शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

पनवेलमध्ये खोदणार १८ विंधन विहिरी

By admin | Updated: May 2, 2017 03:12 IST

पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून १५ गाव तर ३४ वाड्यांचा समावेश

पनवेल : पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून १५ गाव तर ३४ वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. यातील ४ गाव आणि १४ वाड्यांमध्ये विंधन विहिरी खोदण्यास परवानगी मिळाली आहे. लवकरच या ठिकाणी विंधन विहिरी खोदण्यास सुरुवात केली जाणार आहे.उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत चालला असून एप्रिल महिना संपत आलेला आहे. त्यामुळे अनेक गाव, वाड्या पाण्यावाचून हैराण झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेंतर्गत पनवेलमधील ४ गाव व १४ वाडीतील १८ विंधन विहिरींना मंजुरी दिली आहे. यासाठी जवळपास प्रत्येकी विंधन विहिरीला ५० हजार रुपयांप्रमाणे १८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. माणघर, पाटनोळी, मोसारे, नानोशी ही ४ गावे तर ताडाचा टेप, हाल्टेप, कोंडले, चिंचवाडी, पोयंजे कातकरवाडी, तुराडे ठाकूरवाडी, पाली कातकरवाडी, तुराडे आदिवासी वाडी, सांगुर्ली फणसवाडी, गुळसुंदे आदिवासीवाडी, बोंडारपाडा, भेरले कातकरवाडी, आवळीचा माळ मोसारे, नानोशी कातकरवाडी या १४ वाड्यांमध्ये विंधन विहिरी खोदण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांत तालुक्यातील १५ गावे, तर ३४ वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, तालुक्यातील १८ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आलेली आहे. एप्रिल महिना उजाडून २४ दिवस उलटले आहेत. त्यामुळे उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण होत आहे. पशू-पक्षीदेखील पाण्याच्या शोधात आहेत. दिवसेंदिवस पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अनेक गावातील विहिरींनी तळ गाठला आहे तर गावातील बोअरवेलचे पाणी कमी झाले असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू झाली आहे. तर काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणी नसल्यामुळे आदिवासीवाडीतील नागरिक अद्यापही तहानलेलेच आहेत. पाण्याची पातळी खालवल्याने चिंतेची बाब आहे; परंतु पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी विंधन विहीर खोदाईचा पर्याय पुढे आला आहे. तालुक्यातील ४९ गाव-वाड्यात ५२ विंधन विहिरी खोदण्यासाठी सुचवले होते. सहायक भू वैज्ञानिक रायगड जिल्हा परिषद यांनी सर्वेक्षण करून १८ गाव-वाड्यांना विंधन विहिरी मंजूर करून दिल्या. शहर आणि गोड्या भागातील विहिरींची सफाई करून विहिरींचे पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी करणे गरजेचे आहे.