शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

स्वच्छ भारत अभियान संपताच प्रसाधनगृहांना टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 02:25 IST

अभियानादरम्यान पालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून शहरामध्ये नवीन प्रसाधनगृहे उभारली.

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियान संपताच शहरातील अनेक स्वच्छतागृहांच्या देखभालीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सीवूड, बोनसरीसह अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांना टाळे लागले आहेत. यामुळे स्वच्छतेची चळवळ अभियानापुरतीच मर्यादित होती का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळाला. अभियानादरम्यान पालिकेने कोट्यवधी रूपये खर्च करून शहरामध्ये नवीन प्रसाधनगृहे उभारली. जुन्या प्रसाधनगृहांची डागडुजी करण्यात आली. स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी ठेकेदारांची नियुक्तीही करण्यात आली होती. परंतु अभियान संपताच स्वच्छतेकडे दुर्लक्ष सुरू झाले आहे. सीवूडमधील एनएमएमटीच्या डेपोमध्ये नवीन प्रसाधनगृह उभे केले होते. अभियान सुरू असताना ते सुरू केले होते. अभियान संपताच त्याला टाळे लावले आहेत. आता पुढील वर्षी अभियानामध्येच पुन्हा ते सुरू करणार का असा प्रश्न येथील नागरिकांनी केला आहे. बोनसरी गावातील नाल्याच्या बाजूलाही अभियान काळात फिरते शौचालय बसविले होते. ते अद्याप सुरू झालेले नाही. शौचालयासाठी मल वाहून नेणारी वाहिनी टाकण्यात आलेली नाही. फक्त दिखाव्यापुरतीच सोय करण्यात आलेली आहे. नेरूळ रेल्वे स्टेशनच्या बाहेरही नवीन प्रसाधनगृह उभारले असून ते अद्याप सुरू केलेले नाही.प्रसाधनगृहांच्या देखभालीची स्थितीही बिकट आहे. सायन - पनवेल महामार्गावर वाशीजवळील प्रसाधनगृहामधील मलनि:सारणचे पाणी रोडवर येवू लागले आहे. प्रसाधनगृहाच्या बाजूला डबके तयार झाले असून दुर्गंधी पसरू लागली आहे. याठिकाणी चोवीस तास प्रवाशांची ये - जा असते. पण रात्री प्रसाधनगृह बंद ठेवले जात आहे.सारसोळे सेक्टर ६ व रामलीला मैदानाला लागून असलेल्या प्रसाधनगृहाचीही योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही. मुंबईकृषी उत्पन्न बाजार समितीच्याभाजी, धान्य मार्केटजवळील प्रसाधनगृहांची योग्य पद्धतीने देखभाल केली जात नाही.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान