शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एलिफंटा बेटावर २४ तास पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:52 IST

जगप्रसिद्ध घारापुरी बेट आणि बेटावरील अतिप्राचीन लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बेटावर २४ तास पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे

उरण : जगप्रसिद्ध घारापुरी बेट आणि बेटावरील अतिप्राचीन लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बेटावर २४ तास पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, त्यामुळे घारापुरी बेटाला आता सुरक्षा यंत्रणेचा २४ तास पहारा राहणार आहे.घारापुरी हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ आहे. जागतिक वारसा लाभलेल्या या बेटावर दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक येतात. सुट्ट्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होत असते. दिवसेंदिवस पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही विशेष उपाययोजना नव्हत्या. याशिवाय त्यांना आवश्यक सुविधांही मिळत नाहीत. पर्यटकांना सुरक्षा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याकडे संबंधित विविध शासकीय विभागांचे नेहमीच दुर्लक्षच होत आहे, त्यामुळे पर्यकांना भेडसाविणाºया विविध समस्यांवर सोडविण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीने शुक्र वारी विविध सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाºयांची बैठक बोलावली होती. पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या उपस्थितीत घारापुरी बेटावरील पुरातन विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीसाठी इंडियन नेव्ही कोस्टगार्डचे अधिकारी श्रीवास्तव, इंटेलिजन ब्युरो विभागाचे सहायक संचालक दीपक ग्रोव्हर, न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहायक आयुक्त विठ्ठल दामगुडे, सीआयएसएफचे डीसी आर. सी. यादव, मोरा पोलीस ठाण्याचे वपोनि माणिक नलावडे, आयबीचे निरीक्षक एस. चॅटर्जी, मेरीटाइम बोर्ड मोरा विभागाचे निरीक्षक नितीन कोळी, निरीक्षक पी. बी. पवार, पुरातन विभागाचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे आदीसह बेटावरील व्यावसायिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.घारापुरी बेटावर येणाºया पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेक दिवसांपासून ऐरणीवर होता. गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) येथून पर्यटक घेऊन प्रवासी बोटी घारापुरी बेटावर येतात. बोटीतून घारापुरी बेटावर येताना पर्यटकांची मोजदाद होते. मात्र, पर्यटक माघारी मुंबईकडे जाताना त्यांची मोजदाद होत नाही, त्यामुळे बºयाच वेळा शेवटची प्रवासी बोट निघून गेल्यानंतरही काही पर्यटक बेटावरच अडकून पडतात. शेवटची बोट सुटल्यानंतर मुंबईला पोहोचण्यासाठी बोटीची कोणतीही सुविधा नसल्याने बेटावर अडकलेल्या पर्यटकांना राहण्याची सोय नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अडकलेला पर्यटकांची माहिती नसल्याने गावातील स्थानिक ही त्यांना मदत करण्यास पुढे येत नाहीत, त्यामुळे पर्यटकांना जंगलातच रात्र काढावी लागते.वनखात्याकडेही जंगलात गस्तीसाठी कर्मचारी नाहीत, त्याशिवाय छोट्या-मोठ्या बोटीतून वाशी, न्हावा, उरण, मोरा येथून राजबंदर जेट्टीवरून लेण्या पाहण्यासाठी येणाºया पर्यटकांची कुठेही नोंद नसते. अशा सुरक्षिततेच्या विविध मुद्द्यावरील दुर्लक्षपणामुळे घारापुरी बेटाला निश्चितपणे घातपाताचा धोका संभवतो. त्याशिवाय अतिरेकी कारवायांचाही धोका संभवत असल्याकडेही बैठकीत लक्ष वेधण्यात आले.चर्चेअंती घारापुरी बेटाच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षा आणि टेहळणीसाठी बेटावरील डोंगरावर पोलीस चेकपोस्ट उभारून त्या ठिकाणी २४ तास ठाणे अंमलदारासह पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी रस्त्यांची दुरु स्ती, पाणपोई आणि शौचालयांची तत्काळ उभारणी आवश्यक आहे. त्यासाठीही प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घारापुरी बेट आणि पर्यटकांच्या सुरक्षेबाबत असलेल्या त्रुटी आणि बैठकीत झालेल्या चर्चेचा व निर्णयाचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे.