शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

विमानतळ भूसंपादन प्रकरण : ४० हेक्टरच्या भूधारकांची ‘लार’मधून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:47 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने ६७१ हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्यापैकी ४0 हेक्टर जमिनीच्या भूधारकांनी भूसंपादनासाठी वेळेत संमतीपत्र न दिल्याने केंद्र शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार (लार) त्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या कायद्यानुसार मिळणारा लाभ राज्य शासनाने देऊ केलेल्या लाभापेक्षा कमी आहे. मात्र, आता या भूधारकांची लारच्या कायद्यातून सुटका झाली असून त्यांनाही राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुनर्वसन पॅकेजनुसार मोबदला मिळणार आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने ६७१ हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्यापैकी ४0 हेक्टर जमिनीच्या भूधारकांनी भूसंपादनासाठी वेळेत संमतीपत्र न दिल्याने केंद्र शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार (लार) त्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या कायद्यानुसार मिळणारा लाभ राज्य शासनाने देऊ केलेल्या लाभापेक्षा कमी आहे. मात्र, आता या भूधारकांची लारच्या कायद्यातून सुटका झाली असून त्यांनाही राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुनर्वसन पॅकेजनुसार मोबदला मिळणार आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एकूण २२४३ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील ११६0 हेक्टर जागेवर विमानतळ उभारले जाणार आहे. यापैकी स्थानिकांकडून ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. सुरुवातीला प्रकल्पग्रस्तांनी भूसंपादनाला विरोध केला. त्यामुळे राज्य सरकारने १ मार्च २0१४ रोजी आकर्षक पुनर्वसन पॅकेज जाहीर केले. त्याला प्रतिसाद देत अनेक प्रकल्पग्रस्तांनी निर्धारित वेळेत भूसंपादनासाठी संमतीपत्रे दिली. त्यानुसार त्यांचे निवाडेही जाहीर करण्यात आले, परंतु काही भूधारकांनी संमतीपत्रे देण्यास विरोध दर्शविला. दिलेल्या मुदतीत संमतीपत्रे प्राप्त न झाल्याने केंद्र शासनाने २0१३ मध्ये जाहीर केलेल्या लॅण्ड अ‍ॅक्वीझेशन अ‍ॅण्ड रिहॅबिलेशन (लार) या नव्या भूसंपादन कायद्यानुसार सिडकोने ४0 हेक्टर जमीन संपादित केली. विशेष म्हणजे लारच्या निवाड्यानुसार मिळणारा संपादित जमिनीचा लाभ राज्य शासनाच्या पॅकेजपेक्षा कमी आहे. त्यामुळे लारचे निवाडे जाहीर झालेल्या ४0 हेक्टर जमिनीच्या भूधारकांनी राज्य शासनाच्या निर्णयानुसार भूसंपादनाचा लाभ मिळावा, यासाठी सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला होता. तसेच काही प्रकल्पग्रस्तांनी थेट राज्य सरकारला साकडे घातले, तर काहींनी थेट न्यायालयात धाव घेतली होती.अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सिडकोच्या उप जिल्हाधिकाºयांनी (भूसंपादन) संबंधितांकडून अर्ज मागविले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या लोक अदालतीत एकूण ७३ प्रकरणे सादर करण्यात आली होती. त्यापैकी ३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. सुनावणीच्या वेळी संबंधित भूधारकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली बाजू मांडली. शेवटी ही प्रकरणे निकाली काढून संबंधितांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाभाच्या सुधारित योजनेत समावेश करण्यात आला. संपादित केलेल्या ४0 हेक्टर जमिनीच्या मालकांना याचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई