शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

पनवेलच्या पाणीप्रश्नासाठी हवा ५०० कोटींचा निधी

By admin | Updated: May 13, 2017 01:20 IST

पनवेल महापालिका क्षेत्रातील शहरे आणि गावांना भेडसावणारा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील शहरे आणि गावांना भेडसावणारा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. देहरंग धरणाची उंची वाढविल्याशिवाय पाणीटंचाईचा प्रश्न सुटू शकणार नाही. त्याकरिता राज्य सरकारने तातडीने ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी करून एक प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे. त्याची एक प्रत शुक्रवारी पनवेल महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना देण्यात आली.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या प्रस्तावात पनवेल महापालिकेच्या ११० चौरस मीटर क्षेत्रातील पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत आदी शहरांसह २९ गावांचा समावेश करण्यात आला असून काही ठिकाणी सद्य:स्थितीत पनवेल महापालिका आणि सिडकोकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारने शहरे आणि गावांच्या पाणीपुरवठ्याबाबत फारशी सकारात्मकता न दाखविल्याने सध्या अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने काही जलतज्ज्ञांच्या मदतीने एक प्रस्ताव तयार केला आहे. तो प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री (शहरे) रणजित पाटील, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले आदींना पाठविण्यात आला आहे. याची एक प्रत आयुक्तांनाही सुपूर्द करण्यात आली आहे.