शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

हेटवणे धरणात १८ हजार एमएलडी पाणी साठा पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 05:43 IST

हेटवणे धरणात सिडकोच्या आरक्षित पाण्यापैकी सुमारे १८ हजार एमएलडी पाणी साठा शिल्लक राहत असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली कळंबोली येथील आत्माराम पाटील यांनी उघड केले

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : हेटवणे धरणात सिडकोच्या आरक्षित पाण्यापैकी सुमारे १८ हजार एमएलडी पाणी साठा शिल्लक राहत असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली कळंबोली येथील आत्माराम पाटील यांनी उघड केले आहे. मुबलक पाणी असूनही केवळ व्यवस्था नसल्याने सिडको वसाहतींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर एमजेपी आणि नवी मुंबई महापालिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या अनियमित, अपुºया पाणीपुरवठ्यावर सिडकोला वसाहतींची तहान भागावी लागत आहे.पेण परिसरात ८६.३५ कोटी रुपये खर्च करून पाटबंधारे विभागाने सिडकोच्या सहकार्याने हेटवणे धरण बांधले. याकरिता सिडको प्रशासनाने ४७ कोटी रुपये खर्च केले असून त्या बदल्यात पाटबंधारे विभागाने सिडकोला पाणी देण्याचा करार केला आहे. हेटवणे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १४७.४९ द.ल.घ.मी. इतकी आहे. त्यापैकी १४४.९८ द.ल.घ.मी. इतका पाणी साठा उपयुक्त आहे. हेटवणे धरणातील पाणी साठ्यापैकी सिडको प्रशासन तसेच सिंचन याकरिता पाणी विभाजन करार करण्यात आला. त्यामध्ये १०० एमएलडी पाणी सिडकोला देण्याची अट ठेवण्यात आली होती. हा करारनामा बदलून पाणी कोटा ५० ने वाढून तो १५० एमएलडी करण्यात आला आहे. त्यामुळे धरणात सिडकोकरिता आरक्षित पाणी मोठ्या प्रमाणात असून त्याचा वापर होत नाही.सिडकोने या ठिकाणाहून जलवाहिनी पूर्वीच टाकली असून तिची क्षमता अतिशय कमी असल्याने आवश्यक पाणी सिडको वसाहतींना देताच येत नाही. त्याचबरोबर पंपिंगची क्षमताही अत्यल्प आहे. त्यामुळे येणारे पाणी कमी दाबाने येते. सिडको प्रशासनाने हेटवणे धरणातील पाणीपुरवठ्यासाठी योग्य उपाययोजना केल्यास अनेक वसाहतींतील पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली लागण्याची शक्यता आहे.सिडकोला दरवर्षी ५४,७५० इतके पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी सिडको वर्षाला फक्त ३६,५०० एमएलडी पाणीच वापरते. म्हणजे १८,२५० एमएलडी पाणी धरणात शिल्लक राहते. आता आणखी पन्नास एमएलडी इतका कोटा वाढला आहे. सिडको वसाहतीला दररोज २१६ एमएलडी पाण्याची गरज आहे. पाणी कमी पडते याचे कारण म्हणजे पंपिंग क्षमता कमी आहे. त्याचबरोबर ते पाणी उचलण्याकरिता कोणतीच व्यवस्था नाही. आम्ही केलेल्या मागणीनुसार त्यांनी हेटवणे कळंबोली ग्रीडचे काम हाती घेतले आहे.- आत्माराम पाटील, सामाजिक कार्यकर्तेकळंबोलीहेटवणे-कळंबोली ग्रीडचे काम रखडले आहे ही वस्तुस्थिती आहे. संबंधित विभागाकडे पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतर उरलेले काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे हेटवणे धरणातील पाणी सिडको वसाहतींना थेट देता येईल. एमजेपी आणि नवी मुंबई महानगरपालिकेवर अवलंबून राहावे लागणार नाही. - दिलीप बोकाडे, कार्यकारी अभियंतापाणीपुरवठा विभाग, सिडको.