शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

पनवेलमध्ये खोदणार १८ विंधन विहिरी

By admin | Updated: May 2, 2017 03:12 IST

पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून १५ गाव तर ३४ वाड्यांचा समावेश

पनवेल : पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून १५ गाव तर ३४ वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. यातील ४ गाव आणि १४ वाड्यांमध्ये विंधन विहिरी खोदण्यास परवानगी मिळाली आहे. लवकरच या ठिकाणी विंधन विहिरी खोदण्यास सुरुवात केली जाणार आहे.उन्हाचा पारा दिवसेंदिवस चढत चालला असून एप्रिल महिना संपत आलेला आहे. त्यामुळे अनेक गाव, वाड्या पाण्यावाचून हैराण झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेंतर्गत पनवेलमधील ४ गाव व १४ वाडीतील १८ विंधन विहिरींना मंजुरी दिली आहे. यासाठी जवळपास प्रत्येकी विंधन विहिरीला ५० हजार रुपयांप्रमाणे १८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. माणघर, पाटनोळी, मोसारे, नानोशी ही ४ गावे तर ताडाचा टेप, हाल्टेप, कोंडले, चिंचवाडी, पोयंजे कातकरवाडी, तुराडे ठाकूरवाडी, पाली कातकरवाडी, तुराडे आदिवासी वाडी, सांगुर्ली फणसवाडी, गुळसुंदे आदिवासीवाडी, बोंडारपाडा, भेरले कातकरवाडी, आवळीचा माळ मोसारे, नानोशी कातकरवाडी या १४ वाड्यांमध्ये विंधन विहिरी खोदण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे.पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांत तालुक्यातील १५ गावे, तर ३४ वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र, तालुक्यातील १८ विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आलेली आहे. एप्रिल महिना उजाडून २४ दिवस उलटले आहेत. त्यामुळे उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहेत. पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण होत आहे. पशू-पक्षीदेखील पाण्याच्या शोधात आहेत. दिवसेंदिवस पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अनेक गावातील विहिरींनी तळ गाठला आहे तर गावातील बोअरवेलचे पाणी कमी झाले असल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू झाली आहे. तर काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पाणी नसल्यामुळे आदिवासीवाडीतील नागरिक अद्यापही तहानलेलेच आहेत. पाण्याची पातळी खालवल्याने चिंतेची बाब आहे; परंतु पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी विंधन विहीर खोदाईचा पर्याय पुढे आला आहे. तालुक्यातील ४९ गाव-वाड्यात ५२ विंधन विहिरी खोदण्यासाठी सुचवले होते. सहायक भू वैज्ञानिक रायगड जिल्हा परिषद यांनी सर्वेक्षण करून १८ गाव-वाड्यांना विंधन विहिरी मंजूर करून दिल्या. शहर आणि गोड्या भागातील विहिरींची सफाई करून विहिरींचे पाणी पिण्याव्यतिरिक्तच्या कामासाठी करणे गरजेचे आहे.