शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

विवाहितेच्या हत्येप्रकरणी आजन्म कारावास

By admin | Updated: July 15, 2016 01:39 IST

कळंबोली येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या विवाहितेच्या हत्येप्रकरणी तिच्या सासरच्यांना न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे

नवी मुंबई : कळंबोली येथे चार वर्षांपूर्वी घडलेल्या विवाहितेच्या हत्येप्रकरणी तिच्या सासरच्यांना न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेवून तसेच हुंड्यासाठी छळ करुन गळा आवळून हत्या झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी मांडलेल्या सबळ पुराव्या आधारे न्यायालयाने तिघांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.कळंबोली येथे राहणाऱ्या मधू यादव या विवाहितेची १६ एप्रिल २०१२ रोजी गळा आवळून हत्या झाली होती. याप्रकरणी तिच्या सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मयत मधूचा पती समितकुमार यादव (३२), सासरा अखिलेशकुमार (६६) व सासू सुनिता (५८) यांनी गळा आवळून तिची हत्या केली होती. त्यांच्याकडून मधूचा चारित्र्याच्या संशयावरुन छळ सुरु होता. शिवाय हुंड्यासाठी देखील तिला मानसिक त्रास दिला जात होता. मानाप्रमाणे लग्नात खर्च न केल्याचे टोमणे मारत तिला माहेरुन कार मागण्यासाठीही भाग पाडले जात होते. अखेर त्यांनी गळा आवळून तिची हत्या केली होती. याप्रकरणी मधूच्या माहेरच्यांनी सासरच्यांविरोधात तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी सासरच्यांविरोधातले सबळ पुरावे जमा करुन ते न्यायालयापुढे मांडले होते. यानुसार चार वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात आरोपींना शिक्षा व्हावी याकरिता उपआयुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी जे.डी. तांबे न्यायालयात लढा देत होते. अखेर त्यांनी मांडलेल्या सबळ पुराव्याच्या आधारे न्यायालयाने तिघांनाही आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. (प्रतिनिधी)