शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील ९०.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:46 IST

पनवेल व नवी मुंबईमधून २३,७५८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २१,३७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

नवी मुंबई/पनवेल : पनवेल व नवी मुंबईमधून २३,७५८ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २१,३७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नवी मुंबईचा ९०.५४ व पनवेलचा ८९.४ टक्के निकाल लागला आहे. दोन्ही मनपा क्षेत्रामध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने फेब्रुवारी- मार्च २०१८ मध्ये घेतलेल्या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले होते. विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये या निकालाला विशेष महत्त्व असल्याने सकाळी ११ वाजल्यापासून बोर्डाने निकाल उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर जावून निकाल पाहण्यास सुरवात केली होती. १ वाजल्यापासून प्रत्यक्ष निकाल आॅनलाइन उपलब्ध करून देण्यात आला. नवी मुंबई मनपा क्षेत्रामधून ८००९ मुले व ६५९७ मुली अशी एकूण १४६०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधील तब्बल १२२२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण निकाल ९०.५४ टक्के असून यामध्ये ९३.१९ टक्के मुली व ८८.३६ टक्के मुले आहेत. पनवेलमधून ५०३५ मुले व ४११७ मुली अशा एकूण ९१५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामधील ८१४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हे प्रमाण ८९.४ टक्के आहे. पनवेलमधून ९३.२७ टक्के मुली व ८५.५८ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुक्याचा सर्वाधिक ९२.४७ टक्के निकाल लागला असून नवी मुंबई महापालिकेचा जिल्ह्यात तिसरा क्रमांक आहे. रायगड जिल्ह्यामध्ये तळा तालुक्याचा सर्वाधिक ९५.५७ टक्के निकाल लागला असून पनवेल तालुक्याचा चौथा क्रमांक आहे.नवी मुंबई व पनवेल परिसरामध्येही कला, वाणिज्य व विज्ञान शाखेमध्येही मुलींनीच बाजी मारली आहे. जास्त टक्के मिळविणाऱ्यांमध्येही मुलींचे प्रमाण जास्त आहे. दोन्ही मनपा क्षेत्रामध्ये २३८४ मुले नापास झाली आहेत. निकालानंतर नापास व उत्तीर्ण मुलांपैकीही गुण कमी मिळालेल्या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. सोशल मीडियामधून उत्तीर्ण मुलांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला होता. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकवरून गुणपत्रिका प्रसिद्ध करून शुभेच्छा दिल्या जात होत्या. राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनीही उत्तीर्ण विद्यार्थ्यांना घरी जावून शुभेच्छा दिल्या.सिद्धी हिंदळकरला ९५.८५ टक्के गुणवाशीतील फादर अ‍ॅग्नेल स्कूलमधील सिद्धी हिंदळकर हिने ९५.८५ टक्के गुण मिळवून महाविद्यालयामध्ये अव्वर क्रमांक मिळविला आहे. तिचे शिक्षकांसह सर्वांनी अभिनंदन केले आहे. योग्य नियोजन व मार्गदर्शनामुळे यश मिळविल्याचे तिने यावेळी सांगितले.विशेष मुलांचेही यशबारावीच्या परीक्षेमध्ये विशेष मुलांनीही यश मिळविले आहे. विनम्र अरोलकर याने ७५ व सोहम रॉय दस्तीदार याने ७४ टक्के गुण मिळविले आहेत. या दोघांचेही फादर अ‍ॅग्नेल स्कूलमधील शिक्षकांसह इतर नागरिकांनीही अभिनंदन केले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.बोर्डाच्या आवारात शुकशुकाटपूर्वी दहावी व बारावी निकालाच्या दिवशी वाशीतील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांसह पालकांची प्रचंड गर्दी असायची. गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांचा शिक्षणमंत्री किंवा बोर्डाच्या अध्यक्षांच्या हस्ते सत्कार केला जात असे. परंतु गुणवत्ता यादी बंद केल्यापासून निकालाची उत्सुकता बंद झाली असून बोर्डाबाहेरील गर्दी जवळपास बंद झाली आहे.सोशल मीडियावरून शुभेच्छादुपारी १ वाजता निकाल जाहीर होताच काही मिनिटामध्ये व्हॉट्सअ‍ॅप व फेसबुकवर यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका पालकांनी प्रसिद्ध केल्या. यशस्वी विद्यार्थ्यांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. शहरातील नगरसेवक व इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाºयांनीही प्रभागांमधील यशस्वी विद्यार्थ्यांची भेट घेवून व फोन करून शुभेच्छा देण्यास सुरवात केल्याचे चित्र पहावयास मिळत होते.खचून न जाण्याचे आवाहनबारावीची परीक्षा देणारे नवी मुंबईमधील १३८१ व पनवेलमधील १००३ विद्यार्थी नापास झाले आहेत. याशिवाय अनेकांना अपेक्षेएवढे गुण मिळाले नाहीत. नापास व कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले. या सर्व विद्यार्थ्यांनी खचून जावू नये, असे आवाहन शिक्षकांसह समाजातील मान्यवरांनी केले आहे.