शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलबाहेरील पानटपऱ्यांना अभय सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:18 IST

महापालिकेचे दुर्लक्ष : चोरून विजेचा वापर, लाखो रुपयांची उलाढाल, कारवाईचा फक्त दिखावाच

नामदेव मोरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील सर्व हॉटेलच्या बाहेर अनधिकृतपणे पानटपºया सुरू करण्यात आल्या आहेत. हॉटेलचालक प्रत्येकाकडून पाच ते २५ हजार रुपये जागाभाडे वसूल करत आहेत. बिनधास्तपणे सुरू असलेल्या अनधिकृत व्यापारास महापालिका पाठीशी घालत असून, त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. सर्व ठिकाणी चोरून विजेचा वापर सुरू असून महावितरणचे अधिकारीही त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये काही दिवसांपूर्वी शहरातील अनधिकृत पानटपऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. शहरातील बहुतांश सर्व हॉटेलच्या बाहेर सार्वजनिक वापराच्या जागेवर अनधिकृतपणे पानटपरी सुरू करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी हॉटेलचालकांनीही ही जागा भाडेतत्त्वावर पानटपरीचालकांना देण्यात आली आहे. प्रत्येक पानटपरीकडून कमीत कमी पाच हजार ते २५ हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले जात आहे. जेवढा व्यवसाय जास्त तेवढे भाडेही जास्त आकारले जात आहे. संबंधितांना हॉटेलमधूनच अनधिकृतपणे वीजजोडणी देण्यात आली आहे. अनेक ठिकाणी महावितरण कार्यालयाला लागूनच विजेची चोरी असून त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. रोडला लागून नागरिकांची गर्दी असलेल्या ठिकाणी हा व्यवसाय सुरू असून, सार्वजनिक अनेक जण धूम्रपान करत असतात. याचा त्रास हॉटेलजवळून ये -जा करणाºया नागरिकांना होत असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वाशी सेक्टर १७ मधील नवरत्न हॉटेलच्या बाहेरही मोक्याच्या ठिकाणी पानटपरी सुरू आहे. महापालिका आयुक्तपदावर अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर शहरातील अनधिकृत पानटपºयांवरही कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान नवरत्न हॉटेल बाहेरील टपरीही उचलण्यात आली होती; परंतु १५ दिवसांमध्ये तेथील व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात आला. शहरातील इतर ठिकाणच्या पानटपºयाही पूर्ववत सुरू करण्यात आल्या. सद्यस्थितीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ५०० पेक्षा जास्त अनधिकृत पानटपºया आहेत. प्रत्येक हॉटेलच्या बाहेर एक टपरी असून, सर्वच ठिकाणी विजेची चोरी सुरू आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्यालयाजवळील सर्व हॉटेलच्या बाहेर पानटपरी आहे. विशेष म्हणजे, महावितरणच्या विभागीय कार्यालयाला लागूनही हा व्यवसाय असून, तेथेही चोरून विजेचा वापर केला जात आहे. कार्यालयाच्याबाहेरच सुरू असलेल्या वीजचोरीकडेही महावितरणचे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. महापालिकेने यापूर्वी काही ठिकाणी कारवाई केली होती; परंतु कारवाई सुरू केली की संबंधित व्यावसायिकांकडून दबाव आणून कारवाई बंद पाडली जात आहे. यामुळे नागरिकांनी तक्रारी करूनही हे व्यवसाय बंद होत नाहीत.अभियानादरम्यान टपºया बंदच्स्वच्छ भारत अभियानाचे सर्वेक्षण करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईमध्ये आले होते.च्हे पथक ज्या परिसराला भेट देणार आहे, त्या परिसरातील पानटपºया बंद ठेवण्यात आल्या होत्या.च्महापालिका प्रशासनाने सीवूडमध्ये अधिकृत दुकानामध्ये सुरू असलेले पान, तंबाखू, सिगारेट विक्रीचे दुकान बंद ठेवायला लावले होते. सर्वेक्षण पूर्ण होताच व्यवसाय पुन्हा सुरू झाला.वीजचोरांना अभय का?च्हॉटेलबाहेरील सर्व पानटपºयांसाठी चोरून विजेचा वापर केला जात आहे. शहरात ५०० पेक्षा जास्त ठिकाणी बिनधास्तपणे वीजचोरी सुरू आहे.च्नवरात्रोत्सव व गणेशोत्सवामध्ये दहा दिवसांसाठीही मंडळांना स्वतंत्र वीजमीटर घेणे बंधनकारक केले जाते.च्एखाद्या मंडळाने मीटर घेतला नाही तर त्यांच्यावर वीजचोरीचा गुन्हा दाखल केला जातो; परंतु पानटपरी चालक वर्षानुवर्षे चोरून विजेचा वापर करत असूनही त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही.कोणतीच परवानगी नाहीच्शहरातील हॉटेलच्या बाहेर पान, बिडी, तंबाखू विकणाºया व्यावसायिकांकडे कोणताही व्यावसायिक परवाना नाही. महापालिकेचा परवानाही घेतलेला नाही.च्जागा भाडेतत्त्वावर घेतल्याचा करारनामाही नाही. सार्वजनिक वापराची जागा दुसºयांना भाडेतत्त्वावर देण्याचा अधिकार हॉटेलचालकांना कोणी दिला, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.