शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच विविध क्षेत्रात बाबासाहेबांचे मोलाचे कार्य - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 05:52 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी शोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच अर्थशास्त्र, पाटबंधारे, विद्युत निर्मिती, सामाजिक समता अशा विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले असल्याचे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ऐरोली येथे आंबेडकर भवनच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते.

नवी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी शोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच अर्थशास्त्र, पाटबंधारे, विद्युत निर्मिती, सामाजिक समता अशा विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले असल्याचे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ऐरोली येथे आंबेडकर भवनच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते.पालिकेतर्फे ऐरोली येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाबासाहेबांचे विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केलेले आहे. ते अर्थतज्ज्ञ देखील होते, ही त्यांच्या जीवनाची दुसरी बाजू अद्याप योग्य प्रकारे समाजापुढे आलेली नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे ऐरोली येथील भव्य स्मारकात बाबासाहेबांनी भारताच्या उभारणीसाठी केलेले सर्व प्रयत्न समाजापुढे मांडावे असेही त्यांनी सुचवले. तर जगभर उलथापालथ सुरु असतानाही बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळे देशातील ऐक्य टिकून असल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले. प्रत्येक राज्यात विद्युत निर्मिती होवून ती इतरही राज्यात पुरवली जावी याकरिता वीज मंडळाची स्थापना, पाण्यासाठी धरण उभारणीचा निर्णय हे सर्व बाबासाहेबांची देण असल्याचेही ते म्हणाले. यावेळी बाबासाहेबांचे विचार आशिया खंडात पोचवणे, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देणे, तसेच चित्रपटाच्या माध्यमातून बाबासाहेब लोकांपर्यंत पोचवणे ही महत्त्वाची कार्ये आपल्या हातून झाल्याचे समाधान पवार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी देशाची अखंडता व एकात्मता संकटात येवू नये हे राज्यघटनेतील मूलभूत तत्त्व असल्याचे सांगितले. जगात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. मात्र देशात बाबासाहेबांनी जी विचारांची इमारत उभी केली आहे, ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला तर देशावर संकट कोसळेल अशी चिंता व्यक्त केली. महापौर सुधाकर सोनावणे यांनी महापौर होताना झालेल्या आनंदापेक्षा, बाबासाहेबांचे भवन उद्घाटनाच्या आनंदाचा क्षण मोठा असल्याची भावना व्यक्त केली. या भवनला भेट देणाºयांचा जीवनाकडे बघण्याचा कल बदलेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी कार्यक्रमास माजी मंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार नरेंद्र पाटील, पालिका आयुक्त रामास्वामी एन., उपमहापौर अविनाश लाड यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.महापौर सुधाकर सोनवणे यांच्या जिवणावर आधारित परिस गवसलेला माणूस या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लेखिका अनुपमा उजगरे यांनी हे पुस्तक लिहीलेले आहे. महापौरांचे राजकीय व सामाजिक वाटचाल या पुस्तकातून मांडण्यात आली आहे.आंबेडकर भवनासाठी निश्चित केलेल्या जागेवर मैदानाचे आरक्षण होते. त्यामुळे प्रस्तावित भवनाला अडथळा निर्माण झाला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सदर मैदानाचे आरक्षण बदलून भवन उभारणीचा मार्ग मोकळा केला. परंतु भवन पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन होत असताना मात्र चव्हाण यांना निमंत्रित केले गेले नसल्याची खंत उपमहापौर अविनाश लाड यांनी भाषणातून व्यक्त केली.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही स्मारकाला विशेष भेट दिली. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामाचे मुक्तकंठाने कौतुक केले. बाबासाहेबांचा समतेचा आणि शांततेचा विचार जनमानसात प्रसारित करण्यासाठी हे स्मारक महत्त्वाचे ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तर बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घेऊन समाज एकत्र आणण्यासाठी प्रत्येक माणसाने प्रयत्न करीत राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार