शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एलिफंटा बेटावर २४ तास पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:52 IST

जगप्रसिद्ध घारापुरी बेट आणि बेटावरील अतिप्राचीन लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बेटावर २४ तास पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे

उरण : जगप्रसिद्ध घारापुरी बेट आणि बेटावरील अतिप्राचीन लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बेटावर २४ तास पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, त्यामुळे घारापुरी बेटाला आता सुरक्षा यंत्रणेचा २४ तास पहारा राहणार आहे.घारापुरी हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ आहे. जागतिक वारसा लाभलेल्या या बेटावर दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक येतात. सुट्ट्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होत असते. दिवसेंदिवस पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही विशेष उपाययोजना नव्हत्या. याशिवाय त्यांना आवश्यक सुविधांही मिळत नाहीत. पर्यटकांना सुरक्षा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याकडे संबंधित विविध शासकीय विभागांचे नेहमीच दुर्लक्षच होत आहे, त्यामुळे पर्यकांना भेडसाविणाºया विविध समस्यांवर सोडविण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीने शुक्र वारी विविध सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाºयांची बैठक बोलावली होती. पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या उपस्थितीत घारापुरी बेटावरील पुरातन विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीसाठी इंडियन नेव्ही कोस्टगार्डचे अधिकारी श्रीवास्तव, इंटेलिजन ब्युरो विभागाचे सहायक संचालक दीपक ग्रोव्हर, न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहायक आयुक्त विठ्ठल दामगुडे, सीआयएसएफचे डीसी आर. सी. यादव, मोरा पोलीस ठाण्याचे वपोनि माणिक नलावडे, आयबीचे निरीक्षक एस. चॅटर्जी, मेरीटाइम बोर्ड मोरा विभागाचे निरीक्षक नितीन कोळी, निरीक्षक पी. बी. पवार, पुरातन विभागाचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे आदीसह बेटावरील व्यावसायिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.घारापुरी बेटावर येणाºया पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेक दिवसांपासून ऐरणीवर होता. गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) येथून पर्यटक घेऊन प्रवासी बोटी घारापुरी बेटावर येतात. बोटीतून घारापुरी बेटावर येताना पर्यटकांची मोजदाद होते. मात्र, पर्यटक माघारी मुंबईकडे जाताना त्यांची मोजदाद होत नाही, त्यामुळे बºयाच वेळा शेवटची प्रवासी बोट निघून गेल्यानंतरही काही पर्यटक बेटावरच अडकून पडतात. शेवटची बोट सुटल्यानंतर मुंबईला पोहोचण्यासाठी बोटीची कोणतीही सुविधा नसल्याने बेटावर अडकलेल्या पर्यटकांना राहण्याची सोय नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अडकलेला पर्यटकांची माहिती नसल्याने गावातील स्थानिक ही त्यांना मदत करण्यास पुढे येत नाहीत, त्यामुळे पर्यटकांना जंगलातच रात्र काढावी लागते.वनखात्याकडेही जंगलात गस्तीसाठी कर्मचारी नाहीत, त्याशिवाय छोट्या-मोठ्या बोटीतून वाशी, न्हावा, उरण, मोरा येथून राजबंदर जेट्टीवरून लेण्या पाहण्यासाठी येणाºया पर्यटकांची कुठेही नोंद नसते. अशा सुरक्षिततेच्या विविध मुद्द्यावरील दुर्लक्षपणामुळे घारापुरी बेटाला निश्चितपणे घातपाताचा धोका संभवतो. त्याशिवाय अतिरेकी कारवायांचाही धोका संभवत असल्याकडेही बैठकीत लक्ष वेधण्यात आले.चर्चेअंती घारापुरी बेटाच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षा आणि टेहळणीसाठी बेटावरील डोंगरावर पोलीस चेकपोस्ट उभारून त्या ठिकाणी २४ तास ठाणे अंमलदारासह पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी रस्त्यांची दुरु स्ती, पाणपोई आणि शौचालयांची तत्काळ उभारणी आवश्यक आहे. त्यासाठीही प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घारापुरी बेट आणि पर्यटकांच्या सुरक्षेबाबत असलेल्या त्रुटी आणि बैठकीत झालेल्या चर्चेचा व निर्णयाचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे.