शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा जपणारे अजिंठा सांस्कृतिक प्रतिष्ठान

By वैभव गायकर | Updated: August 13, 2023 14:40 IST

पुरोगामी महाराष्ट्राला एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

- वैभव गायकर

पुरोगामी महाराष्ट्राला एक मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा जपणे हे सर्वांचेच आद्य कर्तव्य आहे. हाच वारसा जपण्याचे ध्येय उराशी बाळगून अजिंठा सांस्कृतिक प्रतिष्ठानची स्थापना १ जानेवारी १९९१ रोजी करण्यात आली. कामानिमित्त मुंबईत स्थायिक झालेले विशेषतः कर्नाटक, तेलंगणा, मराठवाडा भागातील रहिवासी या प्रतिष्ठानसोबत जोडले गेले आहेत. ऐरोली, नवी मुंबई या ठिकाणी प्रतिष्ठानचे नोंदणीकृत कार्यालय आहे.

६१ आजीव सभासद असलेल्या या प्रतिष्ठानमध्ये ३२१ सर्वसाधारण सभासद आहेत. महाराष्ट्राचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा आणि लेणी, विहार, मंदिर यांचा अभ्यासक्रम आणि जनहितासाठी त्यांचे प्रकाशन करणे आदी उपक्रम या संस्थेचे सभासद मुंबई उपनगर, नवी मुंबई, पनवेल परिसरात राबवत असतात. या उपक्रमाचाच भाग म्हणून दरवर्षी अजिंठा, एलोरा, काळाराम मंदिर, भाजा कार्ले लेणी आणि कान्हेरी लेणी आदी ठिकाणची सहल आयोजित करून मुंबईत या संस्थेच्या सभासदांना तसेच निवडक विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संस्कृती पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. दरवर्षी हैदराबाद मुक्ती संग्रामातील (कर्नाटक, तेलंगणा आणि मराठवाडा) वारसांचा सन्मान करणे, हैदराबाद संस्थानातून मुंबई महानगरात स्थायिक झालेल्या कन्नड, तेलुगु, मराठी भाषिकांचा संयुक्त मेळावा आयोजित करणे, आंतरप्रांतीय  बहुभाषिक स्नेहमेळावा आयोजित करणे आदी कार्यक्रम दरवर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी राबविले जातात.

कर्नाटक, तेलंगणा, मराठवाडा भागातील मुंबई निवासी मराठी भाषिकांना मुंबई प्रातांत वैद्यकीय मदत व शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, शालेय - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सत्कार, आपत्कालीन परिस्थितीत सापडलेल्या नागरिकांना प्रासंगिक मदत करणे, महिलांना सर्व क्षेत्रात संधीतील समानता प्राप्त करून देण्यासाठी विशेष व्याख्यान वर्ग परिसंवाद, करिअरच्या संधी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे काम प्रतिष्ठान आवर्जून करीत असते. विविध क्षेत्रांत विशेष योगदान दिलेल्या महिला, पुरुषांचा गौरव, सन्मान, सत्कार करणे.

सीमा भागातील रहिवाशांना आधार 

कर्नाटक, तेलंगणा या महाराष्ट्राच्या सीमा भागात मराठी भाषिक वसलेले आहेत. कामानिमित्त अथवा नोकरीसाठी मुंबईत आल्यावर प्रत्येकाला गावाची आठवण येतच असते. अशा वेळी अजिंठा सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आवर्जून गावाकडील माणसांना मदतीचा हात देऊन मुंबईसारख्या भागात एक प्रकारचा धीर देत असतात.कार्यकारिणी अध्यक्ष  कमलताई शंकर हावरगेकरसरचिटणीस डाॅ. प्रवीण डी. सूर्यवंशीकोषाध्यक्षछाया भगवान कांबळेसल्लागार धम्म मेघासदस्य विमल श्रावणकुमार, अमरचंद हाडोळतीकर, जयश्री एन. सूर्यवंशी गुत्तीकर, अशोक लगाडे

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई