शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

बडोदा बँकेच्या खातेदारांनी घेतली ग्राहक मंचाकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:33 IST

जुईनगर येथील बडोदा बँकेच्या ग्राहकांनी ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार केली आहे.

नवी मुंबई : जुईनगर येथील बडोदा बँकेच्या ग्राहकांनी ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार केली आहे. बँकेवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेला दोन वर्षे होऊनही गुन्ह्यातील जप्तीचा ऐवज अद्यापही ग्राहकांना परत मिळू शकलेला नाही. यामध्ये बँकेची उदासीनता व निष्काळजी असल्याने ग्राहकांनी बँकेविरोधात तक्रार केली आहे.सुमारे २५ फूट लांबीचे भुयार खोदून बडोदा बँक लुटल्याची घटना जुईनगर येथे १३ नोव्हेंबर २०१७ ला उघडकीस आली होती. या घटनेच्या कित्येक दिवस अगोदर गुन्हेगारांकडून दरोड्याचा कट रचला जात होता. त्याकरिता बँकेपासून चौथ्या क्रमांकाचा गाळा भाड्याने घेऊन त्यामधून थेट बँकेच्या लॉकर रूमपर्यंत भुयार खोदण्यात आले होते. याकरिता सराईत गुन्हेगारांच्या टोळीने बँकेच्या लॉकर रूमची रेकीही केली होती. भुयार खोदून बँक लुटल्याचा देशात दुसऱ्या प्रकारचा हा दरोडा असल्याने या घटनेवरून बँकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या गुन्ह्यात आजपर्यंत पोलिसांनी एकूण १४ जणांना अटक केलेली असून, त्यापैकी एकाचा अटकेत असताना वर्षभरापूर्वी मृत्यू झाला आहे. तर एक जण गुन्ह्यानंतर फरार असतानाच मृत पावलेला आहे. या गुन्ह्यात सुमारे चार कोटींचा ऐवज लुटला गेलेला असून, त्यापैकी सुमारे दोन कोटींचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. बँकेच्या लॉकर रूममधील लॉकरचे स्कू्र खोलून त्यामधील ऐवज चोरण्यात आला होता. यामुळे बँकेच्या लॉकर ग्राहकांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान ऐवज चोरीला गेला होता. अनेकांनी त्यांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी हा ऐवज जमा करून ठेवला होता. त्यामुळे गुन्हेगारांना पकडल्यानंतर जप्त केलेला ऐवज संबंधितांना परत मिळावा, यासाठी ग्राहकांनी बँकेसह पोलिसांकडे प्रयत्न चालवले होते; परंतु बँकेने जबाबदारी ढकलल्यामुळे जप्तीचा ऐवज अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहे. तो मिळवण्यासाठी तसेच बँकेच्या विरोधात ग्राहकांनी सीबीडी येथील ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार केली आहे. त्याशिवाय जिल्हा न्यायालयातही सात तक्रार अर्ज करण्यात आले आहेत. बँकेकडून सुरक्षेत झालेल्या हलगर्जीमुळे हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटण्यात आले आहे. त्याशिवाय बँकेकडून आरबीआयच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन झाल्याचेही मुद्दे मांडण्यात आले आहेत. याकरिता तक्रारदारांच्या वकिलांनी आरबीआयकडून तसेच इतर बँकांकडून माहिती अधिकारातून मिळवलेले मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.>जुईनगर येथील दरोडा प्रकरणात बडोदा बँकेचा हलगर्जीपणा दिसून आलेला आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन होत असतानाही आरबीआयनेही बँकेवर कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. तर ग्राहकांच्या चोरीला गेलेल्या मुद्देमालाबाबत बँक जबाबदारी ढकलत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वतीने बँकेविरोधात ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार करण्यात आली आहे.- अ‍ॅड. स्वप्निल कदम,तक्रारदारांचे वकील