शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पनवेलच्या पाणीप्रश्नासाठी हवा ५०० कोटींचा निधी

By admin | Updated: May 13, 2017 01:20 IST

पनवेल महापालिका क्षेत्रातील शहरे आणि गावांना भेडसावणारा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील शहरे आणि गावांना भेडसावणारा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी संघर्ष समितीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. देहरंग धरणाची उंची वाढविल्याशिवाय पाणीटंचाईचा प्रश्न सुटू शकणार नाही. त्याकरिता राज्य सरकारने तातडीने ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी करून एक प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे. त्याची एक प्रत शुक्रवारी पनवेल महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना देण्यात आली.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या प्रस्तावात पनवेल महापालिकेच्या ११० चौरस मीटर क्षेत्रातील पनवेल, खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, खांदा वसाहत आदी शहरांसह २९ गावांचा समावेश करण्यात आला असून काही ठिकाणी सद्य:स्थितीत पनवेल महापालिका आणि सिडकोकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारने शहरे आणि गावांच्या पाणीपुरवठ्याबाबत फारशी सकारात्मकता न दाखविल्याने सध्या अनेक ठिकाणी भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने काही जलतज्ज्ञांच्या मदतीने एक प्रस्ताव तयार केला आहे. तो प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री (शहरे) रणजित पाटील, रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता, कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले आदींना पाठविण्यात आला आहे. याची एक प्रत आयुक्तांनाही सुपूर्द करण्यात आली आहे.