शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

कॅशलेस कोप्रोलीची घोषणा विरली हवेतच

By admin | Updated: April 26, 2017 00:15 IST

रायगड जिल्ह्यातील पहिले कॅशलेस म्हणून कोप्रोली गाव महाराष्ट्राच्या नकाशावर येणार होते. मात्र गावाची कॅशलेसची घोषणा हवेतच विरल्याचे दिसत आहे.

पनवेल : रायगड जिल्ह्यातील पहिले कॅशलेस म्हणून कोप्रोली गाव महाराष्ट्राच्या नकाशावर येणार होते. मात्र गावाची कॅशलेसची घोषणा हवेतच विरल्याचे दिसत आहे. कोप्रोली गावाची कॅशलेसची घोषणा होऊन चार महिने झाले तरी अद्याप एकाही व्यापाऱ्याकडे पीओएस मशीन उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना सारे व्यवहार रोखीनेच करावे लागत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मोठ्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली होती. कॅशलेस सोसायटी निर्माण करणे हाच या निर्णयामागचा उद्देश होता, तसेच या दृष्टीने पाऊल टाकण्यास सुरूवात करावी, कोणतीही रोख रक्कम न बाळगता व्यवहार करायला शिका, असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले होते. त्यानुसार पनवेल तालुक्यातील कोप्रोली व डेरवली गावे कॅशलेस होणार होती. यासाठी डिसेंबर महिन्यात दोन्ही गावातील नागरिक, महिला व दुकानदार यांना एकत्रित बोलावून प्रांत भरत शितोळे व तहसीलदार दीपक आकडे यांनी सभा देखील घेतल्या होत्या. मात्र चार महिने उलटून गेले तरी देखील दोन्ही गावे कॅशलेस झालेली दिसत नाहीत. नागरिक रोखीनेच वस्तू खरेदी करत आहेत. ग्रामस्थांना कॅशलेस म्हणजे काय याबाबत माहिती देऊन येथील व्यापाऱ्यांची यादी, नागरिकांची यादी करण्याची जबाबदारी रेशन धान्य दुकानदार व ग्रामस्थांवर दिली होती. मात्र कॅशलेसचे होण्याचे घोडे कुठे अडले हे कोणालाच माहिती नाही.कोप्रोली गाव जवळपास ५ हजार लोकसंख्येचे गाव असून विजया बँक व बँक आॅफ इंडियाच्या सहकार्याने सदर गाव कॅशलेस करण्याचा उपक्र म हाती घेण्यात आला होता. गाव कॅशलेस करण्यासाठी २६ डिसेंबर रोजी कोप्रोली गावात विशेष ग्रामसभा लावण्यात आली होती. असे असताना देखील कोप्रोली गाव कॅशलेस होऊ शकलेले नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणा नागरिक व व्यापाऱ्यापर्यंत पोहोचण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसत आहे. कोप्रोली गावात जवळपास २६ व्यापारी आहेत. मात्र यातील २५ व्यापारी कॅशलेस होण्याबाबत संदिग्ध असल्याचे दिसत आहे. यातील केवळ एका व्यापाऱ्याने कॅशलेस होण्यासाठी पीओएस मशीनसाठी अर्ज केला असल्याचे बँकेने सांगितले. त्यामुळे कोप्रोली गाव कॅशलेस होण्यासाठी व्यापारी वर्ग उदासीन असल्याचे दिसत आहे. ग्राहकांना १०० रुपयांच्या खरेदीला २ टक्के चार्जेस लागणार असल्याने त्याचा भुर्दंड व्यापाऱ्याला सहन करावा लागणार असल्याचे एका व्यापाऱ्याने सांगितले. (वार्ताहर)