शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

जप्त केलेल्या मुद्देमालाचे वाटप

By admin | Updated: January 6, 2016 01:13 IST

शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी जप्त केलेल्या ऐवजाचे वाटप करण्यात आले. सानपाडा येथे झालेल्या या कार्यक्रमात ४१ जणांचा ६४

नवी मुंबई : शहरात घडलेल्या विविध गुन्ह्यांची उकल करून पोलिसांनी जप्त केलेल्या ऐवजाचे वाटप करण्यात आले. सानपाडा येथे झालेल्या या कार्यक्रमात ४१ जणांचा ६४ लाख २७ हजार ८३९ रुपये किमतीचा ऐवज परत देण्यात आला. यावेळी चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू खुलले होते.शहरात गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासह घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात नवी मुंबई पोलीस कौशल्य पणाला लावत आहेत. यानुसार गतकाळात पोलिसांनी अनेक गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केलेला आहे. त्यानुसार चोरीला गेलेला हा ऐवज मंगळवारी सानपाडा येथे न्यायालयाच्या आदेशाने संबंधितांना परत देण्यात आला. महाराष्ट्र पोलिसांच्या स्थापना दिन निमित्ताने साजऱ्या होत असलेल्या सप्ताहांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ६४ लाख २७ हजार ८३९ रुपये किमतीचा ऐवज ४१ जणांना परत देण्यात आला. त्यामध्ये पोलिसांनी शिताफीने उकल केलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांचाही समावेश होता. जिल्हा सत्र न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश एम. सी. खडके, अपर पोलीस आयुक्त विजय चव्हाण, उपायुक्त सुरेश मेंगडे, साहाय्यक आयुक्त धनराज दायमा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे गुन्हेगारही गुन्ह्यासाठी आधुनिक पद्धतीचा वापर करीत असल्याचे सेवानिवृत्त न्यायाधीश एम. सी. खडके यांनी सांगितले. अशा गुन्हेगारांसोबत दोन हात करण्यासाठी करण्यासाठी पोलीसही झटत असतात. अशावेळी नागरिकांनीही पोलिसांवर विश्वास ठेवायला हवा, असेही त्यांनी सांगितले.चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना काही नागरिकांनी पोलिसांना सिंघमची उपमा दिली. परंतु चित्रपटामध्ये आणि प्रत्यक्षात पोलिसांचे वास्तव्य भिन्न असल्याचे अपर आयुक्त विजय चव्हाण यांनी सांगितले. सिंघमप्रमाणे काम करणारे आमच्यातही आहेत, मात्र त्यांच्यावर गुन्हेगारांशी लढताना कायद्याचे बंधन असते. यामुळे चित्रपटातल्या पोलिसांप्रमाणे खऱ्या पोलिसांना वागता येत नसल्याचेही ते म्हणाले. गुन्ह्याचा पोलिसांनी तत्काळ उलगडा करावा, अशी नागरिकांची अपेक्षा असते. परंतु पोलिसांवरच जबाबदारी सोपवण्याऐवजी नागरिकांनीही कर्तव्याचे पालन करणे गरजेचे असल्याचे अपर आयुक्त चव्हाण यांनी सांगितले. गुन्हे टाळण्यासाठी पोलिसांनी शहरभर माहिती पत्रके वाटलेली आहेत. घरफोडी, सोनसाखळी चोरी तसेच सायबर गुन्ह्यांत फसवणूक व इतर गुन्हे टाळण्यासाठी घ्यायच्या खबरदारीची माहिती त्यामध्ये होती. तसेच भाडेकरू, कामगार व सुरक्षारक्षक ठेवताना त्याची माहिती पोलिसांना देण्याचेही आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले होते. मात्र पोलीस पत्रके वाटून थकले तरीही स्वत:च्या संपत्तीची काळजी कशी घ्यायची, याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता झालेली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. यामुळे घडलेल्या गुन्ह्यांची उकल केल्याबद्दल साधी कौतुकाची थाप मिळाली तरी पोलीस समाधानी असतात, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)