शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

बेलापूर किल्ला संवर्धनाच्या कामास गती; १७ कोटी खर्च होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 01:31 IST

एकमेव ऐतिहासीक वारसास्थळाचे जतन; पामबीचवरील बुरूजाचीही दुरूस्ती

नवी मुंबई : शहरातील एकमेव ऐतीहासीक वारसास्थळ असणाऱ्या बेलापूर किल्ला संवर्धनाच्या कामास गती येऊ लागली आहे. बुरूजांची दुरूस्ती करून परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून यासाठी १७ कोटी रूपये खर्च केले जात आहेत.नवी मुंबईमध्ये बेलापूर किल्ला हे एकमेव ऐतिहासीक ठिकाण आहे. १५६० ते १५७० मध्ये पोर्तुगीजांनी हा प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर बेलापूरजवळील खाडीमध्ये हा किल्ला बांधला. कालांतराने हा प्रदेश सिद्दींनी जिंकला. १६८२ मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांनी पुन्हा जिंकला. १७३३ मध्ये चिमाजी अप्पाच्या नेतृत्वात मराठ्यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. १८१७ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इतर किल्ल्याप्रमाणे येथील पुरातन वास्तुही नष्ट केल्या. नवी मुंबईची निर्मिती झाल्यानंतरही किल्ला दुर्लक्षीत राहीला होता. प्रसारमाध्यमांनी याविषयी आवाज उठविल्यानंतर व आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सिडकोने किल्ला संवर्धन करण्याविषयी सकारात्मक भुमीका घेण्यास सुरवात केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे विजयी झाल्यानंतर त्यांनी सिडकोकडे पुन्हा पाठपुरावा केला व अखेर १७ कोटी रूपये खर्च करून किल्ला संवर्धनाच्या कामाचे प्रत्यक्षात भुमीपूजन करण्यात आले.बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम सद्यस्थितीमध्ये सुरू केले आहे. किल्याच्या माथ्यावरील मुख्य बुरूज ढासळू लागला होता. त्या बुरूजाची दुरूस्ती करण्यास सुरूवात केली आहे. कोसळण्याच्या स्थितीत असलेले दगड बाजूला करून त्यांची दुरूस्ती केली जाणार आहे. गडावरील पडलेल्या संरक्षण भिंतीचे कामही केले जात आहे. गडावरील जुन्या बांधकामांचे अवशेष असून त्यांचेही जतन केले जाणार आहे. गडावर घनदाट जंगल असून त्यामध्ये पर्यटकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था तयार केली जाणार आहे. मोकळ्या जागेवर उद्यान फुलविण्यात येणार आहे. पर्यटनस्थळ म्हणून या ठिकाणाचा विकास होणार आहे.येथे भेट देणाºया नागरिकांना गडाची ऐतिहासीक माहिती मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. पामबीच रोडवर किल्ला चौकामध्येही एक टेहळणी बुरूज आहे. या बुरूजाचीही दुरूस्ती करण्याचे काम सुरू झाले आहे. दोन वर्षामध्ये सर्व विकास कामे पूर्ण करून गडाचे संपूर्ण सुशोभीकरण केले जाणार आहे.४५० वर्षांचा इतिहासबेलापूर किल्ल्याला साडेचारशे वर्ष झाली आहेत. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली १७३३ मध्ये हा किल्ला स्वराज्यात आला व तब्बल ८४ वर्ष तो स्वराज्यातच होता. त्यावेळी किल्ल्यावर प्रत्येकी १८० माणसांच्या ४ तुकड्या होत्या. २ ते ५ किलो वजनाच्या १४ बंदुका होत्या. ह्या किल्यावरून थेट घारापुरीपर्यंत बोगला होता अशी अख्यायिका असून त्याविषयी सद्यस्थितीमध्ये काही अवशेष दिसत नाहीत.