शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
4
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
5
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
7
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
8
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
9
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
10
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
11
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
12
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
13
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
14
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
15
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
16
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
17
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
18
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
19
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
20
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक

विमानतळ भूसंपादन प्रकरण : ४० हेक्टरच्या भूधारकांची ‘लार’मधून सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:47 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने ६७१ हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्यापैकी ४0 हेक्टर जमिनीच्या भूधारकांनी भूसंपादनासाठी वेळेत संमतीपत्र न दिल्याने केंद्र शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार (लार) त्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या कायद्यानुसार मिळणारा लाभ राज्य शासनाने देऊ केलेल्या लाभापेक्षा कमी आहे. मात्र, आता या भूधारकांची लारच्या कायद्यातून सुटका झाली असून त्यांनाही राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुनर्वसन पॅकेजनुसार मोबदला मिळणार आहे.

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सिडकोने ६७१ हेक्टर जमीन संपादित केली आहे. त्यापैकी ४0 हेक्टर जमिनीच्या भूधारकांनी भूसंपादनासाठी वेळेत संमतीपत्र न दिल्याने केंद्र शासनाच्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार (लार) त्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या कायद्यानुसार मिळणारा लाभ राज्य शासनाने देऊ केलेल्या लाभापेक्षा कमी आहे. मात्र, आता या भूधारकांची लारच्या कायद्यातून सुटका झाली असून त्यांनाही राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुनर्वसन पॅकेजनुसार मोबदला मिळणार आहे.नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी एकूण २२४३ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील ११६0 हेक्टर जागेवर विमानतळ उभारले जाणार आहे. यापैकी स्थानिकांकडून ६७१ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. सुरुवातीला प्रकल्पग्रस्तांनी भूसंपादनाला विरोध केला. त्यामुळे राज्य सरकारने १ मार्च २0१४ रोजी आकर्षक पुनर्वसन पॅकेज जाहीर केले. त्याला प्रतिसाद देत अनेक प्रकल्पग्रस्तांनी निर्धारित वेळेत भूसंपादनासाठी संमतीपत्रे दिली. त्यानुसार त्यांचे निवाडेही जाहीर करण्यात आले, परंतु काही भूधारकांनी संमतीपत्रे देण्यास विरोध दर्शविला. दिलेल्या मुदतीत संमतीपत्रे प्राप्त न झाल्याने केंद्र शासनाने २0१३ मध्ये जाहीर केलेल्या लॅण्ड अ‍ॅक्वीझेशन अ‍ॅण्ड रिहॅबिलेशन (लार) या नव्या भूसंपादन कायद्यानुसार सिडकोने ४0 हेक्टर जमीन संपादित केली. विशेष म्हणजे लारच्या निवाड्यानुसार मिळणारा संपादित जमिनीचा लाभ राज्य शासनाच्या पॅकेजपेक्षा कमी आहे. त्यामुळे लारचे निवाडे जाहीर झालेल्या ४0 हेक्टर जमिनीच्या भूधारकांनी राज्य शासनाच्या निर्णयानुसार भूसंपादनाचा लाभ मिळावा, यासाठी सिडकोकडे पाठपुरावा सुरू केला होता. तसेच काही प्रकल्पग्रस्तांनी थेट राज्य सरकारला साकडे घातले, तर काहींनी थेट न्यायालयात धाव घेतली होती.अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सिडकोच्या उप जिल्हाधिकाºयांनी (भूसंपादन) संबंधितांकडून अर्ज मागविले होते. गेल्या आठवड्यात झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत या प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. या लोक अदालतीत एकूण ७३ प्रकरणे सादर करण्यात आली होती. त्यापैकी ३२ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. सुनावणीच्या वेळी संबंधित भूधारकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून आपली बाजू मांडली. शेवटी ही प्रकरणे निकाली काढून संबंधितांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या लाभाच्या सुधारित योजनेत समावेश करण्यात आला. संपादित केलेल्या ४0 हेक्टर जमिनीच्या मालकांना याचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई