शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
3
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
4
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
5
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
6
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
7
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
9
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
10
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
11
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
12
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
13
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
14
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
15
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
16
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
17
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
18
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
19
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
20
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

विवाहितेच्या हत्येप्रकरणी आजन्म कारावास

By admin | Updated: July 15, 2016 01:39 IST

कळंबोली येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या विवाहितेच्या हत्येप्रकरणी तिच्या सासरच्यांना न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे

नवी मुंबई : कळंबोली येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या विवाहितेच्या हत्येप्रकरणी तिच्या सासरच्यांना न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तसेच हुंड्यासाठी छळ करुन गळा आवळून हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मांडलेल्या सबळ पुराव्या आधारे न्यायालयाने तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.कळंबोली येथे राहणाऱ्या मधू यादव या विवाहितेची १६ एप्रिल २०१२ रोजी गळा आवळून हत्या झाली होती. याप्रकरणी तिच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत मधूचा पती समितकुमार यादव (३२), सासरा अखिलेशकुमार (६६) व सासू सुनिता (५८) यांनी गळा आवळून तिची हत्या केली होती. त्यांच्याकडून मधूचा चारित्र्याच्या संशयावरुन छळ सुरु होता. शिवाय हुंड्यासाठी देखील तिला मानसिक त्रास दिला जात होता. मानाप्रमाणे लग्नात खर्च न केल्याचे टोमणे मारत तिला माहेरुन कार मागण्यासाठीही भाग पाडले जात होते. अखेर त्यांनी गळा आवळून तिची हत्या केली होती. याप्रकरणी मधूच्या माहेरच्यांनी सासरच्यांविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी सासरच्यांविरोधातले सबळ पुरावे जमा करुन ते न्यायालयापुढे मांडले होते. यानुसार चार वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात आरोपींना शिक्षा व्हावी याकरिता उपआयुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी जे.डी. तांबे न्यायालयात लढा देत होते. अखेर त्यांनी मांडलेल्या सबळ पुराव्याच्या आधारे न्यायालयाने तिघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. (प्रतिनिधी)