शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
2
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
3
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
4
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
5
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
6
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
7
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
8
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
9
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
10
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
11
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
12
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
13
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
14
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
15
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
16
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
17
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
18
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
19
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
20
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच

आंबेत पूल अवजड वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 04:15 IST

गोरेगाव पोलिसांची कार्यवाही : वाळू व्यावसायिकांना नोटीस; वेग ताशी २० किमी तर वजन २० टन अपेक्षित

सिकंदर अनवारे

दासगाव : रायगड जिल्ह्यातील महाड आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत, टोल आणि दादली हे तीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक स्थितीत असल्याने जाहीर केले होते. मात्र त्यानंतर देखील अवजड वाहतूक सुरूच राहिल्याने गोरेगाव पोलिसांनी आंबेत पुलावरील अवजड वाहतूक गेली दोन दिवसापासून बंद केली आहे. परिसरातील वाळू व्यावसायिकांना याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

दादली, आंबेत आणि टोल हे रायगड जिल्ह्यातील महत्वाचे पूल आहेत. या तिन्ही पुलामुळे दोन्ही जिल्ह्यातील गावांचा संपर्क महामार्गाला जोडला गेला आहे. बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या काळात हे तिन्ही पूल पूर्ण झाले आहेत. या पुलाची डागडुजी न झाल्याने हे तिन्ही पूल सध्या धोकादायक स्थितीत आहेत असा निष्कर्ष अधीक्षक अभियंता पूल विभाग यांनी काढला आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम महाड यांनी या तिन्ही पुलावरील वाहतूक ताशी २० किमी आणि २० टन क्षमता ठेवण्यात आली आहे. पूल कमकुवत असल्याचा फलक देखील या तिन्ही पुलावर लावण्यात आला आहे. या पुलावर वाहतूक सुरूच राहिल्याने अखेर गोरेगाव पोलिसांनी अवजड वाहतुकीस बंदी घातली आहे.

आंबेत पूल हा गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस चौक्या उभ्या केल्या आहेत. रात्रंदिवस या पुलावर होत असलेल्या वाहनचालकांना या चौकीसमोर माहिती घेऊनच पुढे जावे लागत आहे. हा पूल कमकुवत असल्याचा फलक लावण्यात आला आहे. या तिन्ही पुलावरून वाळू वाहतूक होत असते. सद्यस्थिती लक्षात घेऊन गोरेगाव पोलिसांनी ठोस निर्णय घेत अवजड वाहतूक बंद केली आहे. त्याच बरोबर कारवाई म्हणून आंबेत परिसरात असलेल्या वाळू व्यावसायिकांना २० टनापेक्षा अधिक वाहतूक करू नये तसेच पुलाच्या १०० मीटरच्या परिसरात कोणतेही वाळू उत्खनन करू नये अशी नोटीस देण्यात आली आहे.गोरेगाव पोलिसांनी केलेली कार्यवाही कौतुकास्पद असून आजही महाड आणि टोल पुलावरून वाळू वाहतूक सुरूच आहे. गोरेगाव पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे महाड पोलीस कार्यवाही करतील का असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तिन्ही पूल कमकुवत असल्याने त्याची दुरुस्ती करून तात्पुरता वापर करणे किंवा हे पूल पुन्हा नव्याने बांधणे गरजेचे आहे. तात्पुरती दुरुस्ती करून अवजड वाहतूक करण्याची क्षमता वाढणार नाही अशा स्थितीत काही दिवसातच सावित्री खाडीचा हातपाटी आणि ड्रेजरचा लिलाव होणार आहे.सध्याची कारवाई जी गोरेगाव पोलीस करत आहेत तीच कारवाई ठेका दिल्यानंतर याठिकाणी गोरेगाव पोलीस कायम ठेवतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.आंबेत पूल कमकुवत असल्याचा फलक लावण्यात आल्याने या पुलावरून २० टनापेक्षा अधिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिवाय या परिसरातील वाळू व्यावसायिकांना देखील तशा सूचना करण्यात आल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.- आर.आर.पवार,पोलीस नाईक 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTrafficवाहतूक कोंडी