शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कायद्यासाठी कृती समिती

By admin | Updated: September 13, 2016 02:55 IST

तथाकथित संघटनांमार्फत माथाडी कायद्याचा दुरुपयोग करुन बेकायदा अर्थसत्ता पोसली जात आहे. त्यामुळे मालकवर्गासह उद्योग जगत हादरुन गेले आहे

आविष्कार देसाई,  अलिबागतथाकथित संघटनांमार्फत माथाडी कायद्याचा दुरुपयोग करुन बेकायदा अर्थसत्ता पोसली जात आहे. त्यामुळे मालकवर्गासह उद्योग जगत हादरुन गेले आहे. हा कल्याणकारी कायदा धाब्यावर बसविणाऱ्यांचे आर्थिक हात भ्रष्टाचाराच्या धडापासून वेगळे करण्यासाठी जिल्हास्तरावर लवकरच कृती समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. मालक, कामगार आणि उद्योग जगतात पसरलेला रोष त्या निमित्ताने निवळण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जाते.राज्यामध्ये विविक्षीत नोकऱ्यांमध्ये कामावर ठेवलेल्या, माथाडी, हमाल यासारख्या असंरक्षीत श्रमजीवी कामगारांच्या नोकरीचे नियमन, नोकरीच्या अटी, शर्तींची तांगली तरतूद, कल्याण, आरोग्यासह सुरक्षततेंच्या उपायांची तरतूद करण्यासाठी माथाडी, हमाल, श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ अस्तित्वात आले. या कायद्यानुसार मुंबई, ठाणे आणि रायगड या विभागात वस्तुंवर आधारीत, तर राज्यभरात जिल्हा निहाय ३६ माथाडी मंडळे निर्माण करण्यात आली आहेत. माथाडी मंडळामार्फत माथाडी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना माथाडी स्वरुपाचे कामकाज असलेल्या आस्थापनांना संबंधित माथाडी मंडळात मुख्य मालक म्हणून नोंदविण्यात येते. तेथील माथाडी कामगारांना ठराविक नोंदणी क्रमांक दिला जातो. कायदा अस्तित्वात आल्यापासून माथाडी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शेकडो संघटना निर्माण झाल्या आहेत. त्यातील काही संघटना या सराकरी मान्यता प्राप्त आहेत. अशा संघटनांनी माथाडी कामगारांंच्या प्रश्नावर आवाज उठवून सरकारला न्याय देण्यास भाग पाडले . ३६ माथाडी मंडळाकडे सुमारे दोन लाख माथाडी कामगार आहेत, त्यापैकी रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ४० हजार माथाडी कामगार असल्याचे बोलले जाते. मालक आणि कामगार यांच्यामध्ये सुसंवाद साधने हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. या कायद्याच्या तरतुदींबाबत मालकवर्गात अनभिज्ञता असल्याचे वेळोवेळी पुढे आले आहे. काही तथाकथित संघटना कायद्याचा गैरवापर करीत आहेत. माल घेऊन आलेला ट्रक कंपनीच्या गेटवरच अडवून चालकाकडून माथाडींच्या नावावर एंन्ट्री टॅक्स वसूल करणे, मुख्य मालकाकडे कामगार भरतीकरता दबाव आणणे, बेकायदा रकमेची मागणी करणे अशा विविध घटनांनामुळे मालकांसह उद्योग जगतात असंतोष पसरला होता. याबाबतच्या तक्रारी ही सरकार दरबारी गेल्या होत्या. यावर उपाय म्हणून सरकारने जिल्हास्तरावर कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माथाडी कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थीत होण्यासाठी जिल्हास्तरावर समिती काम करणार आहे. त्याबाबतचा निर्णय सरकराने संबंधितांना ६ सप्टेंबरला कळविला.