शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

विसर्जनानंतर फळे, नैवेद्यही निर्माल्यात !

By admin | Updated: September 13, 2016 03:01 IST

बाप्पाचे विसर्जन करताना भक्तांकडून निर्माल्याचे विसर्जन केले जाते. मात्र यावेळी निर्माल्याबरोबरच नैवद्य, उरलेले अन्नही टाकण्यात येत असल्याने पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी

सूर्यकांत वाघमारे , नवी मुंबई बाप्पाचे विसर्जन करताना भक्तांकडून निर्माल्याचे विसर्जन केले जाते. मात्र यावेळी निर्माल्याबरोबरच नैवद्य, उरलेले अन्नही टाकण्यात येत असल्याने पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निर्माल्यात टाकण्यात येणारे अन्न उपयोगात येऊ शकते, चांगले पदार्थ देखील निर्माल्य कुंडात टाकले जात असल्याचे गौरी-गणपतीच्या विसर्जनाच्यावेळी निदर्शनास आले. त्यामुळे अन्नाच्या नासाडीबाबत गणेशभक्तांमध्ये जनजागृती होण्याची गरज असल्याचे मत मुंढे यांनी व्यक्त केले आहे. बाप्पाच्या आगमनानंतर घरातील आबालवृध्द सारेच त्याच्या सेवेला लागतात. त्याच्या पाहुणचारात काहीही कमी पडू नये याकरिता सजावटीसह मोदक, लाडू, पेढे, नैवेद्याचे योग्य नियोजन केले जाते. काही ठिकाणी बाप्पासमोर ठेवण्यात येणारी फळे, नवैद्याचे वाटप करण्यात येते. तर काही जण त्यांचे निर्माल्यास विसर्जन करतात. शनिवारी वाशीतील विसर्जन तलावाला भेट दिली असता हा प्रकार आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास आला. गणेशभक्तांनी निर्माल्य कुंडात टाकलेला केळीचा घड उचलून त्यांनी पाहणी केली. खाण्यासाठी योग्य असतानाही ही केळी निर्माल्य कुंडात टाकण्यात आली होती. निर्माल्याच्या सफरचंद, नारळ, नैवेद्य टाकण्यात येत असल्याने मुंढे यांनी नाराजी व्यक्त केली. दीड दिवसांपासून ते दहा दिवसाच्या विसर्जना दरम्यान प्रत्येक विसर्जन स्थळावरील निर्माल्य कलशामध्ये हेच चित्र पहायला मिळत असते. अनेकदा मूर्ती सोबत हार फुलाच्या निर्माल्याचे विसर्जन करताना फळे देखिल पाण्यात सोडली जातात. अथवा निर्माल्य कलशात टाकली जातात. परंतु हिच फळे व पदार्थ गरीब गरजूंना दिल्यास त्यांची भूक भागवू शकतात, असा विचार अनेकांकडून केला जात नाही. घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाच्या सेवेसाठी अनेक गणेश मंडळांकडून दहा दिवस सकाळ संध्याकाळ पुरोहितांकडून पूजाअर्चा केली जाते. घरगुती बाप्पांच्या सेवेसाठी तर अवघे कुटुंबच आघाडीवर असते. मात्र बाप्पाचे विसर्जन करताना अनेकांकडून निर्माल्याबरोबरच फळे, नारळ, नैवद्याचेही विसर्जन करण्यात येत असल्याने अन्नाची नाहक नासाडी होते. या पदार्थ्यांचे प्रसाद म्हणून वाटप होण्यास काहीच हरकत नाही.गरीब वस्तीतील मुलांना ही फळे दिल्यास त्यांनाही बाप्पाच्या प्रसाद मिळू शकेल. यंदा शहरात तसेच पनवेल परिसरातील अनेक मंडळांनी सामाजिक संदेश देणारे, प्रबोधनात्मक, ऐतिहासीक देखावे साकारले आहेत. हे देखावे पहाण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. याशिवाय अनेक मंडळांकडून विविध स्पर्धा, आरोग्य, रक्तदान शिबिर, अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. मात्र केवळ देखाव्यातून सामाजिक संदेश देण्याऐवजी सामाजिक बांधीलकी जपण्यावरही मंडळांनी भर देण्याची गरज आहे.