शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

सिडको विरोधातील जासईतील शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 22:05 IST

गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम बंद पडल्याने खारकोपर -उरण १४.३ किमी लांबीचा दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे काम आणखीनच रखडणार ! 

मधुकर ठाकूर

उरण : खारकोपर -उरण १४.३ कि.मी.लांबीचा रेल्वे मार्गाचे काम मागील काही दिवसांपासून रखडले आहे. सिडकोने  संपादन केलेल्या जमिनीचा मोबदला, भुखंड वाटप देण्यास दिरंगाई केल्याने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम       प्रकल्पग्रस्तांनी विरोध केल्याने बंद पडले आहे.आधी आश्वासनांची पूर्तता त्यानंतरच काम अशी ठाम भूमिका जासई ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने घेतली असल्याची माहिती सरपंच संतोष घरत यांनी दिली. 

  सिडको,मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत २७ किमी लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाच्या नेरूळ -उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील २७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ,सीवूड,सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.त्यानंतर उर्वरित गव्हाण,रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे स्टेशन उभारणी, रेल्वे ट्रॅक टाकणे, ओव्हरहेड वायर, उड्डाण पूल उभारण्याची कामे प्रगतीपथावर आहेत.या प्रगतीपथावरील कामांच्या जोरावरच रेल्वे प्रशासनाने सप्टेंबर २०२२ प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन दिली होती.मात्र वारंवार दिलेल्या हेडलाईन्स पाळण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता नव्याने २०२३ म्हणजे पुढील वर्षाची डेडलाईनजाहीर केली आहे. मात्र खारकोपर-उरण या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे काम जोरदार सुरू असतानाच जासई ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाच्या कामालाच विरोध करत अडथळा निर्माण केला आहे.आधी सिडकोने आश्वासन दिल्याप्रमाणे ३२ शेतकऱ्यांना भुखंडाचे वाटप , मोबदला द्या त्यानंतरच काम सुरू करा.अशी कठोर भूमिका जासई ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने घेतली असल्याची माहिती सरपंच संतोष घरत यांनी दिली.शेतकऱ्यांच्या सिडकोच्या विरोधातील संतप्त भुमिकेमुळे गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम काही दिवसांपासून ठप्प पडले आहे. परिणामी खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम आणखीनच रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यामुळे मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या उरणकरांना  नेरुळ - उरण  रेल्वे मार्गावर रेल्वे धावण्याची आणखी वाट पहावी लागते की काय अशीही भीती उरणकरांना लागुन राहिली  आहे.