शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
2
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
3
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
4
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
5
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
6
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
7
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
8
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
9
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
10
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
11
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
12
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
13
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
14
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
15
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
16
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
17
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
18
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
19
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
20
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!

एपीएमसीत बदल्यांचा ‘बाजार’?

By admin | Updated: July 10, 2015 03:18 IST

मोक्याच्या जागेवर चिकटून बसलेल्या कर्मचाऱ्यांना मंत्रालयापासून ते एपीएमसी मुख्यालयापर्यंत अनेकांचे अभय मिळत आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक कर्मचारी ६ ते ७ वर्षे एकाच विभागात काम करत आहेत. पैसे मिळतील अशा मोक्याच्या जागेवर चिकटून बसलेल्या कर्मचाऱ्यांना मंत्रालयापासून ते एपीएमसी मुख्यालयापर्यंत अनेकांचे अभय मिळत आहे. ३ वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची फाईल जवळपास २० दिवस सचिवांच्या कार्यालयात पडून असून बदल्यांसाठी घोडाबाजार सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नवी मुंबईमध्ये सिडको व महापालिकेनंतर सर्वात महत्त्वाची आस्थापना म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ओळखली जाते. येथील विविध बाजारपेठांमध्ये वर्षाला २० हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल होते. एपीएमसीचे उत्पन्नही वर्षाला १०० कोटींपेक्षा जास्त झाले आहे. प्रचंड आर्थिक व्यवहारांमुळे बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. पगाराव्यतिरिक्त वरकमाई करण्याची स्पर्धाच कामगारांमध्ये लागली आहे. यामधूनच प्रत्येक वर्षी बदल्यांचा हंगाम सुरू झाला की घोडेबाजार तेजीत येतो. आवक गेट, चेक नाके, ठाणे मार्केट, तेल मार्केट, मसाला व धान्य मार्केटमध्ये वर्णी लावून घेण्यासाठी गावच्या आमदारापासून ते थेट मंत्रालयापर्यंत अनेकांचा वशिला वापरण्यात येतो. कर्मचारी संघटनाही आपल्या सदस्यांना मोक्याची जागा मिळावी यासाठी प्रयत्न करतात. अनेक कर्मचारी १० ते १५ वर्षे मोक्याच्या व वरकमाईच्या विभागातच काम करत आहेत. गेटवरील सुरक्षा रक्षकही आत येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या वाहनांकडून ५ ते १० रुपये घेत असल्याचे चित्र दिसत आहे. गेट, चेक नाका सर्व कमाईचे अड्डे झाले आहेत. मसाला व धान्य मार्केटमध्ये कर्मचाऱ्याची बदली झाली की तेथून पुन्हा बदलीच होऊ नये अशी त्यांची इच्छा असते. मागील महिन्यात तीन वर्षे पूर्ण झालेल्या काही कामगारांची बदली झाली. परंतु जे ६ ते ७ वर्षांपासून एकाच विभागात काम करत आहेत ते मात्र मसाला मार्केटमध्ये अद्याप चिकटून आहेत. धान्य व इतर मार्केटमध्येही तीच स्थिती आहे. बाजार समितीमधील काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एक महिन्यापूर्वी पहिल्या टप्प्यातील बदल्या पूर्ण झाल्या. दुसऱ्या टप्प्यातील बदल्यांची यादी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तयार झाली आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी काम करणाऱ्यांची बदली करण्यासाठीचा प्रस्ताव सचिव शिवाजी पहिनकर यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. परंतु अद्याप बदल्यांच्या फाईलवर सह्णा करण्यात आलेल्या नाहीत. बदल्या रखडल्यामुळे मार्केटमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. बदल्यांसाठी पैशांची बोली सुरू झाल्याचे बोलले जात आहे. बदल्यांना जेवढा कालावधी लागणार तेवढ्या या अफवा वाढत जाणार आहेत. नि:पक्ष बदल्या करण्याचे आश्वासनच्एपीएमसीमध्ये प्रशासकीय मंडळ आल्यापासून कामकाजात पारदर्शकता आली आहे. अध्यक्ष मनोज सौनिक, सचिव शिवाजी पहिनकर यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. रस्त्यांचे काँक्रिटीकरण, गेट, फळ मधील विस्तारित मार्केटचे काम सुरू आहे. च्व्यापाऱ्यांशीही चांगला संवाद ठेवला आहे. बदल्याही नि:पक्ष होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पहिनकर यांच्याशी संपर्क साधला असता तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्यांच्या बदल्या लवकरच करण्यात येणार असून मंगळवारपर्यंत सर्व सोपस्कार पूर्ण केले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. बदल्यांच्या यादीवर लक्ष : एपीएमसीमधील बदल्यांची यादी तयार झाली आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्यांची नावे त्यात आहेत. याची प्रत काही जणांनी मिळविली आहे.