शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

अण्णाभाऊ साठे भवनचे उद्घाटन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:52 IST

वर्षापूर्वी काम पूर्ण; पाठपुरावा करूनही मिळेना महापौरांची वेळ

नवी मुंबई : सत्ताधाऱ्यांच्या उदासीनतेमुळे सानपाडा येथील पालिकेच्या दोन वास्तूंची उद्घाटने रखडली आहेत. त्यापैकी एक वास्तू वर्षभरापूर्वी बांधून पूर्ण झालेली असून, त्याच्या उद्घाटनासाठी महापौरांकडून वेळ मिळत नसल्याचा आरोप लोकप्रतिनिधींकडून होत आहे. मात्र दोनही वास्तू तयार असताना उद्घाटनांअभावी त्यांचा वापर करता येत नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.पालिकेच्या वतीने सानपाडा सेक्टर १० येथे राज्यात नावलौकिक होईल असे संवेदना उद्यान विकसित केले आहे. विशेष मुलांसह विकलांग मुले व व्यक्तींच्या सोयी-सुविधांनी संपन्न हे उद्यान आहे. तर परिसरातील सामान्य नागरिकांच्याही विरंगुळ्याचे ते प्रमुख केंद्र ठरू शकते. मात्र तीन महिन्यांपूर्वी हे उद्यान तयार होवून देखील अद्याप त्याचे उद्घाटन करण्यात आलेले नाही. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र सदर उद्यान वापरासाठी खुले करण्यास तयार असतानाही, केवळ महापौरांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटन लांबणीवर जात असल्याचा स्थानिक नगरसेविका ऋ चा पाटील यांनी आरोप केला आहे. तर याच उद्यानाच्या समोर पालिकेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती भवन उभारले आहे. या दोन मजली भवनमध्ये तीन प्रशस्त हॉल व पार्किंगसह इतर आवश्यक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मात्र वर्षभरापूर्वी त्याचे काम पूर्ण झालेले असतानाही अद्याप उद्घाटन करण्यात आलेले नाही. या भवनच्या उद्घाटनासाठी देखील प्रशासनाकडून महापौरांची वेळ निश्चित होत नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. परिणामी सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली ही वास्तू वापराविना धूळखात पडून आहे. याच संधीचा फायदा घेत त्याठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात तुर्भेतील विभाग कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्याकरिता पहिला व दुसरा मजला वापरला जात आहे. मागील तीन महिन्यांपासून त्याठिकाणी हे विभाग कार्यालय सुरू करण्यात आले आहे. मात्र सर्वसामान्यांच्या वापरासाठी भवन खुले करणे अपेक्षित असतानाही, ही वास्तू विभाग कार्यालयासाठी वापरली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सत्ताधाऱ्यांकडून पालिकेच्या विविध कामांच्या उद्घाटनांचा सपाटा सुरू होता. त्यावेळी देखील दोन्ही वास्तूचे उद्घाटन दुर्लक्षित राहिल्याचेही आश्चर्य नगरसेविका ऋ चा पाटील यांनी व्यक्त केले आहे. तर काही दिवसात दोन्ही वास्तूंचे लोकार्पण न झाल्यास ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.