शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

४०० एकर शेतीचे नुकसान

By admin | Updated: October 28, 2015 23:29 IST

धरमतर खाडी किनारपट्टीतील विठ्ठलवाडी भाल या टोकावरच्या गावावर गेली चार वर्षे सतत समुद्राच्या मोठ्या उधाण भरतीचे संकट कायमच ओढावलेले असते.

पेण : धरमतर खाडी किनारपट्टीतील विठ्ठलवाडी भाल या टोकावरच्या गावावर गेली चार वर्षे सतत समुद्राच्या मोठ्या उधाण भरतीचे संकट कायमच ओढावलेले असते. यंदा नवरात्री उत्सवानंतर कोजागिरी पौर्णिमेला आलेल्या भरतीमुळे आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस व वादळीवाऱ्यांनी समुद्र खवळला होता, यामुळे ४.५ मीटरपेक्षा जास्त लाटा उसळून धरमतर खाडी किनारचे संरक्षक बांध ओव्हरफ्लो होवून भरतीचे खारेपाणी थेट गावाच्या वेशीपर्यंत पोहचले. याबरोबर कापलेल्या १५० एकर भातशेतीत तर २०० एकर उभ्या शेतीत असे एकूण ४०० एकर भातशेतीला भरतीचे पाणी शिरल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जेएसडब्ल्यू इस्पात कंपनीने आपल्या प्रचंड मालवाहतूक करणाऱ्या बार्जेससाठी ड्रेझरने धरमतर खाडीचे उत्खनन केल्याने शेतीचे संरक्षण करणारे समुद्रतटीय बंधारे कमकुवत झाले. येणाऱ्या बार्जेसच्या वेगामुळे निर्माण होणाऱ्या लाटा थेट या बंधाऱ्यावर मोठा आघात करतात. कोजागिरी पौर्णिमेची भरती मोठी आल्याने मालवाहू बार्जेसच्या लाटांनी संरक्षक बंधारे ओव्हरफ्लो होवून सगळीकडून भरतीचे पाणी वेगाने थेट विठ्ठलवाडी गावापर्यंत पोहोचले.