शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
9
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
10
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
11
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
12
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
13
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
14
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
15
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
16
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
17
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
18
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
19
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
20
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!

म्हसळ्यातील २६ गावे तहानलेली

By admin | Updated: April 11, 2016 01:31 IST

उन्हाचा पारा जसा वाढू लागला आहे तशी पिण्याच्या पाण्याची टंचाई उग्र होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरु वातीपासूनच तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसली

अमोल जंगम,  म्हसळाउन्हाचा पारा जसा वाढू लागला आहे तशी पिण्याच्या पाण्याची टंचाई उग्र होत आहे. एप्रिल महिन्याच्या सुरु वातीपासूनच तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ बसली असल्याने पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. म्हसळा पंचायत समितीने तालुक्यातील पाच गावे व २१ वाड्यांचा पाणीटंचाई कृती निवारण आराखड्यात समावेश केला आहे. मे महिन्यात म्हसळा शहरासह तालुक्यातील अन्य गावांच्या घशाला कोरड पडण्याच्या शक्यता असल्याने शासकीय यंत्रणेची धावपळ होणार आहे.तीव्र पाणीटंचाईची झळ कमी करण्यासाठी प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई कृती निवारण आराखडा तयार केला आहे. ही दर वर्षाची पाटी प्रशासन पुन:पुन्हा वापरत आहे. मुळात रखडलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी सभा घेण्यापलीकडे प्रयत्न होताना दिसत नाही. शिवाय राष्ट्रीय पेय जल योजना, प्रादेशिक नळ पाणी, स्वतंत्र पाणीपुरवठा योजनांची योग्य देखभाल न केल्यामुळे अनेक गावांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक वर्षे टँकरमुक्त असलेल्या म्हसळा तालुक्याचा या वर्षीही पाणीटंचाईने पिच्छा सोडलेला नसल्याने नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला व भौगोलिकदृष्ट्या चढउतार, डोंगराळ असलेल्या म्हसळा तालुक्यात मुबलक पाणीसाठे व नैसर्गिक स्रोत आहेत. म्हसळा तालुक्यातील ८४ गावांची सुमारे ६१ हजार लोकसंख्या आहे. ८४ गावांसाठी ८४ नळ पाणी योजना व १३ गावांसाठी एक प्रादेशिक नळ पाणी योजना कार्यान्वित आहे. तालुक्यातील पाभारे, आंबेत व म्हसळा शहरासाठी तत्कालीन पालक मंत्री आ. सुनील तटकरे यांनी २००९ मध्ये तब्बल पाच कोटी २५ लाख रु पये एवढा निधी मंजूर केला. मात्र तीनही योजना स्थानिकांच्या दुर्लक्षामुळे मागील पाच वर्षे अपूर्ण आहेत. टंचाईग्रस्त गाववाड्यांना पाणीपुरवठा होण्यासाठी उपाययोजना म्हणून विंधन विहीर बांधल्यास समस्या सुटेल. यासाठी शासनाला २६ विंधन विहीर बांधण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. प्रत्येक विहिरीमागे ६० हजाराप्रमाणे १७ लाख ४० हजार रुपये खर्च होणार आहे. विंधन विहिरीचा प्रयोग काही ठिकाणी करण्यात आला व शासनाचे पैसे निव्वळ वाया गेले असताना पुन्हा तोच घाट कशाला, असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. गेली तीन-चार वर्षे वनबंधारे बांधलेच जात नसल्याने म्हसळा तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होत असल्याचे जाणकारांचे मत आहे.