शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

गुणवत्ता ढासळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई; आयुक्तांनी दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 00:39 IST

अभियांत्रिकी विभागाची झाडाझडती, ठेकेदारांचीही गय नाही

नवी मुंबई : नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यास महानगरपालिका कटिबद्ध आहे. कोणत्याही स्थितीमध्ये गुणवत्तेशी तडजोड करू नये. गुणवत्ता ढासळल्यास अधिकारी असो किंवा कंत्राटदार कोणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्त अभिजीत बांगर यांनी अभियांत्रिकी विभागास दिला आहे.मनपा मुख्यालयात अभियांत्रिकी विभागाची आढावा बैठक घेण्यात आली होती. या बैठकीमध्ये आयुक्तांनी शहर अभियंता सुरेंद्र पाटील व इतर अधिकाऱ्यांकडून रस्ते, स्थापत्यविषयक कामे, विद्युत, पाणीपुरवठा, मलनिस्सारणसह सर्व कामांची माहिती घेतली. इतर शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये खड्डे कमी आहेत, परंतु खड्डे पडणारच नाहीत, यासाठी काळजी घेतली पाहिजे. खड्डे तत्काळ दुरुस्त झाले पाहिजेत. नागरिकांनी केलेल्या तक्रारींचे २४ ते ४८ तासांमध्ये निराकरण झाले पाहिजे. पावसाचे प्रमाण कमी झाले असल्यामुळे पुढील आठवड्यात शहरात एकही खड्डा दिसणार नाही, याची काळजी घ्या, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. सर्व कामे वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. निविदा प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविणे आवश्यक आहे. कामे बाजारभावापेक्षा कमी दराने गेली पाहिजेत. गुणवत्तेशी कोणत्याही स्थितीमध्ये तडजोड होता कामा नये. गुणवत्ता ढासळली, तर संबंधितांवर कारवाई होणार आहे.अभियंत्यांनी विनाकारण मुख्यालयात थांबू नये. कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी फिल्डवर असणे अत्यंत आवश्यक आहे. आपण नागरिकांशी बांधिल असून, नागरिकांसाठी जास्तीतजास्त उपलब्ध असले पाहिजे. दाखल तक्रारींचे तत्परतेने निराकरण झाले पाहिजे, अशा सूचनाही दिल्या आहेत. शहर अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी दक्ष राहावे व सर्व सहकारी अधिकारी कर्मचाºयांसह ठेकेदारासही दक्ष राहण्यास सांगावे, अशा सूचनाही बैठकीमध्ये देण्यात आल्या.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका