शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
3
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
4
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
5
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
6
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
7
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
8
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
9
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
10
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
11
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
12
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
13
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
14
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
15
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
16
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
17
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
18
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
19
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
20
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?

पनवेलच्या पाणीप्रश्नासाठी हवा ५०० कोटींचा निधी

By admin | Updated: May 13, 2017 01:20 IST

पनवेल महापालिका क्षेत्रातील शहरे आणि गावांना भेडसावणारा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील शहरे आणि गावांना भेडसावणारा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. देहरंग धरणाची उंची वाढविल्याशिवाय पाणीटंचाईचा प्रश्न सुटू शकणार नाही. त्याकरिता राज्य सरकारने तातडीने ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी करून एक प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे. त्याची एक प्रत शुक्रवारी पनवेल महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना देण्यात आली.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या प्रस्तावात पनवेल महापालिकेच्या ११० चौरस मीटर क्षेत्रातील पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत आदी शहरांसह २९ गावांचा समावेश करण्यात आला असून काही ठिकाणी सद्य:स्थितीत पनवेल महापालिका आणि सिडकोकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारने शहरे आणि गावांच्या पाणीपुरवठ्याबाबत फारशी सकारात्मकता न दाखविल्याने सध्या अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने काही जलतज्ज्ञांच्या मदतीने एक प्रस्ताव तयार केला आहे. तो प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री (शहरे) रणजित पाटील, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले आदींना पाठविण्यात आला आहे. याची एक प्रत आयुक्तांनाही सुपूर्द करण्यात आली आहे.