शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कायद्यासाठी कृती समिती

By admin | Updated: September 13, 2016 02:55 IST

तथाकथित संघटनांमार्फत माथाडी कायद्याचा दुरुपयोग करुन बेकायदा अर्थसत्ता पोसली जात आहे. त्यामुळे मालकवर्गासह उद्योग जगत हादरुन गेले आहे

आविष्कार देसाई,  अलिबागतथाकथित संघटनांमार्फत माथाडी कायद्याचा दुरुपयोग करुन बेकायदा अर्थसत्ता पोसली जात आहे. त्यामुळे मालकवर्गासह उद्योग जगत हादरुन गेले आहे. हा कल्याणकारी कायदा धाब्यावर बसविणाऱ्यांचे आर्थिक हात भ्रष्टाचाराच्या धडापासून वेगळे करण्यासाठी जिल्हास्तरावर लवकरच कृती समित्या स्थापन केल्या जाणार आहेत. मालक, कामगार आणि उद्योग जगतात पसरलेला रोष त्या निमित्ताने निवळण्यास मदत मिळणार असल्याचे बोलले जाते.राज्यामध्ये विविक्षीत नोकऱ्यांमध्ये कामावर ठेवलेल्या, माथाडी, हमाल यासारख्या असंरक्षीत श्रमजीवी कामगारांच्या नोकरीचे नियमन, नोकरीच्या अटी, शर्तींची तांगली तरतूद, कल्याण, आरोग्यासह सुरक्षततेंच्या उपायांची तरतूद करण्यासाठी माथाडी, हमाल, श्रमजीवी कामगार अधिनियम १९६९ अस्तित्वात आले. या कायद्यानुसार मुंबई, ठाणे आणि रायगड या विभागात वस्तुंवर आधारीत, तर राज्यभरात जिल्हा निहाय ३६ माथाडी मंडळे निर्माण करण्यात आली आहेत. माथाडी मंडळामार्फत माथाडी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करताना माथाडी स्वरुपाचे कामकाज असलेल्या आस्थापनांना संबंधित माथाडी मंडळात मुख्य मालक म्हणून नोंदविण्यात येते. तेथील माथाडी कामगारांना ठराविक नोंदणी क्रमांक दिला जातो. कायदा अस्तित्वात आल्यापासून माथाडी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शेकडो संघटना निर्माण झाल्या आहेत. त्यातील काही संघटना या सराकरी मान्यता प्राप्त आहेत. अशा संघटनांनी माथाडी कामगारांंच्या प्रश्नावर आवाज उठवून सरकारला न्याय देण्यास भाग पाडले . ३६ माथाडी मंडळाकडे सुमारे दोन लाख माथाडी कामगार आहेत, त्यापैकी रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे ४० हजार माथाडी कामगार असल्याचे बोलले जाते. मालक आणि कामगार यांच्यामध्ये सुसंवाद साधने हा या कायद्याचा प्रमुख उद्देश आहे. या कायद्याच्या तरतुदींबाबत मालकवर्गात अनभिज्ञता असल्याचे वेळोवेळी पुढे आले आहे. काही तथाकथित संघटना कायद्याचा गैरवापर करीत आहेत. माल घेऊन आलेला ट्रक कंपनीच्या गेटवरच अडवून चालकाकडून माथाडींच्या नावावर एंन्ट्री टॅक्स वसूल करणे, मुख्य मालकाकडे कामगार भरतीकरता दबाव आणणे, बेकायदा रकमेची मागणी करणे अशा विविध घटनांनामुळे मालकांसह उद्योग जगतात असंतोष पसरला होता. याबाबतच्या तक्रारी ही सरकार दरबारी गेल्या होत्या. यावर उपाय म्हणून सरकारने जिल्हास्तरावर कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माथाडी कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थीत होण्यासाठी जिल्हास्तरावर समिती काम करणार आहे. त्याबाबतचा निर्णय सरकराने संबंधितांना ६ सप्टेंबरला कळविला.