शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

म्हसळ्यातील २६ गावे तहानलेली

By admin | Updated: April 11, 2016 01:31 IST

उन्हाचा पारा जसा वाढू लागला आहे तशी पिण्याच्या पाण्याची टंचाई उग्र होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरु वातीपासूनच तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसली

अमोल जंगम,  म्हसळाउन्हाचा पारा जसा वाढू लागला आहे तशी पिण्याच्या पाण्याची टंचाई उग्र होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरु वातीपासूनच तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसली असल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. म्हसळा पंचायत समितीने तालुक्यातील पाच गावे व २१ वाड्यांचा पाणीटंचाई कृती निवारण आराखड्यात समावेश केला आहे. मे महिन्यात म्हसळा शहरासह तालुक्यातील अन्य गावांच्या घशाला कोरड पडण्याच्या शक्यता असल्याने शासकीय यंत्रणेची धावपळ होणार आहे.तीव्र पाणीटंचाईची झळ कमी करण्यासाठी प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई कृती निवारण आराखडा तयार केला आहे. ही दर वर्षाची पाटी प्रशासन पुन:पुन्हा वापरत आहे. मुळात रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी सभा घेण्यापलीकडे प्रयत्न होताना दिसत नाही. शिवाय राष्ट्रीय पेय जल योजना, प्रादेशिक नळ पाणी, स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची योग्य देखभाल न केल्यामुळे अनेक गावांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षे टँकरमुक्त असलेल्या म्हसळा तालुक्याचा या वर्षीही पाणीटंचाईने पिच्छा सोडलेला नसल्याने नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला व भौगोलिकदृष्ट्या चढउतार, डोंगराळ असलेल्या म्हसळा तालुक्यात मुबलक पाणीसाठे व नैसर्गिक स्रोत आहेत. म्हसळा तालुक्यातील ८४ गावांची सुमारे ६१ हजार लोकसंख्या आहे. ८४ गावांसाठी ८४ नळ पाणी योजना व १३ गावांसाठी एक प्रादेशिक नळ पाणी योजना कार्यान्वित आहे. तालुक्यातील पाभारे, आंबेत व म्हसळा शहरासाठी तत्कालीन पालक मंत्री आ. सुनील तटकरे यांनी २००९ मध्ये तब्बल पाच कोटी २५ लाख रु पये एवढा निधी मंजूर केला. मात्र तीनही योजना स्थानिकांच्या दुर्लक्षामुळे मागील पाच वर्षे अपूर्ण आहेत. टंचाईग्रस्त गाववाड्यांना पाणीपुरवठा होण्यासाठी उपाययोजना म्हणून विंधन विहीर बांधल्यास समस्या सुटेल. यासाठी शासनाला २६ विंधन विहीर बांधण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. प्रत्येक विहिरीमागे ६० हजाराप्रमाणे १७ लाख ४० हजार रुपये खर्च होणार आहे. विंधन विहिरीचा प्रयोग काही ठिकाणी करण्यात आला व शासनाचे पैसे निव्वळ वाया गेले असताना पुन्हा तोच घाट कशाला, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. गेली तीन-चार वर्षे वनबंधारे बांधलेच जात नसल्याने म्हसळा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.