शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच विविध क्षेत्रात बाबासाहेबांचे मोलाचे कार्य - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 05:52 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी शोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच अर्थशास्त्र, पाटबंधारे, विद्युत निर्मिती, सामाजिक समता अशा विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले असल्याचे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ऐरोली येथे आंबेडकर भवनच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते.

नवी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी शोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच अर्थशास्त्र, पाटबंधारे, विद्युत निर्मिती, सामाजिक समता अशा विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले असल्याचे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ऐरोली येथे आंबेडकर भवनच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते.पालिकेतर्फे ऐरोली येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाबासाहेबांचे विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केलेले आहे. ते अर्थतज्ज्ञ देखील होते, ही त्यांच्या जीवनाची दुसरी बाजू अद्याप योग्य प्रकारे समाजापुढे आलेली नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे ऐरोली येथील भव्य स्मारकात बाबासाहेबांनी भारताच्या उभारणीसाठी केलेले सर्व प्रयत्न समाजापुढे मांडावे असेही त्यांनी सुचवले. तर जगभर उलथापालथ सुरु असतानाही बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळे देशातील ऐक्य टिकून असल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले. प्रत्येक राज्यात विद्युत निर्मिती होवून ती इतरही राज्यात पुरवली जावी याकरिता वीज मंडळाची स्थापना, पाण्यासाठी धरण उभारणीचा निर्णय हे सर्व बाबासाहेबांची देण असल्याचेही ते म्हणाले. यावेळी बाबासाहेबांचे विचार आशिया खंडात पोचवणे, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देणे, तसेच चित्रपटाच्या माध्यमातून बाबासाहेब लोकांपर्यंत पोचवणे ही महत्त्वाची कार्ये आपल्या हातून झाल्याचे समाधान पवार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी देशाची अखंडता व एकात्मता संकटात येवू नये हे राज्यघटनेतील मूलभूत तत्त्व असल्याचे सांगितले. जगात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. मात्र देशात बाबासाहेबांनी जी विचारांची इमारत उभी केली आहे, ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला तर देशावर संकट कोसळेल अशी चिंता व्यक्त केली. महापौर सुधाकर सोनावणे यांनी महापौर होताना झालेल्या आनंदापेक्षा, बाबासाहेबांचे भवन उद्घाटनाच्या आनंदाचा क्षण मोठा असल्याची भावना व्यक्त केली. या भवनला भेट देणाºयांचा जीवनाकडे बघण्याचा कल बदलेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी कार्यक्रमास माजी मंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार नरेंद्र पाटील, पालिका आयुक्त रामास्वामी एन., उपमहापौर अविनाश लाड यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.महापौर सुधाकर सोनवणे यांच्या जिवणावर आधारित परिस गवसलेला माणूस या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लेखिका अनुपमा उजगरे यांनी हे पुस्तक लिहीलेले आहे. महापौरांचे राजकीय व सामाजिक वाटचाल या पुस्तकातून मांडण्यात आली आहे.आंबेडकर भवनासाठी निश्चित केलेल्या जागेवर मैदानाचे आरक्षण होते. त्यामुळे प्रस्तावित भवनाला अडथळा निर्माण झाला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सदर मैदानाचे आरक्षण बदलून भवन उभारणीचा मार्ग मोकळा केला. परंतु भवन पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन होत असताना मात्र चव्हाण यांना निमंत्रित केले गेले नसल्याची खंत उपमहापौर अविनाश लाड यांनी भाषणातून व्यक्त केली.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही स्मारकाला विशेष भेट दिली. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामाचे मुक्तकंठाने कौतुक केले. बाबासाहेबांचा समतेचा आणि शांततेचा विचार जनमानसात प्रसारित करण्यासाठी हे स्मारक महत्त्वाचे ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तर बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घेऊन समाज एकत्र आणण्यासाठी प्रत्येक माणसाने प्रयत्न करीत राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार