शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाजपच्या रोजगार मेळाव्यात ४४२ उमेदवारांना मिळाली नोकरी; नियुक्तिपत्रांचेही तत्काळ वाटप

By कमलाकर कांबळे | Updated: October 26, 2023 19:35 IST

सानपाडा येथील सौराष्ट्र पटेल सभागृहात झालेल्या या मेळाव्याचे आमदार गणेश नाईक यांच्या उदघाटन करण्यात आले.

नवी मुंबई: भारतीय जनता पार्टी आणि गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सानपाडा येथे आयोजित करण्यात आलेल्या महारोजगार मेळाव्यासाठी १,९१७ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४४२ उमेदवारांना या मेळाव्यात नोकरी मिळाली आहे. या मेळाव्याला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातील सक्षम प्रोजेक्ट व अक्षय फाऊंडेशनचे सहकार्य लाभले होते.

सानपाडा येथील सौराष्ट्र पटेल सभागृहात झालेल्या या मेळाव्याचे आमदार गणेश नाईक यांच्या उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी मेळाव्याचे मुख्य आयोजक तसेच नवी मुंबई भाजपचे अध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. येत्या काळात नवी मुंबईत रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. नवी मुंबईत डेटा सेंटर उद्योगात केंद्र सरकार ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दृष्टिपथात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी तरुणांनी स्वत:मध्ये आवश्यक कौशल्य निर्माण करावे, असे आवाहन गणेश नाईक यांनी याप्रसंगी केले.

जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आतापर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांचा आढावा घेतला. या वर्षीच्या महारोजगार मेळाव्यात ५०० विविध क्षेत्रातील कंपन्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८० कंपन्यांनी मेळाव्याच्या ठिकाणी स्टॅल उभारले उभारल्याची माहिती संदीप नाईक यांनी यावेळी दिली. माजी खासदार संजीव नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. दरम्यान, मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांना सुप्रसिद्ध मार्गदर्शक सुहास पाटील यांनी करिअरविषयक मार्गदर्शन केले. मुलाखतीची तयारी कशी करावी, मुलाखत कशी द्यावी, याविषयी टिप्स दिल्या. मेळाव्यात नोकरी मिळालेल्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तत्काळ नियुक्तिपत्रांचे वाटप करण्यात आले.

टॅग्स :BJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबई