शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ५०० शेतकरी निघाले काशीयात्रेला

By admin | Updated: January 23, 2017 05:52 IST

कष्टकरी शेतकऱ्यांना काशी विश्वेश्वराचे दर्शन घेता यावे यासाठी नवी मुंबई भाजीपाला वेल्फेअर असोसिएशनने बळीराजा

नवी मुंबई : कष्टकरी शेतकऱ्यांना काशी विश्वेश्वराचे दर्शन घेता यावे यासाठी नवी मुंबई भाजीपाला वेल्फेअर असोसिएशनने बळीराजा निघाला काशीला हा उपक्रम सुरू केला आहे. सात वर्षामध्ये तब्बल ३५०० शेतकऱ्यांनी तिर्थयात्रेचा लाभ घेतला असून यावर्षीची १२ दिवसांची यात्रा रविवारपासून सुरू झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील व्यापारी सोपानशेठ मेहेर यांनी पुढाकार घेवून शेतकऱ्यांसाठी ही यात्रा सुरू केली आहे. राज्याच्या ग्रामीण भागातील वृद्ध शेतकऱ्यांची या यात्रेसाठी निवड केली जाते. वर्षभर शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना अनेकवेळा इच्छा असूनही तिर्थयात्रेला जाता येत नाही. यामुळे शेतीची कामे संपत आली की थोडासा निवांतपणा असलेल्या वेळी या यात्रेचे आयोजन करण्यास सुरवात झाली आहे. एपीएमसी मार्केटमध्ये सर्व व्यापारी यात्रेकरूंना शुभेच्छा देत असतात. यावर्षी निवड झालेल्या शेतकऱ्यांना रविवारी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यात आल्या. काशी यात्रेचे स्वप्न पुर्ण होणार असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना होती. १२ दिवसांच्या यात्रेमध्ये शेतकऱ्यांना सर्व प्रकारची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यांना आवश्यक सुविधा पुरविण्यासाठी स्वयंसेवकांची टिमही सोबत असते. काशी यात्रेचा प्रवास १२ दिवसांचा असल्याने व हिवाळा असल्याने सर्व जेष्ठ नागरीकांना उनी टोप्याही देण्यात आल्या आहेत. शिवाजी टर्मीनल्स वरून महानगरी एक्सप्रेसने सर्व शेतकऱ्यानी आयोध्येकडे रवाना होणार आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार नरेंद्र पाटील, प्रकाश बावीस्कर व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)