शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेत पूल अवजड वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 04:15 IST

गोरेगाव पोलिसांची कार्यवाही : वाळू व्यावसायिकांना नोटीस; वेग ताशी २० किमी तर वजन २० टन अपेक्षित

सिकंदर अनवारे

दासगाव : रायगड जिल्ह्यातील महाड आणि म्हसळा तालुक्यातील आंबेत, टोल आणि दादली हे तीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक स्थितीत असल्याने जाहीर केले होते. मात्र त्यानंतर देखील अवजड वाहतूक सुरूच राहिल्याने गोरेगाव पोलिसांनी आंबेत पुलावरील अवजड वाहतूक गेली दोन दिवसापासून बंद केली आहे. परिसरातील वाळू व्यावसायिकांना याबाबत नोटीस देण्यात आली आहे.

दादली, आंबेत आणि टोल हे रायगड जिल्ह्यातील महत्वाचे पूल आहेत. या तिन्ही पुलामुळे दोन्ही जिल्ह्यातील गावांचा संपर्क महामार्गाला जोडला गेला आहे. बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या काळात हे तिन्ही पूल पूर्ण झाले आहेत. या पुलाची डागडुजी न झाल्याने हे तिन्ही पूल सध्या धोकादायक स्थितीत आहेत असा निष्कर्ष अधीक्षक अभियंता पूल विभाग यांनी काढला आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम महाड यांनी या तिन्ही पुलावरील वाहतूक ताशी २० किमी आणि २० टन क्षमता ठेवण्यात आली आहे. पूल कमकुवत असल्याचा फलक देखील या तिन्ही पुलावर लावण्यात आला आहे. या पुलावर वाहतूक सुरूच राहिल्याने अखेर गोरेगाव पोलिसांनी अवजड वाहतुकीस बंदी घातली आहे.

आंबेत पूल हा गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस चौक्या उभ्या केल्या आहेत. रात्रंदिवस या पुलावर होत असलेल्या वाहनचालकांना या चौकीसमोर माहिती घेऊनच पुढे जावे लागत आहे. हा पूल कमकुवत असल्याचा फलक लावण्यात आला आहे. या तिन्ही पुलावरून वाळू वाहतूक होत असते. सद्यस्थिती लक्षात घेऊन गोरेगाव पोलिसांनी ठोस निर्णय घेत अवजड वाहतूक बंद केली आहे. त्याच बरोबर कारवाई म्हणून आंबेत परिसरात असलेल्या वाळू व्यावसायिकांना २० टनापेक्षा अधिक वाहतूक करू नये तसेच पुलाच्या १०० मीटरच्या परिसरात कोणतेही वाळू उत्खनन करू नये अशी नोटीस देण्यात आली आहे.गोरेगाव पोलिसांनी केलेली कार्यवाही कौतुकास्पद असून आजही महाड आणि टोल पुलावरून वाळू वाहतूक सुरूच आहे. गोरेगाव पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीप्रमाणे महाड पोलीस कार्यवाही करतील का असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. तिन्ही पूल कमकुवत असल्याने त्याची दुरुस्ती करून तात्पुरता वापर करणे किंवा हे पूल पुन्हा नव्याने बांधणे गरजेचे आहे. तात्पुरती दुरुस्ती करून अवजड वाहतूक करण्याची क्षमता वाढणार नाही अशा स्थितीत काही दिवसातच सावित्री खाडीचा हातपाटी आणि ड्रेजरचा लिलाव होणार आहे.सध्याची कारवाई जी गोरेगाव पोलीस करत आहेत तीच कारवाई ठेका दिल्यानंतर याठिकाणी गोरेगाव पोलीस कायम ठेवतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.आंबेत पूल कमकुवत असल्याचा फलक लावण्यात आल्याने या पुलावरून २० टनापेक्षा अधिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. शिवाय या परिसरातील वाळू व्यावसायिकांना देखील तशा सूचना करण्यात आल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.- आर.आर.पवार,पोलीस नाईक 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTrafficवाहतूक कोंडी