शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

कळंबोलीत पाण्याचा गैरवापर

By admin | Updated: October 28, 2015 23:27 IST

कळंबोली शहरातील एलआयजी, केएल १ या भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे, मात्र या भागात पाणीटंचाईपेक्षा पाण्याचा गैरवापर अधिक असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे.

तळोजा : कळंबोली शहरातील एलआयजी, केएल १ या भागात गेल्या काही महिन्यांपासून पाण्याची गंभीर समस्या उद्भवत आहे, मात्र या भागात पाणीटंचाईपेक्षा पाण्याचा गैरवापर अधिक असल्याची गंभीर बाब समोर आलेली आहे.एलआयजी, केएल १ या भागात अनधिकृत मजले चढवलेले आहेत. मुळात म्हणजे एका घरामागे एक पाण्याचे कनेक्शन असताना परिसरातील रहिवासी या कनेक्शनला १ एचपी, २ एचपीच्या मोटारी लावून पाणी वापरत आहेत. यामुळे घराच्या वर असलेल्या ३ मजल्यापर्यंत पाणी पुरवणे सोपे होते. गेली कित्येक वर्षे हा प्रकार सुरु असून यामुळे पाण्याचा गैरवापर होत आहे. शिवाय या ठिकाणाप्रमाणे कळंबोलीत काही ठिकाणी पाण्याच्या जोडणीला मीटर नसल्याने सिडकोकडून किरकोळ रुपयात पाणी मिळायचे. मात्र आता उशिरा का होईना प्रशासनाला शहाणपण सुचलेले आहे. या प्रकरणी सिडकोचे संजय भाटिया यांच्याकडे कळंबोली शहरातील या भागांचा लेखाजोखा पाणीपुरवठा विभागाने मांडला असून यावर लवकरच अंमलबजावणी होणार आहे.कळंबोली परिसरातील एलआयजी, केएल १, केएल २ या भागात सुमारे ६५ हजार लोकवस्ती असून यातील एलआयजी, केएल १ या भागात अनधिकृत मजले चढवलेले आहेत. प्रशासनाच्या गलथान कारभारमुळे मजले दिवसेंदिवस चढत आहेत, त्यामुळे या परिसरात सिडकोला गरजेपेक्षा अधिक पाणी द्यावे लागत आहे. त्या शिवाय पाणी ओढण्यासाठी मोटारीची स्पर्धा येथे लागत आहे. सिडकोच्या जलवाहिनीतला दाब कमी असल्याने या लोकांना त्याची गरज लागत आहे, मात्र आता या परिसराला मुबलक पाणी पुरवण्यासाठी योग्य उपाययोजना केली जाणार असून पाणीप्रश्न मार्गी लागेल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. (वार्ताहर)