शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

५८३ केंद्रांवर होणार बारावीची परीक्षा, २१ फेब्रुवारीपासून सुरुवात, मोबाइल वापरास बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 01:28 IST

महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यात ठाणे, मुंबई, रायगड विभागांतील जवळपास तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत.

- प्राची सोनवणेनवी मुंबई : महाराष्ट्र राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चदरम्यान घेतल्या जाणाºया बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यात ठाणे, मुंबई, रायगड विभागांतील जवळपास तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले आहेत.मुंबई विभागीय बोर्डांतर्गत ठाणे, रायगड, पालघर, दक्षिण मुंबई, मुंबई पश्चिम विभाग, तर मुंबई उत्तर विभागातील ५८३ परीक्षाकेंद्रांवर परीक्षा होणार आहे. यासाठी ७४ परिक्षण केंद्रांची निवड केली आहे. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी केंद्रप्रमुख, अतिरिक्त केंद्रप्रमुख, तसेच परीक्षकांची नियुक्ती केली आहे.गेल्या वर्षी व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणा-या प्रश्नपत्रिकेवर शासनाकडून निर्णय होईल. Þयावेळी प्रश्नपत्रिकेची पाकिटे वर्गातच उघडण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची संधीगेल्या वर्षी परीक्षेत अयशस्वी ठरलेल्या, विषय न सुटलेल्या विद्यार्थ्यांना बुधवार, १७ फेब्रुवारीपर्यंत परीक्षा अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये रीपिटर्स, श्रेणीसुधार, तसेच तुरळक विषय घेऊन बसलेल्यांचा समावेश असून अतिविलंब, अतिविशेष, परीक्षा फी वसूल करून परीक्षेला बसण्याची संधी दिली जाणार आहे. मूळ परीक्षा फी ३२५ रुपये असून, मुदतीनंतर मूळ परीक्षा फीवर प्रतिदिन ५० रुपये व त्यानंतर दिवसाला १०० व २०० रुपये आकारले जातात.स्मार्ट फोनच्या वापरावर पूर्णपणे बंदी ठेवण्यात आलेली आहे. याकरिता सर्वच केंद्रातील मुख्याध्यापकांच्या विशेष बैठका घेऊन याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षाकेंद्रावर केवळ केंद्रसंचालक मोबाइल फोनचा वापर करू शकणार आहेत. परीक्षार्थींनी मोबाइल फोन आणूच नये, असे आवाहन बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.- डॉ. सुभाष बोरसे, प्रभारी सचिव, राज्य माध्यमिक वउच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, मुंबई

टॅग्स :examपरीक्षा