शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

आंबेत पूल अवजड वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 04:15 IST

गोरेगाव पोलिसांची कार्यवाही : वाळू व्यावसायिकांना नोटीस; वेग ताशी २० किमी तर वजन २० टन अपेक्षित

सिकंदर अनवारे

दासगाव : रायगड जिल्ह्यातील महाड आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत, टोल आणि दादली हे तीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक स्थितीत असल्याने जाहीर केले होते. मात्र त्यानंतर देखील अवजड वाहतूक सुरूच राहिल्याने गोरेगाव पोलिसांनी आंबेत पुलावरील अवजड वाहतूक गेली दोन दिवसापासून बंद केली आहे. परिसरातील वाळू व्यावसायिकांना याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

दादली, आंबेत आणि टोल हे रायगड जिल्ह्यातील महत्वाचे पूल आहेत. या तिन्ही पुलामुळे दोन्ही जिल्ह्यातील गावांचा संपर्क महामार्गाला जोडला गेला आहे. बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या काळात हे तिन्ही पूल पूर्ण झाले आहेत. या पुलाची डागडुजी न झाल्याने हे तिन्ही पूल सध्या धोकादायक स्थितीत आहेत असा निष्कर्ष अधीक्षक अभियंता पूल विभाग यांनी काढला आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम महाड यांनी या तिन्ही पुलावरील वाहतूक ताशी २० किमी आणि २० टन क्षमता ठेवण्यात आली आहे. पूल कमकुवत असल्याचा फलक देखील या तिन्ही पुलावर लावण्यात आला आहे. या पुलावर वाहतूक सुरूच राहिल्याने अखेर गोरेगाव पोलिसांनी अवजड वाहतुकीस बंदी घातली आहे.

आंबेत पूल हा गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस चौक्या उभ्या केल्या आहेत. रात्रंदिवस या पुलावर होत असलेल्या वाहनचालकांना या चौकीसमोर माहिती घेऊनच पुढे जावे लागत आहे. हा पूल कमकुवत असल्याचा फलक लावण्यात आला आहे. या तिन्ही पुलावरून वाळू वाहतूक होत असते. सद्यस्थिती लक्षात घेऊन गोरेगाव पोलिसांनी ठोस निर्णय घेत अवजड वाहतूक बंद केली आहे. त्याच बरोबर कारवाई म्हणून आंबेत परिसरात असलेल्या वाळू व्यावसायिकांना २० टनापेक्षा अधिक वाहतूक करू नये तसेच पुलाच्या १०० मीटरच्या परिसरात कोणतेही वाळू उत्खनन करू नये अशी नोटीस देण्यात आली आहे.गोरेगाव पोलिसांनी केलेली कार्यवाही कौतुकास्पद असून आजही महाड आणि टोल पुलावरून वाळू वाहतूक सुरूच आहे. गोरेगाव पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे महाड पोलीस कार्यवाही करतील का असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तिन्ही पूल कमकुवत असल्याने त्याची दुरुस्ती करून तात्पुरता वापर करणे किंवा हे पूल पुन्हा नव्याने बांधणे गरजेचे आहे. तात्पुरती दुरुस्ती करून अवजड वाहतूक करण्याची क्षमता वाढणार नाही अशा स्थितीत काही दिवसातच सावित्री खाडीचा हातपाटी आणि ड्रेजरचा लिलाव होणार आहे.सध्याची कारवाई जी गोरेगाव पोलीस करत आहेत तीच कारवाई ठेका दिल्यानंतर याठिकाणी गोरेगाव पोलीस कायम ठेवतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.आंबेत पूल कमकुवत असल्याचा फलक लावण्यात आल्याने या पुलावरून २० टनापेक्षा अधिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिवाय या परिसरातील वाळू व्यावसायिकांना देखील तशा सूचना करण्यात आल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.- आर.आर.पवार,पोलीस नाईक 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTrafficवाहतूक कोंडी