शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

आंध्र ते नवी मुंबई :हस्तकला कारागिरांचा १,१०० कि.मी.चा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 03:03 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा देत मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी वस्तूंचे उत्पन्न वाढवण्याचे आवाहन केले आहे. भारतातील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी देशात ही चळवळ उभी राहिली.

वैभव गायकर पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचा नारा देत मेक इन इंडिया अंतर्गत स्वदेशी वस्तूंचे उत्पन्न वाढवण्याचे आवाहन केले आहे. भारतातील लघुउद्योगांना चालना देण्यासाठी देशात ही चळवळ उभी राहिली. त्याच संकल्पनेचा एक भाग म्हणून दिवाळीसाठी थेट आंध्र प्रदेशातील नेलोर जिल्ह्यातून हस्तकलाकारांनी ११०० कि.मी.चा प्रवास करीत खारघर गाठले आहे.वेतापासून बनवलेल्या शोभेच्या विविध वस्तू तयार करून विकण्याचे काम या ठिकाणी आलेले आठ जणांचे कुटुंब करीत आहे. दिवाळीत आकाश कंदिलांना मोठी मागणी असते. या कारागिरांनी हाताने तयार केलेले, तर काही वेताने विणलेले विविधरंगी कंदील खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय बाजारपेठेत चायना मेड वस्तूंचे वर्चस्व आहे. मात्र, स्वदेशीच्या नाºयाला प्रतिसाद देत अनेकांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्यावर भर दिला आहे. शिवाय भारतीय हस्तकलाही चायना मेड वस्तूंच्या तोडीस तोड असल्याने खारघरमध्ये विक्रीस ठेवलेले शोभेच्या वस्तू सर्वांचेच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत. शहरातील उत्सव चौक ते टाटा रुग्णालय मार्गावर या वस्तू रस्त्याच्या एका बाजूला विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. याकरिता थेट आंध्रप्रदेशातून ट्रक भरून वेताचे लाकूड आणण्यात आले असून दिवसभर विविध वस्तू विणण्याचे काम कारागिरांकडून सुरू असते.

टॅग्स :diwaliदिवाळी