शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत-कल्याण मार्गावर गतिरोधकांमुळे अपघात!

By admin | Updated: June 2, 2016 01:38 IST

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर गेल्या महिनाभरापासून अनेक ठिकाणी नव्याने बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले आहेत

नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर गेल्या महिनाभरापासून अनेक ठिकाणी नव्याने बेकायदा गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या नव्याने टाकण्यात आलेल्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे ओढले नसल्याने या मार्गावर अपघातांची मालिकाच सुरु आहे. या नव्याने टाकण्यात आलेल्या गतिरोधकांचा वाहन चालकांना अंदाज येत नसल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहने आपटत असल्याने वाहनांचे नुकसान होऊन अपघातही घडत आहेत. एमएमआरडीएने या गतिरोधक टाकणाऱ्यांवर लवकर कारवाई करून ज्या ठिकाणी गतिरोधकांची आवश्यकता नाही असे गतिरोधक काढण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांकडून केली जात आहे.कर्जत-कल्याण राज्यमार्ग कोट्यवधी रु पये खर्च करून तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर कर्जत ते शेलू वांगणी दरम्यान सुमारे ३०ते ३५ गतिरोधक टाकण्यात आले आहेत. अनेक गतिरोधक हे कोणतीही परवानगी न घेता अचानक टाकले असून त्यामुळे वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नसल्याने अचानक ब्रेक लावावा लागतो आणि त्यामुळे अपघात होत आहेत. ज्या ठिकाणी एखादे गाव, शाळा असेल तर गतिरोधक टाकणे गरजेचे आहे, परंतु गरज नसताना हे गतिरोधक कशासाठी असा प्रश्न वाहनचालक व प्रवाशांना पडला आहे. कोणतीच परवानगी न घेता जबरदस्तीने हे गतिरोधक टाकले आहेत. त्यामुळे वाहने जोरात आपटून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.काही दिवसांपूर्वी याच राज्य मार्गावर शेलू, नेरळ व देऊळवाडी येथे टाकण्यात आलेल्या गतिरोधकामुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. हे गतिरोधक असे आहेत की समोर आल्याशिवाय दिसत नाही. त्यामुळे वाहनचालकांना अचानक ब्रेक लावावा लागतो आणि त्यामुळे अपघात होतो. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे जेथे आवश्यकता नाही अशा ठिकाणी टाकण्यात आलेले गतिरोधक लवकरात लवकर काढण्यात यावेत, अशी मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे. (वार्ताहर)कर्जत-कल्याण रस्त्यावर कोणतीही परवानगी न घेता अनेकांनी जबरदस्तीने हे गतिरोधक टाकले आहेत ते काढण्यात येणार आहेत. त्यासाठी आम्ही नेरळ, कर्जत पोलीस स्टेशनमध्ये पोलीस संरक्षणासाठी पत्र दिले आहे. पोलिसांचे उत्तर मिळताच लगेच अनावश्यक ठिकाणी टाकण्यात असलेले गतिरोधक काढण्यात येतील. - विनय सर्वे, उप अभियंता, एमएमआरडीएकर्जत-कल्याण राज्यमार्गावर आवश्यकता नसतानाही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गतिरोधक टाकले आहेत. ज्या ठिकाणी गतिरोधक टाकले आहेत तेथे पांढरे पट्टे ओढले नसल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही आणि त्यामुळे अपघात होत आहेत. त्यामुळे आवश्यकता नसेल अशा ठिकाणी टाकण्यात असलेले गतिरोधक काढण्यात यावेत, जेणेकरून अपघात होणार नाही.- किशोर गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते, डिकसळ