शहरं
Join us  
Trending Stories
1
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
2
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
3
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
4
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
5
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
6
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
7
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
8
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
9
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
10
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
11
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
12
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
13
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
14
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
15
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
16
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
17
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
18
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
19
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
20
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला

बडोदा बँकेच्या खातेदारांनी घेतली ग्राहक मंचाकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:33 IST

जुईनगर येथील बडोदा बँकेच्या ग्राहकांनी ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार केली आहे.

नवी मुंबई : जुईनगर येथील बडोदा बँकेच्या ग्राहकांनी ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार केली आहे. बँकेवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेला दोन वर्षे होऊनही गुन्ह्यातील जप्तीचा ऐवज अद्यापही ग्राहकांना परत मिळू शकलेला नाही. यामध्ये बँकेची उदासीनता व निष्काळजी असल्याने ग्राहकांनी बँकेविरोधात तक्रार केली आहे.सुमारे २५ फूट लांबीचे भुयार खोदून बडोदा बँक लुटल्याची घटना जुईनगर येथे १३ नोव्हेंबर २०१७ ला उघडकीस आली होती. या घटनेच्या कित्येक दिवस अगोदर गुन्हेगारांकडून दरोड्याचा कट रचला जात होता. त्याकरिता बँकेपासून चौथ्या क्रमांकाचा गाळा भाड्याने घेऊन त्यामधून थेट बँकेच्या लॉकर रूमपर्यंत भुयार खोदण्यात आले होते. याकरिता सराईत गुन्हेगारांच्या टोळीने बँकेच्या लॉकर रूमची रेकीही केली होती. भुयार खोदून बँक लुटल्याचा देशात दुसऱ्या प्रकारचा हा दरोडा असल्याने या घटनेवरून बँकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या गुन्ह्यात आजपर्यंत पोलिसांनी एकूण १४ जणांना अटक केलेली असून, त्यापैकी एकाचा अटकेत असताना वर्षभरापूर्वी मृत्यू झाला आहे. तर एक जण गुन्ह्यानंतर फरार असतानाच मृत पावलेला आहे. या गुन्ह्यात सुमारे चार कोटींचा ऐवज लुटला गेलेला असून, त्यापैकी सुमारे दोन कोटींचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आलेले आहे. बँकेच्या लॉकर रूममधील लॉकरचे स्कू्र खोलून त्यामधील ऐवज चोरण्यात आला होता. यामुळे बँकेच्या लॉकर ग्राहकांच्या रोख रकमेसह सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान ऐवज चोरीला गेला होता. अनेकांनी त्यांच्या मुलामुलींच्या लग्नासाठी हा ऐवज जमा करून ठेवला होता. त्यामुळे गुन्हेगारांना पकडल्यानंतर जप्त केलेला ऐवज संबंधितांना परत मिळावा, यासाठी ग्राहकांनी बँकेसह पोलिसांकडे प्रयत्न चालवले होते; परंतु बँकेने जबाबदारी ढकलल्यामुळे जप्तीचा ऐवज अद्यापही पोलिसांच्या ताब्यात आहे. तो मिळवण्यासाठी तसेच बँकेच्या विरोधात ग्राहकांनी सीबीडी येथील ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार केली आहे. त्याशिवाय जिल्हा न्यायालयातही सात तक्रार अर्ज करण्यात आले आहेत. बँकेकडून सुरक्षेत झालेल्या हलगर्जीमुळे हा गुन्हा घडल्याचे तक्रारीत म्हटण्यात आले आहे. त्याशिवाय बँकेकडून आरबीआयच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन झाल्याचेही मुद्दे मांडण्यात आले आहेत. याकरिता तक्रारदारांच्या वकिलांनी आरबीआयकडून तसेच इतर बँकांकडून माहिती अधिकारातून मिळवलेले मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.>जुईनगर येथील दरोडा प्रकरणात बडोदा बँकेचा हलगर्जीपणा दिसून आलेला आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन होत असतानाही आरबीआयनेही बँकेवर कारवाईकडे दुर्लक्ष केले आहे. तर ग्राहकांच्या चोरीला गेलेल्या मुद्देमालाबाबत बँक जबाबदारी ढकलत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वतीने बँकेविरोधात ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रार करण्यात आली आहे.- अ‍ॅड. स्वप्निल कदम,तक्रारदारांचे वकील