शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
7
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
8
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
9
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
10
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
11
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
12
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
13
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
14
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
15
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
16
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
17
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
18
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
19
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
20
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी ९२% मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 04:52 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ९२. ५७ टक्के मतदान झाले आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ९२. ५७ टक्के मतदान झाले आहे. ५८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीमध्ये बंद झाले असून, २ मार्चला बाजार समिती मुख्यालय आवारामध्ये मतमोजणी होणार आहे.राज्यातील ३०५ बाजार समित्यांची शिखर संस्था असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी ३४ जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. सहा महसूल विभागांमधून १२ शेतकरी प्रतिनिधी व चार व्यापारी प्रतिनिधींची निवड करण्यासाठी मतदान घेण्यात आले. यासाठी ५८ उमेदवार रिंगणात होते. महाविकास आघाडीचा प्रयोग या निवडणुकीमध्येही राबविण्यात आला असून काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेकापने पॅनल तयार केले होते. भाजप नेत्यांनीही काही उमेदवारांना ताकद दिली होती. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे सकाळपासूनच मतदानकेंद्रांवर गर्दी दिसू लागली होती. सहा महसूल विभाग व व्यापारी मतदारसंघांमध्ये एकूण १७ हजार ५१३ मतदार होते. महसूल विभागांमध्ये तब्बल ९८.७२ टक्के मतदान झाले असून, व्यापारी मतदारसंघामध्ये ८७.२१ टक्के मतदान झाले आहे. अमरावतीमध्ये ९९, कोकणामध्ये ९९.६४, पुण्यामध्ये ९९ टक्के मतदान झाले आहे.>मतदारांची आकडेवारीविभाग मतांचीटक्केवारीअमरावती विभाग ९९औरंगाबाद विभाग ९८.७४कोकण ९९.६४पुणे ९९नाशिक ९८.२३नागपूर ९५.५९व्यापारी मतदारसंघ ८७.२१>मतदारसंघनिहाय उमेदवारांचीसंख्या पुढीलप्रमाणे-मतदारसंघ उमेदवारऔरंगाबाद ११नागपूर ०७अमरावती ०७पुणे ०५कोकण ०५नाशिक ०८मतदारसंघ उमेदवारकामगार बिनविरोधफळ मार्केट बिनविरोधकांदा मार्केट ०३भाजी मार्केट ०४धान्य मार्केट ०३मसाला मार्केट ०३>मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा, मसाला, धान्य व भाजी मार्केटमध्ये मतदानकेंद्र तयार करण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सहा महसूल विभागातील मतपेट्याही रात्रीपर्यंत मुंबईत आणल्या जातील. २ मार्चला बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटमध्ये मतमोजणी होईल.