शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

...तर अंंबरनाथलाही धोका

By admin | Updated: May 31, 2016 03:05 IST

नागरी वस्ती औद्योगिक क्षेत्रात असलेले डोंबिवली हे राज्यातील एकमेव शहर आहे. औद्योगिक क्षेत्र व निवासी क्षेत्र यांच्यात ५०० मीटरचे अंतर असायला

मुरलीधर भवार, डोंबिवलीनागरी वस्ती औद्योगिक क्षेत्रात असलेले डोंबिवली हे राज्यातील एकमेव शहर आहे. औद्योगिक क्षेत्र व निवासी क्षेत्र यांच्यात ५०० मीटरचे अंतर असायला हवे, असा नियम आहे. मात्र, असा बफर झोन डोंबिवलीत तयार केला गेला नाही. अंबरनाथमध्ये ज्या गतीने नागरी वस्ती वाढत आहे, ते पाहता जर तेथे ‘बफर’च्या मर्यादेचे उल्लंघन झाले तर पुढील दुर्घटना तेथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जाणकारांचे मत आहे.डोंबिवलीत औद्योगिक वसाहत विकसित झाली, तेव्हा त्याठिकाणी लोकवस्ती नव्हती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत. मात्र, डोंबिवली ही एकमेव औद्योगिक वसाहत आहे, जेथे उद्योगांबरोबर रहिवासी क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. हे क्षेत्र मुळात कामगारांच्या घरासाठी राखून ठेवण्यात आले होते. परंतु, कामगारांची आर्थिक कुवत नसल्याने हे नागरी वसाहतीचे प्लॉट आर्थिक कुवत असलेल्या अधिकारी, वकील, डॉक्टर यांनी विकत घेतले. त्यामुळे रहिवासी वसाहतीच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला गेला. कारखान्यांच्या क्षेत्रापासून ५०० मीटरच्या अंतरात रहिवासी बांधकामाला मंजुरी दिली जात नाही. मात्र, डोंबिवलीच्याबाबतीत सरकारने बफर झोन तयार केलाच नाही. एमआयडीसी, कल्याण-डोंबिवली महापालिका व जिल्हाधिकारी यांनीही नागरी वस्ती औद्योगिक क्षेत्रापासून दूर असावी, याचे भान ठेवले नाही. परिणामी, शहराचे आणि औद्योगिक वसाहतीचे नियोजन बिघडले. डोंबिवलीतील कारखान्यांना नागरी वस्तीचा वेढा पडला आहे. त्याचबरोबर सागाव, सोनारपाडा, मानपाडा, दावडी, आजदे ही नागरी वस्ती औद्योगिक कारखान्यांना लागून आहे. राज्य सरकारने २७ गावे महापालिकेतून वगळली, तेव्हा वगळलेला बहुतांश भाग औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित होता. गावात बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार एमएमआरडीएकडे होते. मात्र, ग्रामपंचायतीने बांधकामांना परवानग्या दिल्या. बेकायदा बांधकामे उभी राहिली. त्यामुळे बफर झोनचे उल्लंघन झाले. अंबरनाथमध्ये अतिरिक्त औद्योगिक वसाहत लोकवस्तीपासून लांब होती. तेथे मोठे गृहसंकुलांचे प्रकल्प उभारले जात आहेत. कल्याण, बदलापूर-कात्रपकडून विकसित होणाऱ्या इमारती औद्योगिक क्षेत्राला येऊन भिडणार आहेत. चिखलोलीत रासायनिक कारखाने ते अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या दरम्यान बडे गृह प्रकल्प सुरू झाले आहेत. खोणीगाव ते तळोजा मार्गावर मोठी गृहसंकुले उभारली जात आहेत. डोंबिवलीच्या स्फोटातून धडा न घेता अंबरनाथमध्ये औद्योगिक क्षेत्रात रहिवासी क्षेत्र विकसित करण्यास परवानगी दिली जात असल्याने डोंबिवलीच्या स्फोटाची पुनरावृत्ती येथे होण्याची भीती उद्योजक नंदकुमार भागवत यांनी व्यक्त केली. भागवत यांनी सांगितले की, घरडा सर्कल ते खंबाळपाडा-टाटानाका रोडवर रस्त्यालगत इमारती विकसित केल्या जात होत्या, तेव्हा ‘कामा’ संघटनेने त्याला हरकत घेतली होती. ही हरकत नियोजन प्राधिकरणांनी विचारात न घेतल्याने आज खंबाळपाडा परिसर नव्या गृहसंकुलांनी भरला आहे. डोंबिवली हे अनियंत्रित विकासाचे बळी ठरले आहे. डोंबिवलीचे उद्योग अंबरनाथला स्थलांतरित केल्यावर तेथे वाढत असलेल्या लोकवस्तीकडून पुन्हा काही वर्षांनी उद्योग स्थलांतरित करण्याची मागणी होईल. त्यात उद्योजक भरडले जातील, असे भागवत यांनी स्पष्ट केले आहे.