शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
4
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
5
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
6
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
7
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
8
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
9
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
10
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
11
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
12
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
13
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
14
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
15
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
16
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
17
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
18
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
19
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
20
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय

रस्त्यांवरील गैरसोयीमुळे घडताहेत अपघात

By admin | Updated: March 25, 2016 00:58 IST

रस्त्यांवरील गैरसोयीमुळे केवळ वाशी परिसरात प्रतिवर्षी किमान १२ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. अवघ्या सायन-पनवेल मार्गावरील ही परिस्थिती असून रात्रीच्या वेळी अपुरा

नवी मुंबई : रस्त्यांवरील गैरसोयीमुळे केवळ वाशी परिसरात प्रतिवर्षी किमान १२ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. अवघ्या सायन-पनवेल मार्गावरील ही परिस्थिती असून रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश, अनावश्यक ठिकाणी स्पीडब्रेकर व कामातील त्रुटी यामुळे हे अपघात घडलेले आहेत.रुंदीकरणाच्या कामानंतर सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक अधिकच गतिमान झालेली आहे. या मार्गावरून प्रतिदिन शेकडो छोटी-मोठी वाहने मुंबई, नवी मुंबई व पुण्याच्या दिशेने ये-जा करीत असतात. यावेळी सदर रस्त्यावर भेडसावणाऱ्या गैरसोयींमुळे अनेकांना अपघाताच्या घटनेशी सामना करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी वाशी खाडीपुलावर मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेला अज्ञात वाहनाने चिरडले होते. त्यानंतर रात्रभर या मृतदेहावरून छोटी-मोठी वाहने जात होती. त्यामुळे पूर्णपणे छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेहाचे तुकडे पोलिसांना जमा करावे लागले होते. पुलावरील पथदिवे बंद असल्यामुळे वाहनाच्या जेमतेम प्रकाशातच चालकांना वाहने चालवावी लागतात. त्यामुळे अशाप्रकारच्या अनेक अपघातांची नोंद वाशी पोलिसांकडे होत आहे. शिवाय टोलनाक्यालगत पुलाच्या उताराला अनावश्यक ठिकाणी बसवलेला स्पीडब्रेकर व वाशी-सानपाडादरम्यानच्या पुलाच्या कामातील त्रुटी यामुळेही अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. १० दिवसांपूर्वी एका तरुणाला मोटारसायकल अपघातामध्ये प्राण गमवावे लागले आहेत. हा तरुण सानपाडा येथून मुंबईच्या दिशेने जात असताना पामबीच मार्गावरील पुलाच्या वाढीव कामातील त्रुटीचा तो बळी ठरला. पुलाच्या सुधारकामादरम्यान मार्गाचे दोन भाग जोडण्यासाठी लोखंडी रॉडचा वापर करण्यात आलेला आहे. मात्र रेल्वेच्या रुळाप्रमाणे असलेल्या या लोखंडावर मोटारसायकल येताच चाक घसरून अपघात होत आहेत.अपघाताच्या या घटनांना आळा घालण्यासाठी सायन-पनवेल मार्गावरील त्रुटींमध्ये सुधार करून चालकांची गैरसोय दूर करण्याची गरज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यानुसार खाडीपुलावर पुरेशा प्रकाशाची सोय करून वाशी-सानपाडादरम्यानच्या पुलातील त्रुटी दूर करण्याची गरज वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)वाशी पोलीस ठाणे हद्दीत सायन-पनवेल मार्गावर दीड ते दोन कि.मी. अंतरात होणाऱ्या अशा अपघातांमध्ये प्रतिवर्षी सुमारे १२ जणांचे प्राण जात आहेत. सन २०१४ मध्ये एकूण ६४ अपघात घडले असून त्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. २०१५ मध्ये ६८ अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे.