शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
लाच घेताना व्हिडीओ बनवायला सुरुवात केली, मोबाईल हिसकावण्याच प्रयत्न; मुंबईतील ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल
3
Post Office च्या 'या' स्कीममध्ये मिळतंय सर्वाधिक व्याज; गॅरंटीड रिटर्न सोबत बनेल पैसाच पैसा
4
'देश चालवण्यासाठी भीक मागावी लागते', युनूस यांनी विमान अपघाताबाबत केलेल्या पोस्टवर लोक संतापले
5
अरे देवा! ट्रेनमधून चोरीला गेल्या भाजपा नेत्याच्या आईच्या अस्थी; चोराला रंगेहाथ पकडलं अन्...
6
स्पेसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्यास NASA नं मनाई का केलीय, अंतराळात प्रेग्नेंट झाल्यास काय होईल?
7
Kanwar Yatra Accident: गंगेचं पाणी घेऊन निघाले अन् मृत्यूने गाठले; भाविकांच्या जत्थ्यात घुसली कार; ४ जागीच ठार
8
बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स
9
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
10
Deep Amavasya 2025 : दीप अमावस्येला मुलांना औक्षण करण्यामागे आहे 'ही' कृष्णकथा!
11
गुरुपुष्यामृतयोग: सद्गुरू सेवा शक्य नाही? १० मिनिटांत होणारे स्तोत्र म्हणा; पूर्ण पुण्य मिळवा
12
"आपणही विश्वास तोडला..."; रॅपिडो राइड दरम्यान महिलेनं स्वतःच रेकॉर्ड केला अपळा अॅक्सीडेंट - बघघा VIDEO
13
हॉलिवूडवर पसरली शोककळा, लोकप्रिय गायकाचं निधन; रणवीर सिंहनेही व्यक्त केली हळहळ
14
छोट्या दुकानदारांनी UPI QR कोड काढले, बंगळुरूतील प्रकारानंतर व्यापारी भयभीत, नेमकं काय घडले?
15
गुरुपुष्यामृतयोग म्हणजे काय? अशुभतेपासून रक्षण, पुण्य फलदायी लक्ष्मी पूजन; सुख-सुबत्ता वृद्धी
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...
18
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर किती GST आकारणार? सरकारने संसदेत दिले उत्तर
19
गुन्हेगारांचे चेहरे स्केचमधून जिवंत करणारे आर्टिस्ट बनले ‘महाराज’, धमक्या, कुटुंबाच्या काळजीमुळे सोडली मुंबई 
20
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का

कर्जत-कल्याण मार्गावर गतिरोधकांमुळे अपघात!

By admin | Updated: June 2, 2016 01:38 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर गेल्या महिनाभरापासून अनेक ठिकाणी नव्याने बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले आहेत

नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर गेल्या महिनाभरापासून अनेक ठिकाणी नव्याने बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या नव्याने टाकण्यात आलेल्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढले नसल्याने या मार्गावर अपघातांची मालिकाच सुरु आहे. या नव्याने टाकण्यात आलेल्या गतिरोधकांचा वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहने आपटत असल्याने वाहनांचे नुकसान होऊन अपघातही घडत आहेत. एमएमआरडीएने या गतिरोधक टाकणाऱ्यांवर लवकर कारवाई करून ज्या ठिकाणी गतिरोधकांची आवश्यकता नाही असे गतिरोधक काढण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांकडून केली जात आहे.कर्जत-कल्याण राज्यमार्ग कोट्यवधी रु पये खर्च करून तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर कर्जत ते शेलू वांगणी दरम्यान सुमारे ३०ते ३५ गतिरोधक टाकण्यात आले आहेत. अनेक गतिरोधक हे कोणतीही परवानगी न घेता अचानक टाकले असून त्यामुळे वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नसल्याने अचानक ब्रेक लावावा लागतो आणि त्यामुळे अपघात होत आहेत. ज्या ठिकाणी एखादे गाव, शाळा असेल तर गतिरोधक टाकणे गरजेचे आहे, परंतु गरज नसताना हे गतिरोधक कशासाठी असा प्रश्न वाहनचालक व प्रवाशांना पडला आहे. कोणतीच परवानगी न घेता जबरदस्तीने हे गतिरोधक टाकले आहेत. त्यामुळे वाहने जोरात आपटून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.काही दिवसांपूर्वी याच राज्य मार्गावर शेलू, नेरळ व देऊळवाडी येथे टाकण्यात आलेल्या गतिरोधकामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. हे गतिरोधक असे आहेत की समोर आल्याशिवाय दिसत नाही. त्यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो आणि त्यामुळे अपघात होतो. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जेथे आवश्यकता नाही अशा ठिकाणी टाकण्यात आलेले गतिरोधक लवकरात लवकर काढण्यात यावेत, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)कर्जत-कल्याण रस्त्यावर कोणतीही परवानगी न घेता अनेकांनी जबरदस्तीने हे गतिरोधक टाकले आहेत ते काढण्यात येणार आहेत. त्यासाठी आम्ही नेरळ, कर्जत पोलीस स्टेशनमध्ये पोलीस संरक्षणासाठी पत्र दिले आहे. पोलिसांचे उत्तर मिळताच लगेच अनावश्यक ठिकाणी टाकण्यात असलेले गतिरोधक काढण्यात येतील. - विनय सर्वे, उप अभियंता, एमएमआरडीएकर्जत-कल्याण राज्यमार्गावर आवश्यकता नसतानाही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गतिरोधक टाकले आहेत. ज्या ठिकाणी गतिरोधक टाकले आहेत तेथे पांढरे पट्टे ओढले नसल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे आवश्यकता नसेल अशा ठिकाणी टाकण्यात असलेले गतिरोधक काढण्यात यावेत, जेणेकरून अपघात होणार नाही.- किशोर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, डिकसळ