शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

रस्त्यांवरील गैरसोयीमुळे घडताहेत अपघात

By admin | Updated: March 25, 2016 00:58 IST

रस्त्यांवरील गैरसोयीमुळे केवळ वाशी परिसरात प्रतिवर्षी किमान १२ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. अवघ्या सायन-पनवेल मार्गावरील ही परिस्थिती असून रात्रीच्या वेळी अपुरा

नवी मुंबई : रस्त्यांवरील गैरसोयीमुळे केवळ वाशी परिसरात प्रतिवर्षी किमान १२ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. अवघ्या सायन-पनवेल मार्गावरील ही परिस्थिती असून रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश, अनावश्यक ठिकाणी स्पीडब्रेकर व कामातील त्रुटी यामुळे हे अपघात घडलेले आहेत.रुंदीकरणाच्या कामानंतर सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक अधिकच गतिमान झालेली आहे. या मार्गावरून प्रतिदिन शेकडो छोटी-मोठी वाहने मुंबई, नवी मुंबई व पुण्याच्या दिशेने ये-जा करीत असतात. यावेळी सदर रस्त्यावर भेडसावणाऱ्या गैरसोयींमुळे अनेकांना अपघाताच्या घटनेशी सामना करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी वाशी खाडीपुलावर मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेला अज्ञात वाहनाने चिरडले होते. त्यानंतर रात्रभर या मृतदेहावरून छोटी-मोठी वाहने जात होती. त्यामुळे पूर्णपणे छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेहाचे तुकडे पोलिसांना जमा करावे लागले होते. पुलावरील पथदिवे बंद असल्यामुळे वाहनाच्या जेमतेम प्रकाशातच चालकांना वाहने चालवावी लागतात. त्यामुळे अशाप्रकारच्या अनेक अपघातांची नोंद वाशी पोलिसांकडे होत आहे. शिवाय टोलनाक्यालगत पुलाच्या उताराला अनावश्यक ठिकाणी बसवलेला स्पीडब्रेकर व वाशी-सानपाडादरम्यानच्या पुलाच्या कामातील त्रुटी यामुळेही अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. १० दिवसांपूर्वी एका तरुणाला मोटारसायकल अपघातामध्ये प्राण गमवावे लागले आहेत. हा तरुण सानपाडा येथून मुंबईच्या दिशेने जात असताना पामबीच मार्गावरील पुलाच्या वाढीव कामातील त्रुटीचा तो बळी ठरला. पुलाच्या सुधारकामादरम्यान मार्गाचे दोन भाग जोडण्यासाठी लोखंडी रॉडचा वापर करण्यात आलेला आहे. मात्र रेल्वेच्या रुळाप्रमाणे असलेल्या या लोखंडावर मोटारसायकल येताच चाक घसरून अपघात होत आहेत.अपघाताच्या या घटनांना आळा घालण्यासाठी सायन-पनवेल मार्गावरील त्रुटींमध्ये सुधार करून चालकांची गैरसोय दूर करण्याची गरज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यानुसार खाडीपुलावर पुरेशा प्रकाशाची सोय करून वाशी-सानपाडादरम्यानच्या पुलातील त्रुटी दूर करण्याची गरज वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)वाशी पोलीस ठाणे हद्दीत सायन-पनवेल मार्गावर दीड ते दोन कि.मी. अंतरात होणाऱ्या अशा अपघातांमध्ये प्रतिवर्षी सुमारे १२ जणांचे प्राण जात आहेत. सन २०१४ मध्ये एकूण ६४ अपघात घडले असून त्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. २०१५ मध्ये ६८ अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे.