शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

सिडको विरोधातील जासईतील शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2022 22:05 IST

गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम बंद पडल्याने खारकोपर -उरण १४.३ किमी लांबीचा दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे काम आणखीनच रखडणार ! 

मधुकर ठाकूर

उरण : खारकोपर -उरण १४.३ कि.मी.लांबीचा रेल्वे मार्गाचे काम मागील काही दिवसांपासून रखडले आहे. सिडकोने  संपादन केलेल्या जमिनीचा मोबदला, भुखंड वाटप देण्यास दिरंगाई केल्याने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम       प्रकल्पग्रस्तांनी विरोध केल्याने बंद पडले आहे.आधी आश्वासनांची पूर्तता त्यानंतरच काम अशी ठाम भूमिका जासई ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने घेतली असल्याची माहिती सरपंच संतोष घरत यांनी दिली. 

  सिडको,मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत २७ किमी लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाच्या नेरूळ -उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील २७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ,सीवूड,सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.त्यानंतर उर्वरित गव्हाण,रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे स्टेशन उभारणी, रेल्वे ट्रॅक टाकणे, ओव्हरहेड वायर, उड्डाण पूल उभारण्याची कामे प्रगतीपथावर आहेत.या प्रगतीपथावरील कामांच्या जोरावरच रेल्वे प्रशासनाने सप्टेंबर २०२२ प्रकल्प पूर्ण करण्याची डेडलाईन दिली होती.मात्र वारंवार दिलेल्या हेडलाईन्स पाळण्यात रेल्वे प्रशासन अपयशी ठरले आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आता नव्याने २०२३ म्हणजे पुढील वर्षाची डेडलाईनजाहीर केली आहे. मात्र खारकोपर-उरण या दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे मार्गाचे काम जोरदार सुरू असतानाच जासई ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाच्या कामालाच विरोध करत अडथळा निर्माण केला आहे.आधी सिडकोने आश्वासन दिल्याप्रमाणे ३२ शेतकऱ्यांना भुखंडाचे वाटप , मोबदला द्या त्यानंतरच काम सुरू करा.अशी कठोर भूमिका जासई ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने घेतली असल्याची माहिती सरपंच संतोष घरत यांनी दिली.शेतकऱ्यांच्या सिडकोच्या विरोधातील संतप्त भुमिकेमुळे गव्हाण ते जासई या मार्गाला जोडणाऱ्या पुलाचे काम काही दिवसांपासून ठप्प पडले आहे. परिणामी खारकोपर ते उरण रेल्वे मार्गाचे काम आणखीनच रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.यामुळे मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या उरणकरांना  नेरुळ - उरण  रेल्वे मार्गावर रेल्वे धावण्याची आणखी वाट पहावी लागते की काय अशीही भीती उरणकरांना लागुन राहिली  आहे.