शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

म्हसळ्यातील २६ गावे तहानलेली

By admin | Updated: April 11, 2016 01:31 IST

उन्हाचा पारा जसा वाढू लागला आहे तशी पिण्याच्या पाण्याची टंचाई उग्र होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरु वातीपासूनच तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसली

अमोल जंगम,  म्हसळाउन्हाचा पारा जसा वाढू लागला आहे तशी पिण्याच्या पाण्याची टंचाई उग्र होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरु वातीपासूनच तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसली असल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. म्हसळा पंचायत समितीने तालुक्यातील पाच गावे व २१ वाड्यांचा पाणीटंचाई कृती निवारण आराखड्यात समावेश केला आहे. मे महिन्यात म्हसळा शहरासह तालुक्यातील अन्य गावांच्या घशाला कोरड पडण्याच्या शक्यता असल्याने शासकीय यंत्रणेची धावपळ होणार आहे.तीव्र पाणीटंचाईची झळ कमी करण्यासाठी प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई कृती निवारण आराखडा तयार केला आहे. ही दर वर्षाची पाटी प्रशासन पुन:पुन्हा वापरत आहे. मुळात रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी सभा घेण्यापलीकडे प्रयत्न होताना दिसत नाही. शिवाय राष्ट्रीय पेय जल योजना, प्रादेशिक नळ पाणी, स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची योग्य देखभाल न केल्यामुळे अनेक गावांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षे टँकरमुक्त असलेल्या म्हसळा तालुक्याचा या वर्षीही पाणीटंचाईने पिच्छा सोडलेला नसल्याने नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला व भौगोलिकदृष्ट्या चढउतार, डोंगराळ असलेल्या म्हसळा तालुक्यात मुबलक पाणीसाठे व नैसर्गिक स्रोत आहेत. म्हसळा तालुक्यातील ८४ गावांची सुमारे ६१ हजार लोकसंख्या आहे. ८४ गावांसाठी ८४ नळ पाणी योजना व १३ गावांसाठी एक प्रादेशिक नळ पाणी योजना कार्यान्वित आहे. तालुक्यातील पाभारे, आंबेत व म्हसळा शहरासाठी तत्कालीन पालक मंत्री आ. सुनील तटकरे यांनी २००९ मध्ये तब्बल पाच कोटी २५ लाख रु पये एवढा निधी मंजूर केला. मात्र तीनही योजना स्थानिकांच्या दुर्लक्षामुळे मागील पाच वर्षे अपूर्ण आहेत. टंचाईग्रस्त गाववाड्यांना पाणीपुरवठा होण्यासाठी उपाययोजना म्हणून विंधन विहीर बांधल्यास समस्या सुटेल. यासाठी शासनाला २६ विंधन विहीर बांधण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. प्रत्येक विहिरीमागे ६० हजाराप्रमाणे १७ लाख ४० हजार रुपये खर्च होणार आहे. विंधन विहिरीचा प्रयोग काही ठिकाणी करण्यात आला व शासनाचे पैसे निव्वळ वाया गेले असताना पुन्हा तोच घाट कशाला, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. गेली तीन-चार वर्षे वनबंधारे बांधलेच जात नसल्याने म्हसळा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.