शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

ऐरोलीत सलग १७ तास बत्तीगूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:07 IST

बारावीच्या परीक्षार्थींची गैरसाय : महावितरणविरोधात असंतोष

नवी मुंबई : महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. बुधवारी ऐरोली विभागात सलग १७ तास विद्युतपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. या प्रकाराबद्दल रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, किमान परीक्षेच्या कालावधीत तरी विजेचा लंपडाव थांबवावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

घणसोली, ऐरोली विभागात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. अचानक विद्युतपुरवठा खंडित होणे, डीपी बॉक्सला आग लागणे, उघड्या केबल्स, शॉर्टसर्किटच्या वाढत्या घटना आदी प्रकारामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत. अनेकदा रात्रीच्या वेळी विद्युतपुरवठा खंडित होतो. तो पूर्ववत करण्यासाठी चार ते पाच तास लागतात. बुधवारी रात्री अचानक विद्युतपुरवठा खंडित झाला. उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीला आग लागल्याने पहाटे ४ ते रात्री ९ वाजेतपर्यंत विद्युतपुरवठा खंडित झाला. तब्बल १७ तास विद्युतपुरवठा पूर्ववत न झाल्याने बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे, सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत. तर शुक्रवारपासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरू होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. अशातच बुधवारी तब्बल १७ तास विद्युतपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले.

ऐरोली-गोठीवली दरम्यान वीजपुरवठा करणाºया केबल्सला आग लागल्याने या परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. हा बिघाड मोठा असल्याने तो दुरुस्त करण्यास विलंब लागल्याचे महावितरणच्या ऐरोली विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सतीश शिंपी यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा रहिवाशांनी दिला आहे.