शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

सारेच पक्ष संभ्रमित आणि गोंधळलेले

By admin | Updated: January 7, 2015 22:22 IST

घरचं झालं थोडं अन् व्याह्याने धाडलं घोडं... अशी अवस्था पालघर जि.प.च्या निवडणुकांमुळे सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे.

पालघर / वसई : घरचं झालं थोडं अन् व्याह्याने धाडलं घोडं... अशी अवस्था पालघर जि.प.च्या निवडणुकांमुळे सर्वच राजकीय पक्षांची झाली आहे. ते विधानसभेच्या पराभवातून अद्याप सावरलेले नाहीत. त्यानंतर, पक्षातील अनेक नेते, कार्यकर्ते यांनी मारलेल्या बेडूकउड्या असे चित्र असताना आता या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे इच्छुक, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते सगळ्यांची अवस्था संभ्रमित झाली आहे. या निवडणुका फक्त ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतच होणार असल्याने कोणत्याही पक्षाच्या श्रेष्ठींना त्याचे पुरेसे गांभीर्य नाही. त्यामुळे आघाडी अथवा महायुती करायची काय? असल्यास कोणाशी करायची? तसे ठरले तर वाटाघाटींचे सूत्र काय असावे? वाटाघाटींत कुणाला समाविष्ट करून घ्यावे? या कशाचीही कोणालाही कल्पना नाही. निवडणूक म्हटले की, निरीक्षक नेमणे, अर्ज मागविणे, मुलाखती घेणे, हे नेहमीचे सोपस्कार पार पाडण्यासाठी लागणारा वेळही उरलेला नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था तर इतकी बिकट आहे की, नाव घ्यावे असा एकही धडाडीचा नेता उरलेला नाही. त्यामुळे कोणी कुणाकडे बघावे, हा प्रश्नच निर्माण झाला आहे. एकच इच्छुक चार-चार पक्षांकडे उमेदवारी मागण्याची चिन्हे असल्याने कुणावर किती विश्वास टाकावा? हा प्रश्न पक्षांना भेडसावतो आहे. जिल्हा विभाजन आणि आरक्षण यामुळे अनेक मातब्बर निवडणुकीपूर्वीच जेरीला आलेले आहेत. त्यामुळे निवडणुकांबाबत निराशाजनक वातावरण आहे. (विशेष प्रतिनिधी)