शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त भाजीपाल्यासाठी शेतकरी बाजारचा पर्याय; आठवडे बाजारांच्या प्रसिद्धीकडेही शासनाचे दुर्लक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 06:44 IST

शेतकरी व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन शासनाने १२ ऑगस्ट २०१६ मध्ये संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजार हे अभियान सुरू केले.

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला, फळे उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने संत शिराेमणी सावता माळी आठवडे शेतकरी बाजार योजना सुरू केली. मुंबई, नवी मुंबईमध्येही बाजार सुरू झाले. त्याचा लाभ ग्राहकांना होत आहे; परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात या बाजारांची संख्या कमी आहे. कुठे कधी बाजार भरणार याविषयी शासनाकडून प्रसिद्धीही केली जात नसल्यामुळे या आठवडे बाजारांचा अपेक्षित लाभ होत नाही.

शेतकरी व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन शासनाने १२ ऑगस्ट २०१६ मध्ये संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडे बाजार हे अभियान सुरू केले. पहिल्या टप्प्यात मुंबई, नवी मुंबई, पुणेमध्ये प्रत्येक विभागात आठवड्यातून एक दिवस आठवडे बाजार भरविण्याचे निश्चित केले. नवी मुंबईमध्ये सीवूड, एनआरआय, सेक्टर १५ बेलापूर, राजीव गांधी मैदान व वाशी अशा पाच ठिकाणी आठवडे बाजार भरविला जात आहे. या उपक्रमाला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे. इतर मार्केटपेक्षा कमी दरात भाजीपाला उपलब्ध होत आहे; परंतु आठ विभाग कार्यालयांपैकी २ विभाग कार्यालयांच्या क्षेत्रामध्येही आठवडे भरत आहे. उर्वरित ६ विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये अद्याप ही योजना पोहोचलेली नाही. मुंबईमध्येही ६ ठिकाणी आठवडे बाजार सुरू केला आहे; परंतु या दोन्ही शहरांची व्याप्ती पाहता हे बाजारांचे प्रमाण अत्यंत कमी आहे.

शेतकरी आठवडे बाजार पूर्वी पणन मंडळाच्या माध्यमातून चालविला जात होता. आता हा उपक्रम कृषी विभागाकडे वर्ग केला असल्याची माहिती पणन विभागाच्या कार्यालयातून देण्यात आली. आठवडे बाजारच्या माध्यमातून ग्राहकांना स्वस्त दरात कृषिमाल उपलब्ध करून देणे शक्य आहे; परंतु बाजारांची संख्या वाढविली जात नसल्यामुळे चांगली योजना असून प्रत्यक्षात महागाई कमी करण्यासाठी त्याचा फारसा उपयाेग होताना दिसत नाही.

बाजार समितीमध्येही स्वस्त विक्रीची सोयमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होलसेलसोबत किरकोळ भाजीपाला विक्रीही सुरू केली आहे. येथील ‘डी-विंग’मध्ये किरकोळ विक्रीची सोय आहे. मुंबई, नवी मुंबईमधील इतर किरकोळ मार्केटपेक्षा २५ ते ३० टक्के कमी दराने येथे भाजीपाला उपलब्ध होत आहे. या ठिकाणी संपूर्ण नवी मुंबईमधून ग्राहक खरेदीसाठी येत असतात; परंतु या व्यापाराला अधिकृत मंजुरीच नाही.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बेलापूर व वाशी विभागात शेतकरी बाजार सुरू आहे. या उपक्रमासाठी शासनाच्या नियमाप्रमाणे विविध विभागांत अर्ज आले व तेथे जागेची उपलब्धता होत असेल व वाहतुकीसह इतर समस्या निर्माण होणार नसतील तर परवानगी देता येईल.- सुनील पवार, अतिरिक्त आयुक्त बाजार समिती.ष