शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमधील ७५ गाव-पाडे टंचाईग्रस्त

By admin | Updated: April 4, 2016 02:10 IST

कर्जत तालुक्यातील अनेक गाव-पाडे टंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये तब्बल ३४ गावे आणि ४१ आदिवासीवाड्यामध्ये पाणीटंचाई आहे.

संजय गायकवाड,  कर्जतकर्जत तालुक्यातील अनेक गाव-पाडे टंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये तब्बल ३४ गावे आणि ४१ आदिवासीवाड्यामध्ये पाणीटंचाई आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन काही दिवसांनी टँकर सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.कर्जत तालुक्यातील प्रामुख्याने एप्रिल आणि मे महिन्यात आदिवासी आणि दुर्गम भागात निर्माण होणारी पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार केला आहे. तो आराखडा तयार करताना तालुक्यात गावपातळीवर सुरू असलेल्या नळपाणी योजना यांची कामे, जलसंधारणअंतर्गत सुरू असलेली कामे यांचा विचार करण्यात आला. तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची नावे निश्चित करून तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.संभाव्य पाणीटंचाईग्रस्त वाड्यामध्ये (टाकाची वाडी-दामत), खांडसवाडी, वेणगाव कातकरवाडी, भडवळ कातकरवाडी, डोणेवाडी, नवसूची वाडी, जांभूळवाडी (वारे), हाऱ्याची वाडी (वारे), देऊळवाडी, कोळ्याची वाडी, दोरेवाडी (कशेळे), कातकरवाडी (कशेळे), चिमटेवाडी (नांदगाव), भोपळेवाडी (नांदगाव), चौधरवाडी, आनंदवाडी-मोग्रज, वाघ्याची वाडी (बेडीसगाव), कोतेरीवाडी (बेडीसगाव), चोरीची वाडी (बेडीसगाव), शाळेची वाडी (बेडीसगाव), कुंडवाडी-बेडीसगाव, तिवरे-बौध्दवाडी, माले-कातकरवाडी, पोटल मुस्लीम वस्ती, आधाकवाडी (शेलू), बौध्दवाडा (शेलू, कळंब-सुतारपाडा,) गरुडपाडा, बीड कातकरवाडी, मोहिली कातकरवाडी, बेकरेवाडी, सराईवाडी, वरईवाडी (मानिवली), सालवाडी, भालीवडी, जांभूळवाडी (मोग्रज), मल्याची वाडी, मिरचूलवाडी (कळंब), बोरीची वाडी (कळंब), ताडवाडी, मोरेवाडी, वर्णे ठाकूरवाडी, पळसदरी-ठाकूरवाडी येथे पाणीटंचाईसदृश परिस्थिती असून, तेथे पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.> कळंब (गावठाण), कुंडलज, जांभिवली, अंथ्राट वरेडी, बोरगाव, ओलमण, मुळगाव, खांडपे, कोंदिवडे, बीड, नेवाळी, लाडीवली, तिवणे(वासरे), दहिगाव, वरई, आडिवली, आर्ढे, पाली गाव, आंबोट, पोटल, किरवली, सालपे, कडाव, सावळा, हेदवली, गुडवण, किकवी, आषाणे, कोषाणे, मोग्रज, माणगाव (खांडपे), पोसरी, तिवरे ही गावे संभाव्य पाणीटंचाईग्रस्त आहेत. याठिकाणी टँकरने अधूनमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र बहुतांश पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. याशिवाय बोअरवेलसाठीही काही गावांत प्रयत्न सुरू आहेत.