शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

अग्नितांडव १० तास

By admin | Updated: July 6, 2015 06:05 IST

पावणे एमआयडीसी येथील सोनी डीएडीसी कंपनीत आग लागल्याची घटना रविवारी घडली. कंपनी बंद असल्याने जीवितहानी टळली.

नवी मुंबई : पावणे एमआयडीसी येथील सोनी डीएडीसी कंपनीत आग लागल्याची घटना रविवारी घडली. कंपनी बंद असल्याने जीवितहानी टळली असली तरी कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. परंतु आगीचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.सोनी डीएडीसी या कंपनीत सकाळी ७.१०च्या सुमारास आग लागली. कंपनीचा फायर अलार्म वाजल्याने सुरक्षारक्षकाने तत्काळ एमआयडीसी अग्निशमन दलाला त्याची माहिती दिली. त्यानुसार पावणे एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. परंतु आग वाढतच चालल्याने महापालिकेच्या वाशी, नेरूळ, ऐरोली या अग्निशमन दलांच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरुवात केली. या वेळी कंपनीचे दोन मजले आगीने पूर्णपणे घेरले गेले. अग्निशमन अधिकारी विजय राणे यांनी या आगीला महत्त्वाचा कॉल घोषित केला. त्यानुसार ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली, पनवेल, सिडको, ओएनजीसी यांचे १३ बंब घटनास्थळी दाखल झाले. १०० हून अधिक अग्निशमन कर्मचारी आग विझवण्यात गुंतले होते. १० तासांनी संध्याकाळी ५ वाजता ही आग आटोक्यात आली. त्यानंतरही रात्री उशिरापर्यंत कूलिंगचे काम सुरूच होते, असे राणे यांनी सांगितले. या ठिकाणी आॅप्टिकल डिस्क, सीडी, डीव्हीडी, कॉम्पॅक्ट डिस्क, डिजिटल व्हिडीओ डिस्क आदी तयार होत असे. ही उत्पादने देश - विदेशात पाठवले जात असल्याने कंपनीत त्याचा मोठा साठा होता. परंतु कंपनीला शनिवार-रविवार सुटी असल्याने आग लागली तेव्हा कामगार उपस्थित नव्हते. कामगार असताना आग लागली असती तर सुमारे ७० हून अधिक कामगारांचा जीव धोक्यात आला असता. आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुराचे लोट तयार झाले. परंतु धूर बाहेर पडण्यासाठी जागाच नसल्याने तो आतच कोंडला गेला. या धुरामुळे कंपनीच्या आत जाऊन आग विझवण्यात अग्निशमन कर्मचाऱ्यांना अडचणी येत होत्या. सुरुवातीला आॅक्सिजन सिलिंडरसोबत घेऊन ते आत शिरले. परंतु कंपनीत सर्वत्र पसरलेल्या धुरामुळे काहीच दिसत नसल्याने त्यांना परत बाहेर यावे लागले. अखेर कोंडलेला धूर बाहेर काढण्यासाठी तसेच आतमध्ये पाण्याचा मारा करण्यासाठी खिडक्यांच्या काचा फोडाव्या लागल्या. कंपनीच्या यूपीएस रूममध्ये आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, आगीचे वृत्त कळताच पोलीस उपायुक्त शहाजी उमाप, वरिष्ठ निरीक्षक चंद्रसेन देशमुख, वाहतूक पोलीसहेदेखील घटनास्थळी उपस्थित होते. कंपनीच्या काही अंतरावरूनच उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली आहे. कंपनीतून निघणाऱ्या ज्वाळांमुळे ही वाहिनी पेटण्याची शक्यता निर्माण झाली होती. शिवाय अग्निशमनाच्या कामातही अडथळा येत होता. त्यामुळे वीजपुरवठाही खंडित करण्यात आला. (प्रतिनिधी)