शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

५,८९२ जलस्रोतांची तपासणी बाकी

By admin | Updated: April 21, 2016 02:52 IST

ग्रामीण भागातील सहा हजार तीन पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपैकी फक्त १११ स्रोतांतील पाण्याचे नमुने रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यास यश आले आहे

आविष्कार देसाई,  अलिबागग्रामीण भागातील सहा हजार तीन पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपैकी फक्त १११ स्रोतांतील पाण्याचे नमुने रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यास यश आले आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे अद्यापही पाच हजार ८९२ पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी होणे बाकी असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ जिल्हा परिषद थांबविणार की नाही, असा प्रश्न पडला आहे.रायगड जिल्हा परिषदेमार्फत रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सहा हजार तीन पाण्याच्या स्रोतांतील रासायनिक घटक तपासणी अभियान १ मार्च ते ३० मे २०१६ या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध करून देणे हा या अभियानामागील प्रमुख उद्देश आहे.शुध्द पाणी पिल्याने साथीचे आजार पसरल्याची अनेक उदाहरणे आहेत. यावर उपाययोजना म्हणून वर्षातून दोन वेळा म्हणजे मार्च आणि आॅक्टोबर महिन्यात अशी दोन वेळा पिण्याच्या पाण्यातील रासायनिक नमुन्यांची तपासणी केली जाते. प्रयोगशाळेतील अहवालात ज्या ठिकाणचे पाणी दूषित आढळते त्या ठिकाणच्या पाण्याच्या स्रोतांच्या तातडीने शुध्दीकरणाबाबत उपाययोजना करण्यावर भर दिला जातो. जिल्हास्तरावरील अलिबाग, पेण, कर्जत, रोहे, माणगाव, महाड या ठिकाणी प्रयोगशाळा आहेत. कर्जत, पेण आणि रोहे या उपविभागीय प्रयोगशाळांमध्ये फक्त १११ पाण्याचे नमुने पाठविण्यात आले आहेत.