शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

रस्त्यांवरील गैरसोयीमुळे घडताहेत अपघात

By admin | Updated: March 25, 2016 00:58 IST

रस्त्यांवरील गैरसोयीमुळे केवळ वाशी परिसरात प्रतिवर्षी किमान १२ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. अवघ्या सायन-पनवेल मार्गावरील ही परिस्थिती असून रात्रीच्या वेळी अपुरा

नवी मुंबई : रस्त्यांवरील गैरसोयीमुळे केवळ वाशी परिसरात प्रतिवर्षी किमान १२ जणांचा अपघाती मृत्यू होत आहे. अवघ्या सायन-पनवेल मार्गावरील ही परिस्थिती असून रात्रीच्या वेळी अपुरा प्रकाश, अनावश्यक ठिकाणी स्पीडब्रेकर व कामातील त्रुटी यामुळे हे अपघात घडलेले आहेत.रुंदीकरणाच्या कामानंतर सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक अधिकच गतिमान झालेली आहे. या मार्गावरून प्रतिदिन शेकडो छोटी-मोठी वाहने मुंबई, नवी मुंबई व पुण्याच्या दिशेने ये-जा करीत असतात. यावेळी सदर रस्त्यावर भेडसावणाऱ्या गैरसोयींमुळे अनेकांना अपघाताच्या घटनेशी सामना करावा लागत आहे. दोन महिन्यांपूर्वी वाशी खाडीपुलावर मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेला अज्ञात वाहनाने चिरडले होते. त्यानंतर रात्रभर या मृतदेहावरून छोटी-मोठी वाहने जात होती. त्यामुळे पूर्णपणे छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेहाचे तुकडे पोलिसांना जमा करावे लागले होते. पुलावरील पथदिवे बंद असल्यामुळे वाहनाच्या जेमतेम प्रकाशातच चालकांना वाहने चालवावी लागतात. त्यामुळे अशाप्रकारच्या अनेक अपघातांची नोंद वाशी पोलिसांकडे होत आहे. शिवाय टोलनाक्यालगत पुलाच्या उताराला अनावश्यक ठिकाणी बसवलेला स्पीडब्रेकर व वाशी-सानपाडादरम्यानच्या पुलाच्या कामातील त्रुटी यामुळेही अनेक छोटे-मोठे अपघात घडत आहेत. १० दिवसांपूर्वी एका तरुणाला मोटारसायकल अपघातामध्ये प्राण गमवावे लागले आहेत. हा तरुण सानपाडा येथून मुंबईच्या दिशेने जात असताना पामबीच मार्गावरील पुलाच्या वाढीव कामातील त्रुटीचा तो बळी ठरला. पुलाच्या सुधारकामादरम्यान मार्गाचे दोन भाग जोडण्यासाठी लोखंडी रॉडचा वापर करण्यात आलेला आहे. मात्र रेल्वेच्या रुळाप्रमाणे असलेल्या या लोखंडावर मोटारसायकल येताच चाक घसरून अपघात होत आहेत.अपघाताच्या या घटनांना आळा घालण्यासाठी सायन-पनवेल मार्गावरील त्रुटींमध्ये सुधार करून चालकांची गैरसोय दूर करण्याची गरज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्यानुसार खाडीपुलावर पुरेशा प्रकाशाची सोय करून वाशी-सानपाडादरम्यानच्या पुलातील त्रुटी दूर करण्याची गरज वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)वाशी पोलीस ठाणे हद्दीत सायन-पनवेल मार्गावर दीड ते दोन कि.मी. अंतरात होणाऱ्या अशा अपघातांमध्ये प्रतिवर्षी सुमारे १२ जणांचे प्राण जात आहेत. सन २०१४ मध्ये एकूण ६४ अपघात घडले असून त्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. २०१५ मध्ये ६८ अपघातांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला आहे.