शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
3
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
4
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
5
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
6
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
7
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
10
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
11
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
12
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
13
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
14
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
15
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
16
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
17
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
18
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
19
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
20
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

सारेच पक्ष संभ्रमित आणि गोंधळलेले

By admin | Updated: January 7, 2015 22:22 IST

घरचं झालं थोडं अन् व्याह्याने धाडलं घोडं... अशी अवस्था पालघर जि.प.च्या निवडणुकांमुळे सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे.

पालघर / वसई : घरचं झालं थोडं अन् व्याह्याने धाडलं घोडं... अशी अवस्था पालघर जि.प.च्या निवडणुकांमुळे सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे. ते विधानसभेच्या पराभवातून अद्याप सावरलेले नाहीत. त्यानंतर, पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते यांनी मारलेल्या बेडूकउड्या असे चित्र असताना आता या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे इच्छुक, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते सगळ्यांची अवस्था संभ्रमित झाली आहे. या निवडणुका फक्त ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतच होणार असल्याने कोणत्याही पक्षाच्या श्रेष्ठींना त्याचे पुरेसे गांभीर्य नाही. त्यामुळे आघाडी अथवा महायुती करायची काय? असल्यास कोणाशी करायची? तसे ठरले तर वाटाघाटींचे सूत्र काय असावे? वाटाघाटींत कुणाला समाविष्ट करून घ्यावे? या कशाचीही कोणालाही कल्पना नाही. निवडणूक म्हटले की, निरीक्षक नेमणे, अर्ज मागविणे, मुलाखती घेणे, हे नेहमीचे सोपस्कार पार पाडण्यासाठी लागणारा वेळही उरलेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था तर इतकी बिकट आहे की, नाव घ्यावे असा एकही धडाडीचा नेता उरलेला नाही. त्यामुळे कोणी कुणाकडे बघावे, हा प्रश्नच निर्माण झाला आहे. एकच इच्छुक चार-चार पक्षांकडे उमेदवारी मागण्याची चिन्हे असल्याने कुणावर किती विश्वास टाकावा? हा प्रश्न पक्षांना भेडसावतो आहे. जिल्हा विभाजन आणि आरक्षण यामुळे अनेक मातब्बर निवडणुकीपूर्वीच जेरीला आलेले आहेत. त्यामुळे निवडणुकांबाबत निराशाजनक वातावरण आहे. (विशेष प्रतिनिधी)