड अनधिकृत बांधकामे केली आहेत. व्यापाऱ्यांबरोबर बाजार समिती प्रशासनानेही पालिकेची परवानगी न घेता स्टॉल्स, कँटीनला जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. माथाडी, वारणार, वाहतूकदार यांच्यासाठी २३ कार्यालये उभारण्यास परवानगी दिली आहे. बांधकामाचे सर्व नियम धाब्यावर बसविले असून, याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज आहे. नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांनी बांधलेल्या घरांवर बुल्डोजर फिरविला जात असताना दुसरीकडे बाजार समितीमध्ये रोज लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या अतिक्रमणांना अभय दिले जात आहे. बाजार समितीमधील ९५ टक्के व्यापाऱ्यांनी वाढीव बांधकाम केले आहे. परंतु फक्त व्यापाऱ्यांनीच अनधिकृत बांधकाम केले नसून, ही अतिक्रमणाची सुरुवात बाजार समितीच्या प्रशासनानेच सुरू केली आहे. शहरात कोणतेही बांधकाम करायचे असल्यास त्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. परंतु बाजार समितीमध्ये पालिकेची परवानगी न घेताच अनेक बांधकामे केली आहेत. भाजी व फळ मार्केटमधील लिलावगृहांना बांधकाम परवानगी (सीसी) घेतलेली नाही. एपीएमसीतील अधीक्षक अभियंता ते कनिष्ठ अभियंता पदापर्यंतच्या १५पेक्षा जास्त तज्ज्ञांनाही परवानगीशिवाय बांधकाम करता येत नाही, हा साधा नियमही कसा माहिती नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. अनधिकृत बांधकाम असलेल्या लिलावगृहांमध्ये व्यापारी, माथाडी कामगार दिवसभर काम करतात. अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पाच मार्केटमध्ये जवळपास १५ धार्मिकस्थळे उभारण्यात आली आहेत. यातील एकाही धार्मिक स्थळास अधिकृत जागा दिलेली नाही. फळ मार्केटच्या लिलावगृहाजवळील विंगच्या मागील बाजूला शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कार्यालय व मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला कागदी व लाकडी खोकी बनविण्याचा कारखाना सुरू केला आहे. बाजार समितीने वर्तमानपत्रांत जाहिराती देऊन भाजी व इतर मार्केटमध्ये हॉटेल भाडेतत्त्वावर दिली आहेत. हॉटेलचालकांना त्यांचा माल विकण्यासाठी विस्तारित स्टॉल्सही दिली आहेत. याशिवाय पानटपरी ते टेलीफोन बुथपर्यंत अनेक व्यावसायांसाठी स्टॉल्स तयार करून भाडेतत्त्वावर दिले आहेत. हे स्टॉल्स उभारतानाही महापालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. एपीएमसीने अनधिकृतपणे या जागा भाडेतत्त्वावर दिल्या असून, त्यातून महसूल जमा केला जात आहे. बाजार समितीच्या पाचही मार्केटमध्ये वारणार, माथाडी कामगार, वाहतूकदार यांच्यासाठी ५० ते १०० चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली आहे.प्रकल्पग्रस्तांवर कारवाई, व्यापाऱ्यांना अभय नवी मुंबई वसविण्यासाठी येथील भूमिपुत्रांनी त्यांची १०० टक्के जागा शासनाला दिली आहे. सद्य:स्थितीमध्ये गावठाण व गावठाण परिसरामध्ये प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांवर सिडको व महापालिका बुलडोजर फिरवत आहे. परंतु मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मसाला व धान्य मार्केटमध्ये करोडो रुपये कमविणाऱ्या व्यापाऱ्यांनी बिनधास्तपणे अतिक्रमण केले आहे. विनापरवाना एक मजल्याचे वाढीव बांधकाम केले आहे. सिडको व महानगरपालिकेने अद्याप एकही व्यापाऱ्याच्या गाळ्यावर कारवाई केलेली नाही. व्यापाऱ्यांना आठवले माथाडी कामगार मसाला मार्केटमध्ये महापालिकेने आयोजित केलेली अतिक्रमणविरोधी पथकाची मोहीम दोन वेळा थांबवावी लागली. पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे आतापर्यंत कारवाई पूर्ण झाली नाही. वास्तविक मसाला मार्केटमधील व्यापाऱ्यांनी अनेक वेळा कामगारविरोधी भूमिका घेतली आहे. साखरेसह सुकामेवा बाजार समितीमधून वगळला आहे. भाजी, फळ व कांदा मार्केटच्या आंदोलनामध्ये मसाला व धान्य मार्केटच्या व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला नाही.आज हातोडा पडणार !बाजारसमितीच्या मसाला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी प्रचंड अतिक्रमण केले आहे. महापालिकेने १६ मे रोजी अतिक्रमण हटविण्याची मोहीम आयोजित केली होती. परंतु व्यापाऱ्यांनी विरोध केल्यामुळे कारवाई थांबवावी लागली होती. यानंतर २ जून रोजी कारवाई केली जाणार होती. परंतु पोलिसांनी आयत्यावेळी बंदोबस्त नाकारल्यामुळे कारवाई थांबवावी लागली होती. आता १४ जून रोजी महापालिकेने डी विंगवर कारवाई आयोजित केली आहे. यावेळी कारवाई होणार का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.