शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

कोरोनाबळींमध्ये ८० टक्के पन्नाशीच्या पुढील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:28 IST

ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका : नवी मुंबई वर्षभरात १०० तरुणांचाही झाला मृत्यू 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोरोनाबळींची संख्या नवी मुंबईमध्येही वाढू लागली आहे. आतापर्यंत १२६८ जणांचा मृत्यू झाला आहे. ८० टक्के मृत्यू पन्नाशीच्या पुढील असून त्यांचा आकडा १०२३ एवढा आहे. यामुळे मनपा प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांवरील उपचारावर विशेष लक्ष दिले आहे. तरुणांमध्येही मृत्यूचा धोका वाढत असून आतापर्यंत तब्बल १०० तरुणांचा मृत्यू झाला आहे. दहा वर्षांच्या आतील दोन जणांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.             कोराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्युदर वाढू लागला असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. प्रतिदिन ५ ते ९ जणांचा मृत्यू होत आहे. आयसीयू व व्हेंटिलेटर्सची कमतरता असल्यामुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत व अनेकांना जीव गमवावा लागत आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी मृत्युदर रोखण्यावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. वयोगटानुसार मृत्युदराचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे.  मृतांमध्ये ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असणारांचा सर्वाधिक समावेश आहे. एकूण मृत्यूपैकी ८० टक्के पन्नाशीच्या पुढील असल्याचे निदर्शनास आले आहे. ४० ते ५० वयोगटांतील १४३ जणांचा मृत्यू झाला आहे. ५० ते ६० वयोगटांतील ३१६ जणांचा व ६० ते ७० वयोगटातील ३६४ जणांचा मृत्यू झाला आहे. ७० ते ८० वयोगटातील २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. ८० ते १०० वयोगटातील ९४ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.ज्येष्ठ नागरिकांमधील मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने त्यांच्यावरील उपचारावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पन्नाशीच्या पुढील सर्व रुग्ण मनपाच्या निगराणीखाली असणार आहेत. त्यांच्या प्रकृतीवर नियमित देखरेख केली जाणार असून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तरुणांमध्येही मृत्यूचे प्रमाण दुर्लक्ष करण्यासारखे नाही. आतापर्यंत ११ ते ४० वयोगटातील १०० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे व वेळेत चाचणी करून उपचार सुरू न केल्यामुळे अनेक तरुणांचा मृत्यू होत आहे.