शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

कर्जतमधील ७५ गाव-पाडे टंचाईग्रस्त

By admin | Updated: April 4, 2016 02:10 IST

कर्जत तालुक्यातील अनेक गाव-पाडे टंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये तब्बल ३४ गावे आणि ४१ आदिवासीवाड्यामध्ये पाणीटंचाई आहे.

संजय गायकवाड,  कर्जतकर्जत तालुक्यातील अनेक गाव-पाडे टंचाईग्रस्त आहेत. प्रशासनाने तयार केलेल्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यामध्ये तब्बल ३४ गावे आणि ४१ आदिवासीवाड्यामध्ये पाणीटंचाई आहे. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन काही दिवसांनी टँकर सुरू करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे.कर्जत तालुक्यातील प्रामुख्याने एप्रिल आणि मे महिन्यात आदिवासी आणि दुर्गम भागात निर्माण होणारी पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावांचा आराखडा तयार केला आहे. तो आराखडा तयार करताना तालुक्यात गावपातळीवर सुरू असलेल्या नळपाणी योजना यांची कामे, जलसंधारणअंतर्गत सुरू असलेली कामे यांचा विचार करण्यात आला. तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांची नावे निश्चित करून तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.संभाव्य पाणीटंचाईग्रस्त वाड्यामध्ये (टाकाची वाडी-दामत), खांडसवाडी, वेणगाव कातकरवाडी, भडवळ कातकरवाडी, डोणेवाडी, नवसूची वाडी, जांभूळवाडी (वारे), हाऱ्याची वाडी (वारे), देऊळवाडी, कोळ्याची वाडी, दोरेवाडी (कशेळे), कातकरवाडी (कशेळे), चिमटेवाडी (नांदगाव), भोपळेवाडी (नांदगाव), चौधरवाडी, आनंदवाडी-मोग्रज, वाघ्याची वाडी (बेडीसगाव), कोतेरीवाडी (बेडीसगाव), चोरीची वाडी (बेडीसगाव), शाळेची वाडी (बेडीसगाव), कुंडवाडी-बेडीसगाव, तिवरे-बौध्दवाडी, माले-कातकरवाडी, पोटल मुस्लीम वस्ती, आधाकवाडी (शेलू), बौध्दवाडा (शेलू, कळंब-सुतारपाडा,) गरुडपाडा, बीड कातकरवाडी, मोहिली कातकरवाडी, बेकरेवाडी, सराईवाडी, वरईवाडी (मानिवली), सालवाडी, भालीवडी, जांभूळवाडी (मोग्रज), मल्याची वाडी, मिरचूलवाडी (कळंब), बोरीची वाडी (कळंब), ताडवाडी, मोरेवाडी, वर्णे ठाकूरवाडी, पळसदरी-ठाकूरवाडी येथे पाणीटंचाईसदृश परिस्थिती असून, तेथे पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे.> कळंब (गावठाण), कुंडलज, जांभिवली, अंथ्राट वरेडी, बोरगाव, ओलमण, मुळगाव, खांडपे, कोंदिवडे, बीड, नेवाळी, लाडीवली, तिवणे(वासरे), दहिगाव, वरई, आडिवली, आर्ढे, पाली गाव, आंबोट, पोटल, किरवली, सालपे, कडाव, सावळा, हेदवली, गुडवण, किकवी, आषाणे, कोषाणे, मोग्रज, माणगाव (खांडपे), पोसरी, तिवरे ही गावे संभाव्य पाणीटंचाईग्रस्त आहेत. याठिकाणी टँकरने अधूनमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र बहुतांश पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते. याशिवाय बोअरवेलसाठीही काही गावांत प्रयत्न सुरू आहेत.