शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
4
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
5
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
6
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
7
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
8
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
9
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
11
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
12
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
13
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
14
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
15
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
16
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
17
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
18
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
19
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
20
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  

स्वच्छ भारत अभियान संपताच प्रसाधनगृहांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 02:25 IST

अभियानादरम्यान पालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून शहरामध्ये नवीन प्रसाधनगृहे उभारली.

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान संपताच शहरातील अनेक स्वच्छतागृहांच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सीवूड, बोनसरीसह अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांना टाळे लागले आहेत. यामुळे स्वच्छतेची चळवळ अभियानापुरतीच मर्यादित होती का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळाला. अभियानादरम्यान पालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून शहरामध्ये नवीन प्रसाधनगृहे उभारली. जुन्या प्रसाधनगृहांची डागडुजी करण्यात आली. स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी ठेकेदारांची नियुक्तीही करण्यात आली होती. परंतु अभियान संपताच स्वच्छतेकडे दुर्लक्ष सुरू झाले आहे. सीवूडमधील एनएमएमटीच्या डेपोमध्ये नवीन प्रसाधनगृह उभे केले होते. अभियान सुरू असताना ते सुरू केले होते. अभियान संपताच त्याला टाळे लावले आहेत. आता पुढील वर्षी अभियानामध्येच पुन्हा ते सुरू करणार का असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे. बोनसरी गावातील नाल्याच्या बाजूलाही अभियान काळात फिरते शौचालय बसविले होते. ते अद्याप सुरू झालेले नाही. शौचालयासाठी मल वाहून नेणारी वाहिनी टाकण्यात आलेली नाही. फक्त दिखाव्यापुरतीच सोय करण्यात आलेली आहे. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरही नवीन प्रसाधनगृह उभारले असून ते अद्याप सुरू केलेले नाही.प्रसाधनगृहांच्या देखभालीची स्थितीही बिकट आहे. सायन - पनवेल महामार्गावर वाशीजवळील प्रसाधनगृहामधील मलनि:सारणचे पाणी रोडवर येवू लागले आहे. प्रसाधनगृहाच्या बाजूला डबके तयार झाले असून दुर्गंधी पसरू लागली आहे. याठिकाणी चोवीस तास प्रवाशांची ये - जा असते. पण रात्री प्रसाधनगृह बंद ठेवले जात आहे.सारसोळे सेक्टर ६ व रामलीला मैदानाला लागून असलेल्या प्रसाधनगृहाचीही योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही. मुंबईकृषी उत्पन्न बाजार समितीच्याभाजी, धान्य मार्केटजवळील प्रसाधनगृहांची योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान