शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

स्वच्छ भारत अभियान संपताच प्रसाधनगृहांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 02:25 IST

अभियानादरम्यान पालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून शहरामध्ये नवीन प्रसाधनगृहे उभारली.

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान संपताच शहरातील अनेक स्वच्छतागृहांच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सीवूड, बोनसरीसह अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांना टाळे लागले आहेत. यामुळे स्वच्छतेची चळवळ अभियानापुरतीच मर्यादित होती का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळाला. अभियानादरम्यान पालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून शहरामध्ये नवीन प्रसाधनगृहे उभारली. जुन्या प्रसाधनगृहांची डागडुजी करण्यात आली. स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी ठेकेदारांची नियुक्तीही करण्यात आली होती. परंतु अभियान संपताच स्वच्छतेकडे दुर्लक्ष सुरू झाले आहे. सीवूडमधील एनएमएमटीच्या डेपोमध्ये नवीन प्रसाधनगृह उभे केले होते. अभियान सुरू असताना ते सुरू केले होते. अभियान संपताच त्याला टाळे लावले आहेत. आता पुढील वर्षी अभियानामध्येच पुन्हा ते सुरू करणार का असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे. बोनसरी गावातील नाल्याच्या बाजूलाही अभियान काळात फिरते शौचालय बसविले होते. ते अद्याप सुरू झालेले नाही. शौचालयासाठी मल वाहून नेणारी वाहिनी टाकण्यात आलेली नाही. फक्त दिखाव्यापुरतीच सोय करण्यात आलेली आहे. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरही नवीन प्रसाधनगृह उभारले असून ते अद्याप सुरू केलेले नाही.प्रसाधनगृहांच्या देखभालीची स्थितीही बिकट आहे. सायन - पनवेल महामार्गावर वाशीजवळील प्रसाधनगृहामधील मलनि:सारणचे पाणी रोडवर येवू लागले आहे. प्रसाधनगृहाच्या बाजूला डबके तयार झाले असून दुर्गंधी पसरू लागली आहे. याठिकाणी चोवीस तास प्रवाशांची ये - जा असते. पण रात्री प्रसाधनगृह बंद ठेवले जात आहे.सारसोळे सेक्टर ६ व रामलीला मैदानाला लागून असलेल्या प्रसाधनगृहाचीही योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही. मुंबईकृषी उत्पन्न बाजार समितीच्याभाजी, धान्य मार्केटजवळील प्रसाधनगृहांची योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान