शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेच्या हत्येप्रकरणी आजन्म कारावास

By admin | Updated: July 15, 2016 01:39 IST

कळंबोली येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या विवाहितेच्या हत्येप्रकरणी तिच्या सासरच्यांना न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे

नवी मुंबई : कळंबोली येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या विवाहितेच्या हत्येप्रकरणी तिच्या सासरच्यांना न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तसेच हुंड्यासाठी छळ करुन गळा आवळून हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मांडलेल्या सबळ पुराव्या आधारे न्यायालयाने तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.कळंबोली येथे राहणाऱ्या मधू यादव या विवाहितेची १६ एप्रिल २०१२ रोजी गळा आवळून हत्या झाली होती. याप्रकरणी तिच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत मधूचा पती समितकुमार यादव (३२), सासरा अखिलेशकुमार (६६) व सासू सुनिता (५८) यांनी गळा आवळून तिची हत्या केली होती. त्यांच्याकडून मधूचा चारित्र्याच्या संशयावरुन छळ सुरु होता. शिवाय हुंड्यासाठी देखील तिला मानसिक त्रास दिला जात होता. मानाप्रमाणे लग्नात खर्च न केल्याचे टोमणे मारत तिला माहेरुन कार मागण्यासाठीही भाग पाडले जात होते. अखेर त्यांनी गळा आवळून तिची हत्या केली होती. याप्रकरणी मधूच्या माहेरच्यांनी सासरच्यांविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी सासरच्यांविरोधातले सबळ पुरावे जमा करुन ते न्यायालयापुढे मांडले होते. यानुसार चार वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात आरोपींना शिक्षा व्हावी याकरिता उपआयुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी जे.डी. तांबे न्यायालयात लढा देत होते. अखेर त्यांनी मांडलेल्या सबळ पुराव्याच्या आधारे न्यायालयाने तिघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. (प्रतिनिधी)