शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

‘त्या’ महाविद्यालयांत प्रवेश प्रक्रिया सुरूच!

By admin | Updated: August 5, 2014 00:05 IST

तंत्रशिक्षण परिषदेने 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांची मान्यता नाकारली आहे. त्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी विद्याथ्र्याची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे.

नवी मुंबई : तंत्रशिक्षण परिषदेने 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांची मान्यता नाकारली आहे. त्यानंतरही अनेक महाविद्यालयांनी विद्याथ्र्याची प्रवेश प्रक्रिया सुरू ठेवली आहे. परंतु मान्यता रद्द झाल्याची बाब लपवून प्रवेश दिले जात असल्याने पालक व विद्याथ्र्याची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
    अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी सन 2क्14-15 या शैक्षणिक वर्षाकरिता 15 अभियांत्रिकी महाविद्यालयांची मान्यता रद्द केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक 9 अभियांत्रिकी महाविद्यालये ही नवी मुंबई क्षेत्रतील आहेत. परंतु मान्यता रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालयांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु अद्याप त्यासंबंधीचा अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी विद्याथ्र्याचे प्रवेश घेतल्यास ते न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन तात्पुरत्या स्वरुपाचे असतील असेही सूचित केले आहे. तर या प्रकारासंबंधीची माहिती विद्यार्थी व पालकांना देणो आवश्यक असल्याचेही सूचनेत म्हटले आहे. नेरूळ येथील एसआयईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, नवीन पनवेलचे पिल्लई, कोपरखैरणोतील इंदिरा गांधी आणि लोकमान्य टिळक अभियांत्रिकी महाविद्यालय, ऐरोली येथील दत्ता मेघे यासह सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयांचाही समावेश आहे. नवी मुंबईतील संबंधित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये सर्रास प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. परंतु प्रवेश घेतलेल्या अनेक विद्याथ्र्याना त्या महाविद्यालयाची मान्यता रद्द झाल्याची माहिती देखील नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्याथ्र्याच्या भवितव्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. भविष्यात न्यायालयाने देखील या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला तर या विद्याथ्र्याची मोठी शैक्षणिक हानी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
 
मनविसेने लावले होर्डिग
मान्यता रद्द असतानाही विद्याथ्र्याचे प्रवेश घेतले जात असल्याने अशा विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवी मुंबईतील अशा अभियांत्रिकी महाविद्यालयांबाहेर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने होर्डिग लावले आहेत. त्यावर तंत्रशिक्षण संचालनालयाच्या आदेशाची प्रत प्रसिध्द करण्यात आली आहे. अनेक महाविद्यालयांनी विद्याथ्र्याची दिशाभूल करून प्रवेश प्रक्रिया राबवल्याचे मनविसेचे शहर अध्यक्ष शिरीष पाटील यांचे म्हणणो आहे. त्यामुळे विद्याथ्र्याचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी संबंधित महाविद्यालयांबाहेर होर्डिग लावले असल्याचे पाटील यांनी सांगितले.