शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बेलापूर किल्ला संवर्धनाच्या कामास गती; १७ कोटी खर्च होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 01:31 IST

एकमेव ऐतिहासीक वारसास्थळाचे जतन; पामबीचवरील बुरूजाचीही दुरूस्ती

नवी मुंबई : शहरातील एकमेव ऐतीहासीक वारसास्थळ असणाऱ्या बेलापूर किल्ला संवर्धनाच्या कामास गती येऊ लागली आहे. बुरूजांची दुरूस्ती करून परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून यासाठी १७ कोटी रूपये खर्च केले जात आहेत.नवी मुंबईमध्ये बेलापूर किल्ला हे एकमेव ऐतिहासीक ठिकाण आहे. १५६० ते १५७० मध्ये पोर्तुगीजांनी हा प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर बेलापूरजवळील खाडीमध्ये हा किल्ला बांधला. कालांतराने हा प्रदेश सिद्दींनी जिंकला. १६८२ मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांनी पुन्हा जिंकला. १७३३ मध्ये चिमाजी अप्पाच्या नेतृत्वात मराठ्यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. १८१७ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इतर किल्ल्याप्रमाणे येथील पुरातन वास्तुही नष्ट केल्या. नवी मुंबईची निर्मिती झाल्यानंतरही किल्ला दुर्लक्षीत राहीला होता. प्रसारमाध्यमांनी याविषयी आवाज उठविल्यानंतर व आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सिडकोने किल्ला संवर्धन करण्याविषयी सकारात्मक भुमीका घेण्यास सुरवात केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे विजयी झाल्यानंतर त्यांनी सिडकोकडे पुन्हा पाठपुरावा केला व अखेर १७ कोटी रूपये खर्च करून किल्ला संवर्धनाच्या कामाचे प्रत्यक्षात भुमीपूजन करण्यात आले.बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम सद्यस्थितीमध्ये सुरू केले आहे. किल्याच्या माथ्यावरील मुख्य बुरूज ढासळू लागला होता. त्या बुरूजाची दुरूस्ती करण्यास सुरूवात केली आहे. कोसळण्याच्या स्थितीत असलेले दगड बाजूला करून त्यांची दुरूस्ती केली जाणार आहे. गडावरील पडलेल्या संरक्षण भिंतीचे कामही केले जात आहे. गडावरील जुन्या बांधकामांचे अवशेष असून त्यांचेही जतन केले जाणार आहे. गडावर घनदाट जंगल असून त्यामध्ये पर्यटकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था तयार केली जाणार आहे. मोकळ्या जागेवर उद्यान फुलविण्यात येणार आहे. पर्यटनस्थळ म्हणून या ठिकाणाचा विकास होणार आहे.येथे भेट देणाºया नागरिकांना गडाची ऐतिहासीक माहिती मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. पामबीच रोडवर किल्ला चौकामध्येही एक टेहळणी बुरूज आहे. या बुरूजाचीही दुरूस्ती करण्याचे काम सुरू झाले आहे. दोन वर्षामध्ये सर्व विकास कामे पूर्ण करून गडाचे संपूर्ण सुशोभीकरण केले जाणार आहे.४५० वर्षांचा इतिहासबेलापूर किल्ल्याला साडेचारशे वर्ष झाली आहेत. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली १७३३ मध्ये हा किल्ला स्वराज्यात आला व तब्बल ८४ वर्ष तो स्वराज्यातच होता. त्यावेळी किल्ल्यावर प्रत्येकी १८० माणसांच्या ४ तुकड्या होत्या. २ ते ५ किलो वजनाच्या १४ बंदुका होत्या. ह्या किल्यावरून थेट घारापुरीपर्यंत बोगला होता अशी अख्यायिका असून त्याविषयी सद्यस्थितीमध्ये काही अवशेष दिसत नाहीत.