शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या सन्मानासाठी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरेल

By admin | Updated: October 15, 2016 06:57 IST

महापौर सुधाकर सोनावणे यांनी आयुक्तांच्या कार्यशैलीविषयी नाराजी व्यक्त करून मनपा मुख्यालयावरच बहिष्कार टाकला आहे.

नवी मुंबई : महापौर सुधाकर सोनावणे यांनी आयुक्तांच्या कार्यशैलीविषयी नाराजी व्यक्त करून मनपा मुख्यालयावरच बहिष्कार टाकला आहे. राजकीय व प्रशासकीय कोंडीमुळे एकाकी पडलेल्या महापौरांच्या मदतीला आरपीआय धावून आली आहे. शहराच्या प्रथम नागरिकाच्या सन्मानासाठी आमचा पक्ष रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला असून आंबेडकर स्मारकाचे काम रखडले असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आणिबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये दरी निर्माण झाली आहे. प्रशासन सर्वसाधारण सभेच्या निर्णयांचीही अंमलबजावणी करत नसल्यामुळे नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकदाही भेट घेतली नसल्याने व प्रशासन लोकहिताच्या कामाविषयी दिलेल्या सूचनांचे पालन करत नसल्यामुळे महापौर सुधाकर सोनावणे यांनी मनपा मुख्यालयावरच बहिष्कार टाकला आहे. शहरात निर्माण झालेल्या पेचप्रसंगामध्ये महापौर एकटे पडले असल्यामुळे आरपीआयने पत्रकार परिषद घेवून आम्ही महापौरांसोबत असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा अध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी आंबेडकरी चळवळीमधून आलेल्या महापौरांचा वारंवार अवमान होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहराच्या प्रथम नागरिकाचा सन्मान राखला पाहिजे. महापौरांनी बहिष्कार मागे घेवून पुन्हा मुख्यालयात जावून कामकाजाची धुरा सांभाळावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रशासनाने त्यांची एकाधिकारशाही थांबविली नाही तर आरपीआय रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. सोनावणे यांनी ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावे, स्मारकाच्या डोमला मार्बल लावण्यासाठी आग्रह धरला होता. पण अनेक दिवसांपासून स्मारकाचे कामही ठप्प झाले असून तो आंबेडकरी जनतेचाही अवमान असल्याचे स्पष्ट केले. आरपीआयचे नेते महेश खरे यांनीही आम्ही ठामपणे महापौरांसोबत असल्याचे स्पष्ट केले. शिवसेना नगरसेवक संजू वाढे हेही आरपीआयच्या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते. अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची शिवसेनेची भूमिका राहिली आहे. महापालिकेमध्ये सद्यस्थितीमध्ये प्रशासनाची मनमानी सुरू आहे. लोकशाही मूल्यांची पायमल्ली होत आहे. लोकप्रतिनिधींना योग्य मान दिला जात नाही. त्यांच्या सूचनांचा आदर केला जात नसून प्रशासनाच्या मनमानीचे ९ मुद्दे उपस्थित केले. महापालिकेमध्ये आणिबाणीची स्थिती सुरू असून लवकरच याविषयी मार्ग निघाला नाही तर आंदोलन करावे लागेल असे स्पष्ट केले. यावेळी यशपाल होवाळ, शीलाताई बुदडे, रमेश गांगुर्डे व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.