शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शहरात आरटीओची ६०४ वाहनांवर कारवाई

By admin | Updated: June 19, 2017 05:10 IST

आरटीओने मागील सहा महिन्यांत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुमारे ६०४ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये खासगी वाहनांचा समावेश असून

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : आरटीओने मागील सहा महिन्यांत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुमारे ६०४ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यामध्ये खासगी वाहनांचा समावेश असून, ठाणे-बेलापूर मार्गास उरण मार्गावर धावणारी खासगी वाहने सर्वाधिक आहेत. मात्र, अद्यापही अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याच्या कारणावरून एनएमएमटी प्रशासनाने वाहतूक पोलीस, आरटीओच्या कामगिरीबाबत असमाधान व्यक्त केले .खासगी वाहनांमधून होणारी अवैध प्रवासी वाहतूक आरटीओसह वाहतूक पोलिसांची डोकेदुखी ठरू लागली आहे. मिनी बस, जीप यामधून विविध मार्गांवर ही अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याचा परिणाम एनएमएमटीच्या प्रवासी संख्येवर होत आहे. ज्या मार्गावर एनएमएमटीच्या बस धावतात, त्याच मार्गावर बसच्या काही वेळअगोदर ही खासगी वाहने चालवली जातात. यामुळे बसच्या प्रतीक्षेत थांबलेले प्रवासी नाइलाजास्तव खासगी वाहनांतून प्रवास करतात. या वाहनचालकांकडून स्वत:च्या नफ्यासाठी काही मार्गावरील एनएमएमटीच्या बस बंद करण्याचाही प्रयत्न यापूर्वी झाला आहे. यामुळे आरटीओतर्फे मागील सहा महिन्यांत ६०४हून अधिक वाहनांवर कारवाई केली असल्याचे आरटीओ अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले. त्यामध्ये एनएमएमटी प्रशासनाद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार केलेल्या कारवायांचाही समावेश आहे. नुकतेच ठाणे येथे आरटीओ अधिकारी व परिवहन अधिकारी यांच्यात बैठक घेण्यात आली होती. या वेळीही अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा चर्चेला आला होता; परंतु अद्यापही शहरात खासगी वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याची खंत एनएमएमटीचे व्यवस्थापक शरद आरदवाड यांनी व्यक्त केली आहे. तर यासंबंधी अनेकदा आरटीओ व वाहतूक पोलिसांना पत्राद्वारे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले. अनेकदा खासगी ट्रॅव्हलर्सकडूनही अवैध वाहतूक केली जाते. सिग्नल्स, ठिकठिकाणी अवैध थांबे करून वाहतूककोंडी करण्यात येत असल्याचे दिसत आहे.