शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दोन तासात शोधला ६ लाखांचा ऐवज, नेरूळची घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 14, 2023 21:47 IST

रिक्षातून पडलेल्या बॅगचा घेतला शोध

नवी मुंबई : रिक्षातून प्रवासादरम्यान हरवलेली दागिन्यांची बॅग नेरुळ पोलिसांनी अवघ्या दोन तासाच्या प्रयत्नात शोधून दिली आहे. त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ६ लाखाचा ऐवज होता. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस रिक्षाचालकापासून ते रिक्षातून पडलेली बॅग उचलनाऱ्यापर्यंत अवघ्या दोन तासात पोहचले. 

जुईनगर येथे राहणाऱ्या सुरेखा फुलसे (५०) यांच्या बाबतीत रविवारी सकाळी हा प्रकार घडला. लातूर येथून त्या बसने नवी मुंबईत आल्या असता, एलपी पुलालगत उतरल्या होत्या. तिथून त्यांनी सोबतचे सर्व साहित्य घेऊन जुईनगर पर्यंत रिक्षाने प्रवास केला. मात्र घरी गेल्यावर केवळ दागिन्यांची बॅग साहित्यामध्ये नसल्याचे आढळून आले. यामुळे त्यांनी नेरुळ पोलिसठाने गाठले असता पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली.

त्यासाठी सहायक निरीक्षक नितीन खाडे, पोलिस शिपाई गणेश आव्हाड, पुरुषोत्तम भोये, प्रशांत बेलोटे, प्रवीण लहानगे यांचे पथक तयार करण्यात आले. त्यांनी तक्रारदार यांनी केलेल्या उल्लेखाप्रमाणे सीसीटीव्ही तपासून रिक्षाचा शोध घेतला. मात्र रिक्षा चालकाने आपल्याला त्यांची बॅग सापडली नसल्याचे सांगितले. त्यामुळे दागिन्यांची बॅग नेमकी कुठे गेली याचा शोध घेण्याला सुरवात केली.

यासाठी पोलिसांनी एलपी पुलापासून ते जुईनगर पर्यंतच्या प्रवास मार्गावरील प्रत्येक ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये एका ठिकाणी रिक्षातून बॅग पडल्याचे व एक व्यक्ती ती बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यावरून पोलिसांनी सदर परिसरात जाऊन त्या व्यक्तीचा शोध घेतला असता त्या व्यक्तीने देखील ती बॅग सुरक्षित ठेवल्याचे समोर आले.

हि बॅग पोलिस ठाण्यात आणून उघडली असता त्यामध्ये दहा तोळे सोन्याचे दागिने, दहा तोळे चांदीचे दागिने व १६ हजाराची रोकड असा सुमारे ६ लाखाचा ऐवज होता असे पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सांगितले. तर अवघ्या दोन तासात पोलिसांनी शीघ्र गतीने तपास करून लाखमोलाचा ऐवज मिळवून दिल्याबद्दल फुलसे यांच्या कुटुंबीयांनी देखील पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई