शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

टँकरसाठी प्रशासन हतबल

By admin | Updated: March 23, 2016 02:21 IST

टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या टँकरसाठी जिल्हा प्रशासनाने निविदा प्रसिध्द केली होती. त्या निविदेला जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील एकाही ठेकेदाराने प्रतिसाद दिला

आविष्कार देसाई, अलिबागटंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या टँकरसाठी जिल्हा प्रशासनाने निविदा प्रसिध्द केली होती. त्या निविदेला जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील एकाही ठेकेदाराने प्रतिसाद दिला नाही. त्यातच पेण तालुक्यातील ९ गावे आणि ३५ वाड्यांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. परंतु टँकरअभावी जिल्हा प्रशासन हतबल असून, नागरिकांना एक थेंब पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याचे चित्र आहे.रायगड जिल्ह्यात सुमारे ७ कोटी ८८ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा मंजूर केला आहे. २०१५-१६ या कालावधीत जिल्ह्यातील बहुतांश धरणांमध्ये ६० टक्केच पाणी साठा शिल्लक आहे. प्रचंड उष्णतेमुळे त्यामध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. हेटवणे धरण उशाला असूनही टंचाईचा तालुका म्हणून ओळख असलेल्या पेण तालुक्यातून आतापर्यंत सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी करण्यात आलेली आहे. पेण तालुक्यामधील पाच वाड्यांची मागणी आधीच आली आहे. परंतु सरकारी टँकर नादुरुस्त असल्याने तेथे सध्या पाणीपुरवठा थांबलेला आहे. खालापूर तालुक्यातील एका वाडीमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.पेण तालुक्यातील खारेपाट विभागातील नऊ गावे आणि ३५ वाड्यांनी टँकरची मागणी केली आहे. प्रशासनाकडे सरकारी मालकीचे दोनच टँकर आहेत. त्यातील एक टँकर सध्या नादुरुस्त आहे. त्यामुळे एकच टँकर जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील नागरिकांची तहान कशी भागविणार, असा प्रश्न पडला आहे. जिल्हा प्रशासनाने वृत्तपत्रामार्फत टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जाहिरात देऊन निविदा मागविल्या होत्या. २१ मार्चला ई-टेंडरिंग होणार होते.