शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

शहरात ८१० चालकांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 23:16 IST

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा चालकपरवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची मोहीम आरटीओने सुरू केली आहे.

नवी मुंबई : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा चालकपरवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची मोहीम आरटीओने सुरू केली आहे. १४७२ चालकपरवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. त्यापैकी ८१० परवाने निलंबित केले आहेत.नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाचे प्रमुख अधिकारी दशरथ वाघुले यांच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी विशेष मोहीम राबवून वाहतूक नियमांना फाटा देणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली जात आहे. १ नोव्हेंबर २०१८ ते २७ फेब्रुवारी २०१९ या तीन महिन्यांच्या कालावधीत नवी मुंबई वाहतूक शाखेकडून विविध गुन्ह्यांतील एकूण १४७२ चालकांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले, त्यापैकी वाशी येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी कारवाई करून चक्क ८१० बेशिस्त वाहनचालकांचे परवानेच निलंबित केले आहेत.अनेक वाहनचालक वाहतुकीच्या या नियमांकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा प्रकार एखाद्या मोठ्या अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो. ओव्हरलोड वाहतूक, मद्यपान करून वाहन चालविल्यामुळेही अपघात होत असतात. नियमांचे उल्लंघन करणाºयांविरोधात कडक कारवाई सुरू केल्यामुळे बेशिस्तपणे वाहन चालविणाºयांचे धाबे दणाणले आहेत.यापूर्वी नवी मुंबईप्रमाणे पनवेलमध्येही अपघात कमी होण्याच्या दृष्टीने मोहीम राबविली जात असून, नियम मोडणाºया चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.