शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

शोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच विविध क्षेत्रात बाबासाहेबांचे मोलाचे कार्य - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 05:52 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी शोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच अर्थशास्त्र, पाटबंधारे, विद्युत निर्मिती, सामाजिक समता अशा विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले असल्याचे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ऐरोली येथे आंबेडकर भवनच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते.

नवी मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित घटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी शोषित समाजाला न्याय देण्याबरोबरच अर्थशास्त्र, पाटबंधारे, विद्युत निर्मिती, सामाजिक समता अशा विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केले असल्याचे राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ऐरोली येथे आंबेडकर भवनच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते.पालिकेतर्फे ऐरोली येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाबासाहेबांचे विविध क्षेत्रात मोलाचे कार्य केलेले आहे. ते अर्थतज्ज्ञ देखील होते, ही त्यांच्या जीवनाची दुसरी बाजू अद्याप योग्य प्रकारे समाजापुढे आलेली नसल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे ऐरोली येथील भव्य स्मारकात बाबासाहेबांनी भारताच्या उभारणीसाठी केलेले सर्व प्रयत्न समाजापुढे मांडावे असेही त्यांनी सुचवले. तर जगभर उलथापालथ सुरु असतानाही बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळे देशातील ऐक्य टिकून असल्याचेही गौरवोद्गार त्यांनी काढले. प्रत्येक राज्यात विद्युत निर्मिती होवून ती इतरही राज्यात पुरवली जावी याकरिता वीज मंडळाची स्थापना, पाण्यासाठी धरण उभारणीचा निर्णय हे सर्व बाबासाहेबांची देण असल्याचेही ते म्हणाले. यावेळी बाबासाहेबांचे विचार आशिया खंडात पोचवणे, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देणे, तसेच चित्रपटाच्या माध्यमातून बाबासाहेब लोकांपर्यंत पोचवणे ही महत्त्वाची कार्ये आपल्या हातून झाल्याचे समाधान पवार यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आमदार जोगेंद्र कवाडे यांनी देशाची अखंडता व एकात्मता संकटात येवू नये हे राज्यघटनेतील मूलभूत तत्त्व असल्याचे सांगितले. जगात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. मात्र देशात बाबासाहेबांनी जी विचारांची इमारत उभी केली आहे, ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला तर देशावर संकट कोसळेल अशी चिंता व्यक्त केली. महापौर सुधाकर सोनावणे यांनी महापौर होताना झालेल्या आनंदापेक्षा, बाबासाहेबांचे भवन उद्घाटनाच्या आनंदाचा क्षण मोठा असल्याची भावना व्यक्त केली. या भवनला भेट देणाºयांचा जीवनाकडे बघण्याचा कल बदलेल, असेही ते म्हणाले. याप्रसंगी कार्यक्रमास माजी मंत्री गणेश नाईक, आमदार संदीप नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार नरेंद्र पाटील, पालिका आयुक्त रामास्वामी एन., उपमहापौर अविनाश लाड यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.महापौर सुधाकर सोनवणे यांच्या जिवणावर आधारित परिस गवसलेला माणूस या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लेखिका अनुपमा उजगरे यांनी हे पुस्तक लिहीलेले आहे. महापौरांचे राजकीय व सामाजिक वाटचाल या पुस्तकातून मांडण्यात आली आहे.आंबेडकर भवनासाठी निश्चित केलेल्या जागेवर मैदानाचे आरक्षण होते. त्यामुळे प्रस्तावित भवनाला अडथळा निर्माण झाला होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सदर मैदानाचे आरक्षण बदलून भवन उभारणीचा मार्ग मोकळा केला. परंतु भवन पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन होत असताना मात्र चव्हाण यांना निमंत्रित केले गेले नसल्याची खंत उपमहापौर अविनाश लाड यांनी भाषणातून व्यक्त केली.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही स्मारकाला विशेष भेट दिली. यावेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामाचे मुक्तकंठाने कौतुक केले. बाबासाहेबांचा समतेचा आणि शांततेचा विचार जनमानसात प्रसारित करण्यासाठी हे स्मारक महत्त्वाचे ठरेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. तर बाबासाहेबांच्या विचारांचा आधार घेऊन समाज एकत्र आणण्यासाठी प्रत्येक माणसाने प्रयत्न करीत राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार