शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

५,८९२ जलस्रोतांची तपासणी बाकी

By admin | Updated: April 21, 2016 02:52 IST

ग्रामीण भागातील सहा हजार तीन पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपैकी फक्त १११ स्रोतांतील पाण्याचे नमुने रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यास यश आले आहे

आविष्कार देसाई,  अलिबागग्रामीण भागातील सहा हजार तीन पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपैकी फक्त १११ स्रोतांतील पाण्याचे नमुने रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यास यश आले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे अद्यापही पाच हजार ८९२ पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी होणे बाकी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ जिल्हा परिषद थांबविणार की नाही, असा प्रश्न पडला आहे.रायगड जिल्हा परिषदेमार्फत रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सहा हजार तीन पाण्याच्या स्रोतांतील रासायनिक घटक तपासणी अभियान १ मार्च ते ३० मे २०१६ या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून देणे हा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे.शुध्द पाणी पिल्याने साथीचे आजार पसरल्याची अनेक उदाहरणे आहेत. यावर उपाययोजना म्हणून वर्षातून दोन वेळा म्हणजे मार्च आणि आॅक्टोबर महिन्यात अशी दोन वेळा पिण्याच्या पाण्यातील रासायनिक नमुन्यांची तपासणी केली जाते. प्रयोगशाळेतील अहवालात ज्या ठिकाणचे पाणी दूषित आढळते त्या ठिकाणच्या पाण्याच्या स्रोतांच्या तातडीने शुध्दीकरणाबाबत उपाययोजना करण्यावर भर दिला जातो. जिल्हास्तरावरील अलिबाग, पेण, कर्जत, रोहे, माणगाव, महाड या ठिकाणी प्रयोगशाळा आहेत. कर्जत, पेण आणि रोहे या उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये फक्त १११ पाण्याचे नमुने पाठविण्यात आले आहेत.