शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

जप्त केलेल्या मुद्देमालाचे वाटप

By admin | Updated: January 6, 2016 01:13 IST

शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी जप्त केलेल्या ऐवजाचे वाटप करण्यात आले. सानपाडा येथे झालेल्या या कार्यक्रमात ४१ जणांचा ६४

नवी मुंबई : शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी जप्त केलेल्या ऐवजाचे वाटप करण्यात आले. सानपाडा येथे झालेल्या या कार्यक्रमात ४१ जणांचा ६४ लाख २७ हजार ८३९ रुपये किमतीचा ऐवज परत देण्यात आला. यावेळी चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू खुलले होते.शहरात गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात नवी मुंबई पोलीस कौशल्य पणाला लावत आहेत. यानुसार गतकाळात पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केलेला आहे. त्यानुसार चोरीला गेलेला हा ऐवज मंगळवारी सानपाडा येथे न्यायालयाच्या आदेशाने संबंधितांना परत देण्यात आला. महाराष्ट्र पोलिसांच्या स्थापना दिन निमित्ताने साजऱ्या होत असलेल्या सप्ताहांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६४ लाख २७ हजार ८३९ रुपये किमतीचा ऐवज ४१ जणांना परत देण्यात आला. त्यामध्ये पोलिसांनी शिताफीने उकल केलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांचाही समावेश होता. जिल्हा सत्र न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश एम. सी. खडके, अपर पोलीस आयुक्त विजय चव्हाण, उपायुक्त सुरेश मेंगडे, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे गुन्हेगारही गुन्ह्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करीत असल्याचे सेवानिवृत्त न्यायाधीश एम. सी. खडके यांनी सांगितले. अशा गुन्हेगारांसोबत दोन हात करण्यासाठी करण्यासाठी पोलीसही झटत असतात. अशावेळी नागरिकांनीही पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा, असेही त्यांनी सांगितले.चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना काही नागरिकांनी पोलिसांना सिंघमची उपमा दिली. परंतु चित्रपटामध्ये आणि प्रत्यक्षात पोलिसांचे वास्तव्य भिन्न असल्याचे अपर आयुक्त विजय चव्हाण यांनी सांगितले. सिंघमप्रमाणे काम करणारे आमच्यातही आहेत, मात्र त्यांच्यावर गुन्हेगारांशी लढताना कायद्याचे बंधन असते. यामुळे चित्रपटातल्या पोलिसांप्रमाणे खऱ्या पोलिसांना वागता येत नसल्याचेही ते म्हणाले. गुन्ह्याचा पोलिसांनी तत्काळ उलगडा करावा, अशी नागरिकांची अपेक्षा असते. परंतु पोलिसांवरच जबाबदारी सोपवण्याऐवजी नागरिकांनीही कर्तव्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे अपर आयुक्त चव्हाण यांनी सांगितले. गुन्हे टाळण्यासाठी पोलिसांनी शहरभर माहिती पत्रके वाटलेली आहेत. घरफोडी, सोनसाखळी चोरी तसेच सायबर गुन्ह्यांत फसवणूक व इतर गुन्हे टाळण्यासाठी घ्यायच्या खबरदारीची माहिती त्यामध्ये होती. तसेच भाडेकरू, कामगार व सुरक्षारक्षक ठेवताना त्याची माहिती पोलिसांना देण्याचेही आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले होते. मात्र पोलीस पत्रके वाटून थकले तरीही स्वत:च्या संपत्तीची काळजी कशी घ्यायची, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता झालेली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यामुळे घडलेल्या गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल साधी कौतुकाची थाप मिळाली तरी पोलीस समाधानी असतात, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)