शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

बेलापूर किल्ला संवर्धनाच्या कामास गती; १७ कोटी खर्च होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 01:31 IST

एकमेव ऐतिहासीक वारसास्थळाचे जतन; पामबीचवरील बुरूजाचीही दुरूस्ती

नवी मुंबई : शहरातील एकमेव ऐतीहासीक वारसास्थळ असणाऱ्या बेलापूर किल्ला संवर्धनाच्या कामास गती येऊ लागली आहे. बुरूजांची दुरूस्ती करून परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून यासाठी १७ कोटी रूपये खर्च केले जात आहेत.नवी मुंबईमध्ये बेलापूर किल्ला हे एकमेव ऐतिहासीक ठिकाण आहे. १५६० ते १५७० मध्ये पोर्तुगीजांनी हा प्रदेश ताब्यात घेतल्यानंतर बेलापूरजवळील खाडीमध्ये हा किल्ला बांधला. कालांतराने हा प्रदेश सिद्दींनी जिंकला. १६८२ मध्ये हा किल्ला पोर्तुगीजांनी पुन्हा जिंकला. १७३३ मध्ये चिमाजी अप्पाच्या नेतृत्वात मराठ्यांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. १८१७ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. इंग्रजांनी इतर किल्ल्याप्रमाणे येथील पुरातन वास्तुही नष्ट केल्या. नवी मुंबईची निर्मिती झाल्यानंतरही किल्ला दुर्लक्षीत राहीला होता. प्रसारमाध्यमांनी याविषयी आवाज उठविल्यानंतर व आमदार मंदा म्हात्रे, संदीप नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सिडकोने किल्ला संवर्धन करण्याविषयी सकारात्मक भुमीका घेण्यास सुरवात केली. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर मतदार संघातून मंदा म्हात्रे विजयी झाल्यानंतर त्यांनी सिडकोकडे पुन्हा पाठपुरावा केला व अखेर १७ कोटी रूपये खर्च करून किल्ला संवर्धनाच्या कामाचे प्रत्यक्षात भुमीपूजन करण्यात आले.बेलापूर किल्ला संवर्धनाचे काम सद्यस्थितीमध्ये सुरू केले आहे. किल्याच्या माथ्यावरील मुख्य बुरूज ढासळू लागला होता. त्या बुरूजाची दुरूस्ती करण्यास सुरूवात केली आहे. कोसळण्याच्या स्थितीत असलेले दगड बाजूला करून त्यांची दुरूस्ती केली जाणार आहे. गडावरील पडलेल्या संरक्षण भिंतीचे कामही केले जात आहे. गडावरील जुन्या बांधकामांचे अवशेष असून त्यांचेही जतन केले जाणार आहे. गडावर घनदाट जंगल असून त्यामध्ये पर्यटकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था तयार केली जाणार आहे. मोकळ्या जागेवर उद्यान फुलविण्यात येणार आहे. पर्यटनस्थळ म्हणून या ठिकाणाचा विकास होणार आहे.येथे भेट देणाºया नागरिकांना गडाची ऐतिहासीक माहिती मिळेल अशी व्यवस्था केली जाणार आहे. पामबीच रोडवर किल्ला चौकामध्येही एक टेहळणी बुरूज आहे. या बुरूजाचीही दुरूस्ती करण्याचे काम सुरू झाले आहे. दोन वर्षामध्ये सर्व विकास कामे पूर्ण करून गडाचे संपूर्ण सुशोभीकरण केले जाणार आहे.४५० वर्षांचा इतिहासबेलापूर किल्ल्याला साडेचारशे वर्ष झाली आहेत. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली १७३३ मध्ये हा किल्ला स्वराज्यात आला व तब्बल ८४ वर्ष तो स्वराज्यातच होता. त्यावेळी किल्ल्यावर प्रत्येकी १८० माणसांच्या ४ तुकड्या होत्या. २ ते ५ किलो वजनाच्या १४ बंदुका होत्या. ह्या किल्यावरून थेट घारापुरीपर्यंत बोगला होता अशी अख्यायिका असून त्याविषयी सद्यस्थितीमध्ये काही अवशेष दिसत नाहीत.