शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

सेवा शुल्क प्रकरणी दोषींवर कारवाई होणार, पणनमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 05:06 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सेवाशुल्क वसुली न केल्याच्या प्रकरणाचे पडसाद थेट विधानसभेमध्ये उमटले. राज्यातील ३० आमदारांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहे.

मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सेवाशुल्क वसुली न केल्याच्या प्रकरणाचे पडसाद थेट विधानसभेमध्ये उमटले. राज्यातील ३० आमदारांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहे.एपीएमसी प्रशासनाने २०११मध्ये मॉडेल उपविधी तयार केली. यामध्ये १०० रुपयांच्या विक्रीवर १ रुपया सेवाशुल्क आकारण्याचे प्रस्तावित केले आहे. २०१३मध्ये शासनाने उपविधीला मंजुरी दिली. मार्च २०१४ मध्ये तत्कालीन सचिव सुधीर तुंगार यांनी एक रुपया सेवाशुल्क आकारण्यासाठी नोटीस काढली होती. तुंगार यांच्यानंतर सचिवपदावर आलेल्या शिवाजी पहीनकर यांनी कायद्यात तरतूद नसल्यामुळे सेवाशुल्क आकारणी करण्यात येणार नसल्याची भूमिका जून २०१५मध्ये घेतली. याविषयी शासनाने अद्यादेश काढावा यासाठी पाठपुरावा सुरू केला. तेव्हापासून सेवाशुल्क आकारणी करण्यात आली नाही; पण यामुळे प्रशासनाचा २०० कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप होऊ लागला होता. याप्रकरणी मुख्य प्रशासक सतीश सोनी यांनी दोन सदस्यीय समिती नेमून चौकशी सुरू केली होती. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनामध्ये उमटले आहेत. राज्यातील तब्बल ३० आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. आशिष शेलार यांनी सेवा शुल्क आकारणी व वसुली याबाबतीत मोठा घोटाळा झालेला आहे. याविषयी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालाचे काय झाले व या प्रकरणी दोषी अधिकाºयांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला. संजय केळकर यांनीही या प्रकरणी घोटाळा झाला असून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणी पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बाजारसमितीने नेमलेल्या द्विसदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदरहून अहवालाचा अभ्यास करण्यात येणार आहे. सन्माननीय संजय केळकर यांनी शासनाच्या माध्यमातून उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी, असाही प्रश्न विचारलेला आहे; परंतु तशी समिती नेमण्याची गरज नसून द्विसदस्यीय समितीच्या अहवालाच्या आधारावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. आशिष शेलार यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये कोणी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुख