शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी एलिफंटा बेटावर २४ तास पोलीस बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:52 IST

जगप्रसिद्ध घारापुरी बेट आणि बेटावरील अतिप्राचीन लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बेटावर २४ तास पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे

उरण : जगप्रसिद्ध घारापुरी बेट आणि बेटावरील अतिप्राचीन लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी बेटावर २४ तास पोलिसांची नियुक्ती करण्याचा निर्णय शुक्रवारी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, त्यामुळे घारापुरी बेटाला आता सुरक्षा यंत्रणेचा २४ तास पहारा राहणार आहे.घारापुरी हे जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ आहे. जागतिक वारसा लाभलेल्या या बेटावर दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक येतात. सुट्ट्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होत असते. दिवसेंदिवस पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता, या ठिकाणी त्यांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही विशेष उपाययोजना नव्हत्या. याशिवाय त्यांना आवश्यक सुविधांही मिळत नाहीत. पर्यटकांना सुरक्षा आणि सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याकडे संबंधित विविध शासकीय विभागांचे नेहमीच दुर्लक्षच होत आहे, त्यामुळे पर्यकांना भेडसाविणाºया विविध समस्यांवर सोडविण्यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीने शुक्र वारी विविध सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाºयांची बैठक बोलावली होती. पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांच्या उपस्थितीत घारापुरी बेटावरील पुरातन विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीसाठी इंडियन नेव्ही कोस्टगार्डचे अधिकारी श्रीवास्तव, इंटेलिजन ब्युरो विभागाचे सहायक संचालक दीपक ग्रोव्हर, न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहायक आयुक्त विठ्ठल दामगुडे, सीआयएसएफचे डीसी आर. सी. यादव, मोरा पोलीस ठाण्याचे वपोनि माणिक नलावडे, आयबीचे निरीक्षक एस. चॅटर्जी, मेरीटाइम बोर्ड मोरा विभागाचे निरीक्षक नितीन कोळी, निरीक्षक पी. बी. पवार, पुरातन विभागाचे प्रभारी अधिकारी कैलास शिंदे, घारापुरी सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे आदीसह बेटावरील व्यावसायिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.घारापुरी बेटावर येणाºया पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न अनेक दिवसांपासून ऐरणीवर होता. गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) येथून पर्यटक घेऊन प्रवासी बोटी घारापुरी बेटावर येतात. बोटीतून घारापुरी बेटावर येताना पर्यटकांची मोजदाद होते. मात्र, पर्यटक माघारी मुंबईकडे जाताना त्यांची मोजदाद होत नाही, त्यामुळे बºयाच वेळा शेवटची प्रवासी बोट निघून गेल्यानंतरही काही पर्यटक बेटावरच अडकून पडतात. शेवटची बोट सुटल्यानंतर मुंबईला पोहोचण्यासाठी बोटीची कोणतीही सुविधा नसल्याने बेटावर अडकलेल्या पर्यटकांना राहण्याची सोय नसल्याने अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अडकलेला पर्यटकांची माहिती नसल्याने गावातील स्थानिक ही त्यांना मदत करण्यास पुढे येत नाहीत, त्यामुळे पर्यटकांना जंगलातच रात्र काढावी लागते.वनखात्याकडेही जंगलात गस्तीसाठी कर्मचारी नाहीत, त्याशिवाय छोट्या-मोठ्या बोटीतून वाशी, न्हावा, उरण, मोरा येथून राजबंदर जेट्टीवरून लेण्या पाहण्यासाठी येणाºया पर्यटकांची कुठेही नोंद नसते. अशा सुरक्षिततेच्या विविध मुद्द्यावरील दुर्लक्षपणामुळे घारापुरी बेटाला निश्चितपणे घातपाताचा धोका संभवतो. त्याशिवाय अतिरेकी कारवायांचाही धोका संभवत असल्याकडेही बैठकीत लक्ष वेधण्यात आले.चर्चेअंती घारापुरी बेटाच्या आणि पर्यटकांच्या सुरक्षा आणि टेहळणीसाठी बेटावरील डोंगरावर पोलीस चेकपोस्ट उभारून त्या ठिकाणी २४ तास ठाणे अंमलदारासह पोलीस कर्मचाºयांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी रस्त्यांची दुरु स्ती, पाणपोई आणि शौचालयांची तत्काळ उभारणी आवश्यक आहे. त्यासाठीही प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घारापुरी बेट आणि पर्यटकांच्या सुरक्षेबाबत असलेल्या त्रुटी आणि बैठकीत झालेल्या चर्चेचा व निर्णयाचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात येणार आहे.