शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

सेवा शुल्क प्रकरणी दोषींवर कारवाई होणार, पणनमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 05:06 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सेवाशुल्क वसुली न केल्याच्या प्रकरणाचे पडसाद थेट विधानसभेमध्ये उमटले. राज्यातील ३० आमदारांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहे.

मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सेवाशुल्क वसुली न केल्याच्या प्रकरणाचे पडसाद थेट विधानसभेमध्ये उमटले. राज्यातील ३० आमदारांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाची चौकशी करून कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहे.एपीएमसी प्रशासनाने २०११मध्ये मॉडेल उपविधी तयार केली. यामध्ये १०० रुपयांच्या विक्रीवर १ रुपया सेवाशुल्क आकारण्याचे प्रस्तावित केले आहे. २०१३मध्ये शासनाने उपविधीला मंजुरी दिली. मार्च २०१४ मध्ये तत्कालीन सचिव सुधीर तुंगार यांनी एक रुपया सेवाशुल्क आकारण्यासाठी नोटीस काढली होती. तुंगार यांच्यानंतर सचिवपदावर आलेल्या शिवाजी पहीनकर यांनी कायद्यात तरतूद नसल्यामुळे सेवाशुल्क आकारणी करण्यात येणार नसल्याची भूमिका जून २०१५मध्ये घेतली. याविषयी शासनाने अद्यादेश काढावा यासाठी पाठपुरावा सुरू केला. तेव्हापासून सेवाशुल्क आकारणी करण्यात आली नाही; पण यामुळे प्रशासनाचा २०० कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप होऊ लागला होता. याप्रकरणी मुख्य प्रशासक सतीश सोनी यांनी दोन सदस्यीय समिती नेमून चौकशी सुरू केली होती. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनामध्ये उमटले आहेत. राज्यातील तब्बल ३० आमदारांनी प्रश्न उपस्थित केले. आशिष शेलार यांनी सेवा शुल्क आकारणी व वसुली याबाबतीत मोठा घोटाळा झालेला आहे. याविषयी समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या अहवालाचे काय झाले व या प्रकरणी दोषी अधिकाºयांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला. संजय केळकर यांनीही या प्रकरणी घोटाळा झाला असून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.या प्रकरणी पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी बाजारसमितीने नेमलेल्या द्विसदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदरहून अहवालाचा अभ्यास करण्यात येणार आहे. सन्माननीय संजय केळकर यांनी शासनाच्या माध्यमातून उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी, असाही प्रश्न विचारलेला आहे; परंतु तशी समिती नेमण्याची गरज नसून द्विसदस्यीय समितीच्या अहवालाच्या आधारावर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. आशिष शेलार यांनी विचारलेल्या प्रश्नासंदर्भात चौकशी सुरू आहे. चौकशीमध्ये कोणी दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुख